शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
5
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
6
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
7
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
8
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
9
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
10
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
11
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
12
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
13
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
14
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
15
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
16
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
17
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
18
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
19
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
20
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय

दखलपात्रतेसाठी गावची वेस ओलांडा

By admin | Updated: August 5, 2014 00:16 IST

श्रीकृष्ण जोशी : गुणवत्ता टिकवण्यासाठी स्पर्धेत टिकून राहणे आवश्यक

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी , ‘रत्नागिरीमध्ये अनेक लेखक आहेत. मात्र, स्पर्धेत टिकून राहण्यासाठी किंवा स्वत:च्या लेखनाची गुणवत्ता सिध्द करण्यासाठी लेखन शहराबाहेर पाठविणे गरजेचे आहे. कारण सध्या कथा, कादंबऱ्या लेखनाचा ट्रेड बदलत आहे. त्यामुळे लेखनाची गुणवत्ता ही बाहेरच सिध्द होते. फेसबुक किंवा व्हॉटस्अपसारख्या सोशल मीडियाचा वापर बरेच लेखक करतात. मात्र, त्याऐवजी लेखन करून पाठविले तर त्याची दखल निश्चितच घेतली जाते, असे मत लेखक व अभ्यंकर - कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी व्यक्त केले.संगीत नाटकांचा इतिहास जुना आहे. काळाच्या ओघात संगीत नाटक दुर्लक्षित होत असतानाच काही मोजक्या लेखक मंडळींबरोबर नाट्यकर्मींनी जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी लिहिलेली संगीत नाटके राज्यात नव्हे; तर देशपातळीवर गाजली आहेत, किंबहुना पुरस्कारप्राप्त ठरली आहेत. सं. स्वरयात्री, सं. घन अमृताचा, सं. शांतीब्रम्ह, सं. राधामानस, सं. ऐश्वर्यवती, सं. ऋणानुबंध यांसारख्या नाटकांचे लेखन केले. त्यांनी लेखन केलेली संगीत नाटके खल्वायन संस्थेने सादर केली. संस्थेच्या कलाकार मंडळींनी घेतलेल्या परिश्रमामुळे या नाटकांनी विविध पुरस्कार मिळविले. राज्यपातळीवर ही नाटके अव्वल ठरल्यामुळेच अखिल भारतीय संगीत नाट्य स्पर्धा आयोजन करण्याचे यजमानपद रत्नागिरीला लाभले. शिवाय लेखनाची पारितोषिके डॉ. जोशी यांना लाभली आहेत. मध्यप्रदेशमध्ये सं. शांतीब्रम्ह तर फारच गाजले. गिरगावच्या साहित्य संघ मंदिरात शांतीब्रम्हचा पहिला अंक झाल्यानंतर लेखक म्हणून प्रकट मुलाखत घेण्यात आली. दिल्ली, मध्यप्रदेश, गोवा, सांगलीतील प्रेक्षकांनी नाटक अक्षरश: डोक्यावर घेतले. पुण्यातील अण्णासाहेब किर्लोस्कर संस्थेतर्फे लेखनासाठी सं. बालगंधर्व पुरस्कार मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाकडून कुसुमाग्रज पुरस्कार मिळाला. सं. घन अमृताचा नाटकाच्या दिल्लीतील प्रयोगावेळी लोकसभेच्या सभापती सुमित्रा महाजन यांच्या हस्ते गौरविण्यात आले. कोल्हापूर येथील वुमन्स फौंडेशनतर्फे सिक्कीमचे राज्यपाल श्रीनिवास पाटील यांच्या हस्ते ‘साहित्य भूषण’ पुरस्कार देऊन त्यांना गौरविण्यात आले. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेतर्फे सं. ऋणानुबंध नाटकाला पुरस्कार मिळाला आहे. गोव्यातील संस्थेनेही सं. शांतीब्रम्ह, ऐश्वर्यवती नाटके सादर केले आहेत. नाटक लिहिल्यानंतर लेखनाचे फेअर करण्याचे काम त्यांच्या पत्नी ऋचा जोशी करतात. नवीन सं. नाटकाचे लेखन सध्या सुरू आहे. नवीन लेखकांमुळे संगीत नाटकाला चांगले दिवस येणार आहेत. शास्त्रीय संगीत अनेक तरूण मंडळी शिकतात. त्यांना नाटकाच्या माध्यमातून उत्कृष्ट व्यासपीठ मिळत आहे. परंतु युवावर्गाने पुढे येणे गरजेचे असल्याचे जोशी यांनी सांगितले.