शहरं
Join us  
Trending Stories
1
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
2
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
3
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
4
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
5
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
6
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
7
Tarot Card: 'ऐकावे जनाचे, करावे मनाचे' याची प्रचिती देणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य 
8
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
9
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
10
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
11
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
12
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
13
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
14
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
15
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
16
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
17
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
18
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
19
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
20
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

एन्रॉन ते रिफायनरी व्हाया बारसू सेटिंगबहाद्दर एनजीओ कोकणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : सोलगाव - बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता सावधानता बाळगण्याची गरज असून, या भागात रिफायनरीचे पडघम ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : सोलगाव - बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता सावधानता बाळगण्याची गरज असून, या भागात रिफायनरीचे पडघम वाजायला लागल्याने हमखास मुंबईतील एनजीओ दाखल होतील. त्यांचा रोखठोख समाचार घेण्यासाठी आमच्यासोबत सज्ज रहा, असा खणखणीत इशारा माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी दिला आहे.

काझी हे बारसू भागातील बागायतदार असून, गोवळ-शिवणे-बारसू रिफायनरी समर्थक समितीचे अध्यक्ष आहेत. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संपर्क साधून एनजीओंच्या कारवायांबाबत भूमिका मांडली. गावाबाहेरील एनजीओचे सदस्य व त्यांनी निर्माण केलेल्या संघर्ष समित्यांपासून कोणताही प्रकल्पाचे पडघम वाजायला लागले की संघर्ष समित्या स्थापन करण्यासाठी मुंबईस्थित दलाल कोकणात अवतीर्ण होतात, हा इतिहास आपण एन्रॉनपासून अगदी सलग जिंदल, फिनोलेक्स, आयलॉग, नाणार रिफायनरी इत्यादी प्रकल्पांपर्यंत सलगपणे पाहतो आहोत. आता बारसू येथे सरकारने कोणतीही रिफायनरी जाहीर केलेली नसताना संघर्ष समिती स्थापन करण्याची चढाओढ या एनजीओने लावलेली आहे. यांचा उद्देश हा प्रकल्प कंपन्यांबरोबर सेटिंगचा असतो, हे आता लपून राहिलेले नाही. जे आरोप अणुऊर्जा प्रकल्प, जिंदल, फिनोलेक्स तसेच अगदी आयलॉग जेटी प्रकल्पांकरिता लावण्यात आले, तेच आता बारसू - सोलगावच्या ग्रामस्थांना रिफायनरी प्रकल्पासंदर्भात सांगण्यात येतील, असे काझी यांनी सांगितले.

रिफायनरी प्रकल्पामुळे आम्लयुक्त पावसाची अफवा पसरवली जात आहे. मुंबईमध्ये मागील ७० वर्षे दोन रिफायनरी कार्यरत आहेत. या कालावधीत मुंबईत आम्लयुक्त पाऊस पडल्याची कुठेही नोंद नाही, परंतु याचे उत्तर त्यांच्यापाशी नाही. रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणात हजारो टन कोळसा जाळला जाईल व राख पसरेल, अशी यांची पत्रके फिरू लागली आहेत. मुंबईत असलेल्या दोन रिफायनरी प्रकल्पांतून मागील ७० वर्षांत राख कोठे पसरली? याचे उत्तर एनजीओंकडे नाही. माहुल येथील रिफायनरीच्या बाजूच्या झोपडपट्टी पुनर्वसन सोसायटीतील अव्यवस्थेचे दर्शन आता घडवले जाईल व त्याचे खापर रिफायनरीवर फोडले जाईल. मात्र, ही सोसायटी २०१२ साली अस्तित्वात आली तर रिफायनरी १९५२ साली अस्तित्वात आली. या रिफायनरीच्या आजूबाजूला असलेल्या इतर ५० ते ६० सोसायटींमधील सुंदर परिसराचे दर्शन घडवले जाणार नाही मात्र एकाच गलिच्छ सोसायटीतील अवस्थेचे चित्रण करून ग्रामस्थांना भडकावले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्रकल्पाचे पडघम वाजायला लागले की संघर्ष समित्या स्थापन करण्यासाठी मुंबईस्थित दलाल कोकणात अवतरतात. हा इतिहास आपण पुसण्यासाठी सज्ज झालो आहोत, असा इशारा काझी यांनी दिला आहे. नाणारमध्ये रिफायनरी नको तर ४२ उद्योग आणणारे दलाल आज कोठे आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.