शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
3
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
4
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
5
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
6
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
7
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
8
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
9
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
10
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
11
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
12
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
13
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
14
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
15
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
16
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
17
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी
18
मोठी बातमी...! "इराणचा अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित, इस्रायलनं दिला मोठा शब्द; रशियाचा दावा
19
कोण आहेत इराणचे नवे इंटेलिजेंस चीफ जनरल माजिद खादेमी? जाणून घ्या त्यांच्याबद्दल..
20
भाजपा नगरसेवकांनी पक्षाविरोधातच पुकारलं बंड; नगराध्यक्षाविरोधातच आणला अविश्वास ठराव

एन्रॉन ते रिफायनरी व्हाया बारसू सेटिंगबहाद्दर एनजीओ कोकणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क राजापूर : सोलगाव - बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता सावधानता बाळगण्याची गरज असून, या भागात रिफायनरीचे पडघम ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

राजापूर : सोलगाव - बारसू पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आता सावधानता बाळगण्याची गरज असून, या भागात रिफायनरीचे पडघम वाजायला लागल्याने हमखास मुंबईतील एनजीओ दाखल होतील. त्यांचा रोखठोख समाचार घेण्यासाठी आमच्यासोबत सज्ज रहा, असा खणखणीत इशारा माजी नगराध्यक्ष हनिफ मुसा काझी यांनी दिला आहे.

काझी हे बारसू भागातील बागायतदार असून, गोवळ-शिवणे-बारसू रिफायनरी समर्थक समितीचे अध्यक्ष आहेत. रविवारी त्यांनी पत्रकारांशी संपर्क साधून एनजीओंच्या कारवायांबाबत भूमिका मांडली. गावाबाहेरील एनजीओचे सदस्य व त्यांनी निर्माण केलेल्या संघर्ष समित्यांपासून कोणताही प्रकल्पाचे पडघम वाजायला लागले की संघर्ष समित्या स्थापन करण्यासाठी मुंबईस्थित दलाल कोकणात अवतीर्ण होतात, हा इतिहास आपण एन्रॉनपासून अगदी सलग जिंदल, फिनोलेक्स, आयलॉग, नाणार रिफायनरी इत्यादी प्रकल्पांपर्यंत सलगपणे पाहतो आहोत. आता बारसू येथे सरकारने कोणतीही रिफायनरी जाहीर केलेली नसताना संघर्ष समिती स्थापन करण्याची चढाओढ या एनजीओने लावलेली आहे. यांचा उद्देश हा प्रकल्प कंपन्यांबरोबर सेटिंगचा असतो, हे आता लपून राहिलेले नाही. जे आरोप अणुऊर्जा प्रकल्प, जिंदल, फिनोलेक्स तसेच अगदी आयलॉग जेटी प्रकल्पांकरिता लावण्यात आले, तेच आता बारसू - सोलगावच्या ग्रामस्थांना रिफायनरी प्रकल्पासंदर्भात सांगण्यात येतील, असे काझी यांनी सांगितले.

रिफायनरी प्रकल्पामुळे आम्लयुक्त पावसाची अफवा पसरवली जात आहे. मुंबईमध्ये मागील ७० वर्षे दोन रिफायनरी कार्यरत आहेत. या कालावधीत मुंबईत आम्लयुक्त पाऊस पडल्याची कुठेही नोंद नाही, परंतु याचे उत्तर त्यांच्यापाशी नाही. रिफायनरी प्रकल्पामुळे कोकणात हजारो टन कोळसा जाळला जाईल व राख पसरेल, अशी यांची पत्रके फिरू लागली आहेत. मुंबईत असलेल्या दोन रिफायनरी प्रकल्पांतून मागील ७० वर्षांत राख कोठे पसरली? याचे उत्तर एनजीओंकडे नाही. माहुल येथील रिफायनरीच्या बाजूच्या झोपडपट्टी पुनर्वसन सोसायटीतील अव्यवस्थेचे दर्शन आता घडवले जाईल व त्याचे खापर रिफायनरीवर फोडले जाईल. मात्र, ही सोसायटी २०१२ साली अस्तित्वात आली तर रिफायनरी १९५२ साली अस्तित्वात आली. या रिफायनरीच्या आजूबाजूला असलेल्या इतर ५० ते ६० सोसायटींमधील सुंदर परिसराचे दर्शन घडवले जाणार नाही मात्र एकाच गलिच्छ सोसायटीतील अवस्थेचे चित्रण करून ग्रामस्थांना भडकावले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. कोणत्याही प्रकल्पाचे पडघम वाजायला लागले की संघर्ष समित्या स्थापन करण्यासाठी मुंबईस्थित दलाल कोकणात अवतरतात. हा इतिहास आपण पुसण्यासाठी सज्ज झालो आहोत, असा इशारा काझी यांनी दिला आहे. नाणारमध्ये रिफायनरी नको तर ४२ उद्योग आणणारे दलाल आज कोठे आहेत? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.