शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
3
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
4
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
5
Shefali Jariwala Death:अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
6
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
7
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
8
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
9
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
10
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
11
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार
12
५९ वर्षीय व्यावयसायिकाने गर्लफ्रेंडला चॉकलेट भरवले, व्हिडीओ रेकॉर्ड करून दुकानदाराने ब्लॅकमेल केले, अखेर... 
13
ना इंग्लिश येत, ना...! लग्नासाठी अमेरिकेत आली, २४ वर्षांची सिमरन बेपत्ता झाली; पोलिसांना भलताच संशय...
14
ऑपरेशन सिंदूरनंतर आशिया कप भारतात होतोय; पाकिस्तानी संघ येणार का?
15
ITR भरल्यानंतर रिफंड किती दिवसांत मिळतो? एका क्लिकवर जाणून घ्या तुम्हाला किती पैसे मिळणार?
16
डोळ्यात तिखट टाकून बेदम मारले, गळ्यावर पाय देऊन संपवले; प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या
17
सात दिवस आधीच विठ्ठलाच्या दर्शन रांगेत ५० हजार भाविक; रांग किती किमीपर्यंत लागली...
18
जगातील सर्वात धोकादायक रस्ते, इथून चालतानाही उडतो थरकाप, यातील एक रस्ता आहे भारतात
19
सोने खरेदीची हीच योग्य वेळ! आठवड्यात ५००० रुपयांहून अधिकची घसरण, १० ग्रॅमचा दर किती?
20
सारथी संस्थेतील पायऱ्यांवरील पाणी मुरत नाही; अजित पवारांच्या नाराजीवर पीडब्ल्यूडीची धावाधाव

पाटबंधारे धरणांत पुरेसे पाणी

By admin | Updated: December 23, 2014 00:54 IST

रत्नागिरी जिल्हा : पाच धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी

रत्नागिरी : जिल्ह्यातील २२ लघु व एक मध्यम अशा एकूण २३ पाटबंधारे धरण प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली आहे. या सर्व धरण प्रकल्पात ७० ते ९६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असून, सरासरी पाणीसाठा ७२.३० टक्के आहे. या सर्व धरणांतील सरासरी उपयुक्त पाणीसाठा ३८.३४ दशलक्ष घनमीटर्स असून, पाण्याची स्थिती चांगली असल्याची माहिती रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या हंगामात पावसाने सुरुवातीला दडी मारून सर्वांनाच अस्वस्थ करून सोडले होते. सुरुवातीला अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे भरणार काय, असा सवाल निर्माण झाला होता. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या शेतीचे व काही गावच्या नळपाणी योजनांचे काय होणार, याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उशिराने चांगल्या प्रमाणात पाऊस झाला, अन अनेक धरणे भरली. त्यावेळीच निर्माण झालेली भीती दूर झाली होती. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या या धरणांवर शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तसेच या धरणांमुळे परिसरातील गावच्या विहिरींच्या पाण्याचीही योग्य पातळी राखली जाते. २२ डिसेंबर २०१४ या तारखेपर्यंत पाणी साठ्याच्या अद्ययावत आकडेवारीनुसार पाणीसाठ्याची स्थिती चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५ प्रकल्पात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे. त्यामध्ये आंबतखोल, खोपड, मालघर (सर्व चिपळूण), शिरवली (खेड), तेलेवाडी (संगमेश्वर) या धरणांचा समावेश आहे. यातील तेलेवाडी व आंबतखोल धरणात ९५ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. मात्र, २३ पैकी कोंड्ये, गवाणे व निवे या तीन पाटबंधारे धरण प्रकल्पातील पाणीसाठी ७० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या भागात उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी आणखी घटण्याची शक्यता आहे. केळंबा व बारेवाडी या धरणांची स्थिती चांगली नसल्याने त्या धरणांमध्ये पुरेसा उपयुक्त पाणीसाठा नाही. या धरणांच्या दुुरुस्तीचे कामही गेल्या वर्षी सुरू होते. सात धरणांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे, तर ६ धरण प्रकल्पांत ८० टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा आहे. सर्व धरणांत मिळून सध्या ३८.३४ दशलक्ष घनमीटर्स उपयुक्त पाणीसाठा आहे. (प्रतिनिधी)