शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
3
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
4
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपण"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोकठोक भाष्य
5
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
6
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
7
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
8
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
9
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
10
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
11
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
12
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
13
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
14
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
15
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
16
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
17
Crime: पतीला झाडाला बांधून पत्नीवर सामूहिक बलात्कार; नोकरी सोडल्याच्या रागातून क्रूर कृत्य!
18
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
19
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
20
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

पाटबंधारे धरणांत पुरेसे पाणी

By admin | Updated: December 23, 2014 00:54 IST

रत्नागिरी जिल्हा : पाच धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी

रत्नागिरी : जिल्ह्यातील २२ लघु व एक मध्यम अशा एकूण २३ पाटबंधारे धरण प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली आहे. या सर्व धरण प्रकल्पात ७० ते ९६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असून, सरासरी पाणीसाठा ७२.३० टक्के आहे. या सर्व धरणांतील सरासरी उपयुक्त पाणीसाठा ३८.३४ दशलक्ष घनमीटर्स असून, पाण्याची स्थिती चांगली असल्याची माहिती रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या हंगामात पावसाने सुरुवातीला दडी मारून सर्वांनाच अस्वस्थ करून सोडले होते. सुरुवातीला अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे भरणार काय, असा सवाल निर्माण झाला होता. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या शेतीचे व काही गावच्या नळपाणी योजनांचे काय होणार, याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उशिराने चांगल्या प्रमाणात पाऊस झाला, अन अनेक धरणे भरली. त्यावेळीच निर्माण झालेली भीती दूर झाली होती. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या या धरणांवर शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तसेच या धरणांमुळे परिसरातील गावच्या विहिरींच्या पाण्याचीही योग्य पातळी राखली जाते. २२ डिसेंबर २०१४ या तारखेपर्यंत पाणी साठ्याच्या अद्ययावत आकडेवारीनुसार पाणीसाठ्याची स्थिती चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५ प्रकल्पात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे. त्यामध्ये आंबतखोल, खोपड, मालघर (सर्व चिपळूण), शिरवली (खेड), तेलेवाडी (संगमेश्वर) या धरणांचा समावेश आहे. यातील तेलेवाडी व आंबतखोल धरणात ९५ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. मात्र, २३ पैकी कोंड्ये, गवाणे व निवे या तीन पाटबंधारे धरण प्रकल्पातील पाणीसाठी ७० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या भागात उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी आणखी घटण्याची शक्यता आहे. केळंबा व बारेवाडी या धरणांची स्थिती चांगली नसल्याने त्या धरणांमध्ये पुरेसा उपयुक्त पाणीसाठा नाही. या धरणांच्या दुुरुस्तीचे कामही गेल्या वर्षी सुरू होते. सात धरणांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे, तर ६ धरण प्रकल्पांत ८० टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा आहे. सर्व धरणांत मिळून सध्या ३८.३४ दशलक्ष घनमीटर्स उपयुक्त पाणीसाठा आहे. (प्रतिनिधी)