शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
2
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
3
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
4
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
5
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
6
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
7
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
8
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
9
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च
10
Sarfaraz Khan Century : ज्याला टीम इंडियातून बाहेर काढलं; त्या पठ्ठ्यानं संधी मिळताच शतक ठोकलं
11
Vladimir Putin High-Level Security : पुतिन यांची 'विष्ठा'ही परत नेली रशियात, अलास्काच्या दौऱ्यात लघवीसाठी होती खास सुटकेस; कारण...
12
'त्यांचा दीर्घ अनुभव देशाच्या कामी येणार', सीपी राधाकृष्णन यांच्या भेटीनंतर PM मोदींची प्रतिक्रिया
13
Maharashtra Rain: अचानक इतका पाऊस का पडतोय? अजून किती दिवस पावसाचा जोर कायम राहणार?
14
पोलीस कॉन्स्टेबलचा पत्नी-मुलावर तलवारीनं हल्ला; मग स्वत: धावत्या ट्रेनसमोर घेतली उडी, त्यानंतर...
15
CCTV देणं प्रायव्हेसी उल्लंघन कसं?; दिल्लीत पत्रकार परिषद घेत विरोधकांचा ECI वर हल्लाबोल
16
सलग ४३ व्या दिवशी 'या' शेअरला अपर सर्किट; किंमत ₹१०० पेक्षाही कमी, २ महिन्यांत केलं मालामाल
17
Aja Eakadashi 2025: श्रावणातले अजा एकादशीचे लाभदायी व्रत; का आणि कसे करावे? वाचा!
18
लेकी- सुनांवर अन्याय करणाऱ्यांना इथून पुढे...; महिलांच्या संरक्षणासाठी शिंदेंनी उचलला विडा
19
उपराष्ट्रपतीपदासाठी विरोधक तामिळनाडूचाच उमेदवार देणार; ठरल्यात जमा, बलाबल काय...
20
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये दिसणारी अभिनेत्री कोण? सनी देओलशी आहे कनेक्शन

पाटबंधारे धरणांत पुरेसे पाणी

By admin | Updated: December 23, 2014 00:54 IST

रत्नागिरी जिल्हा : पाच धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी

रत्नागिरी : जिल्ह्यातील २२ लघु व एक मध्यम अशा एकूण २३ पाटबंधारे धरण प्रकल्पांमधील पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात घट झाली आहे. या सर्व धरण प्रकल्पात ७० ते ९६ टक्क्यांपर्यंत पाणीसाठा असून, सरासरी पाणीसाठा ७२.३० टक्के आहे. या सर्व धरणांतील सरासरी उपयुक्त पाणीसाठा ३८.३४ दशलक्ष घनमीटर्स असून, पाण्याची स्थिती चांगली असल्याची माहिती रत्नागिरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. गेल्या हंगामात पावसाने सुरुवातीला दडी मारून सर्वांनाच अस्वस्थ करून सोडले होते. सुरुवातीला अल्प प्रमाणात पाऊस झाल्याने धरणे भरणार काय, असा सवाल निर्माण झाला होता. त्यामुळे धरणावर अवलंबून असलेल्या शेतीचे व काही गावच्या नळपाणी योजनांचे काय होणार, याबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, उशिराने चांगल्या प्रमाणात पाऊस झाला, अन अनेक धरणे भरली. त्यावेळीच निर्माण झालेली भीती दूर झाली होती. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागाच्या या धरणांवर शेती मोठ्या प्रमाणात अवलंबून आहे. तसेच या धरणांमुळे परिसरातील गावच्या विहिरींच्या पाण्याचीही योग्य पातळी राखली जाते. २२ डिसेंबर २०१४ या तारखेपर्यंत पाणी साठ्याच्या अद्ययावत आकडेवारीनुसार पाणीसाठ्याची स्थिती चांगली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ५ प्रकल्पात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणी आहे. त्यामध्ये आंबतखोल, खोपड, मालघर (सर्व चिपळूण), शिरवली (खेड), तेलेवाडी (संगमेश्वर) या धरणांचा समावेश आहे. यातील तेलेवाडी व आंबतखोल धरणात ९५ टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे. मात्र, २३ पैकी कोंड्ये, गवाणे व निवे या तीन पाटबंधारे धरण प्रकल्पातील पाणीसाठी ७० टक्क्यांपेक्षा कमी आहे. त्यामुळे या भागात उन्हाळी हंगामात पाण्याची पातळी आणखी घटण्याची शक्यता आहे. केळंबा व बारेवाडी या धरणांची स्थिती चांगली नसल्याने त्या धरणांमध्ये पुरेसा उपयुक्त पाणीसाठा नाही. या धरणांच्या दुुरुस्तीचे कामही गेल्या वर्षी सुरू होते. सात धरणांमध्ये ७० टक्क्यांपेक्षा अधिक उपयुक्त पाणीसाठा आहे, तर ६ धरण प्रकल्पांत ८० टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा आहे. सर्व धरणांत मिळून सध्या ३८.३४ दशलक्ष घनमीटर्स उपयुक्त पाणीसाठा आहे. (प्रतिनिधी)