शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
2
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
3
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
4
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
5
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
6
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
7
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
8
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
9
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
10
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
11
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
12
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
13
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
14
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
15
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
16
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
17
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
18
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
19
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
20
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!

शहरी, ग्रामीण भागात ­अकरावी प्रवेश प्रक्रिया आता महाविद्यालयीन स्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रद्द केल्याचे घोषित करून दहावीच्या गुणांवरून ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्य शासनाने अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रद्द केल्याचे घोषित करून दहावीच्या गुणांवरून अकरावी प्रवेश प्रक्रिया राबविण्याची सूचना केली आहे. त्यानुसार जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागामध्ये महाविद्यालयीन स्तरावर अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

शहरातील काही महाविद्यालयांनी महाविद्यालयाच्या संकेतस्थळावर प्रवेश अर्ज उपलब्ध करून दिले आहेत. ऑनलाईन व ऑफलाईन असे दोन्ही पर्याय विद्यार्थ्यांपुढे उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात तर ऑफलाईन पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. औद्योगिक प्रशिक्षण केंद्र, शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात मात्र केंद्रीय पद्धतीने प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे. सीईटी परीक्षा अचानक रद्द केल्याने नाराजी व्यक्त होत आहे.

क्षमतेपेक्षा विद्यार्थी संख्या कमी

जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये २७ हजार ४२० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. या प्रवेश क्षमतेपेक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची संख्या २१ हजार ८० इतकी आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांचे प्रवेश होऊनही ६,३४० जागा शिल्लक राहणार असून, अकरावी प्रवेश प्रक्रिया सुरळीत होणार आहे. जिल्ह्यात अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयांची संख्या ६१, विनाअनुदानित ५१, स्वयंअर्थसहाय्यितची २९ कनिष्ठ महाविद्यालये आहेत. जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांतून कला शाखेची एकूण ७,३६०, विज्ञान शाखा ७,६८०, वाणिज्य ८,३६०, संयुक्त ४,०२० इतकी प्रवेश क्षमता आहे. त्यामुळे प्रवेश प्रक्रियेला अडचण निर्माण होणार नाही

ऐनवेळेला परीक्षा रद्द करून नुकसान

दहावीची परीक्षा रद्द केल्यानंतर अकरावी प्रवेश प्रक्रियेसाठी सीईटी परीक्षा घेण्याचे जाहीर केले होते. मात्र, न्यायालयाच्या निकालानंतर शासनाने सीईटी परीक्षा रद्द केल्याचे घोषित केल्यामुळे यासाठी घेतलेले परिश्रम वाया गेले आहेत. सीईटीच्या तणावामुळे उत्तीर्ण झाल्याचा आनंदही घेता आला नाही. परीक्षा रद्द केल्याने ताण मात्र कमी झाला आहे.

- हिना काझी, रत्नागिरी

शासनाने गेल्या आठवड्यात सीईटी परीक्षा रद्दची घोषणा केली. या परीक्षेसाठी मार्गदर्शन लावले होते, अभ्यासासाठी पुस्तके खरेदी केली होती. मात्र, परीक्षा रद्द केल्याने आर्थिक भुर्दंड तर बसलाच शिवाय दोन ते अडीच महिने परीक्षेचे टेन्शनच अधिक होते. परीक्षेसाठी घेतलेली मेहनत वाया गेली आहे. परीक्षा रद्दचा निर्णय आधीच घ्यायला हवा होता.

- रिया खेडेकर, जाकादेवी

अकरावी प्रवेशासाठी सीईटी परीक्षा रद्द करण्यात आली असून, शासन आदेशानुसार जिल्ह्यातील १४१ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. शासनाकडून प्रवेश प्रक्रियेसाठी वेळापत्रक उपलब्ध करून दिले जाणार असून, त्यानुसार प्रवेश प्रक्रिया पूर्ण करून पुढील सूचनेनुसार महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज सुरू करण्यात येणार आहे.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी, रत्नागिरी.