शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
LOCजवळ भूसुरुंग स्फोट, अग्निवीराला वीरमरण, २ जवान जखमी, पहलगाम हल्ला करणाऱ्या संघटनेने स्वीकारली जबाबदारी 
3
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
4
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
5
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
6
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
7
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
8
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
9
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
10
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
11
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
12
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
13
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
14
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
15
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
16
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
17
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
18
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
19
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
20
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश

निवडणुका जवळ आल्याने काेल्ह्यांची काेल्हेकुई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST

रत्नागिरी : शहरातील पाणी योजना, रस्त्यांच्या कामावरुन विरोध करणारेच शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत. निवडणुका सहा-सात महिन्यांवर आल्याने कोल्हे ...

रत्नागिरी : शहरातील पाणी योजना, रस्त्यांच्या कामावरुन विरोध करणारेच शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत. निवडणुका सहा-सात महिन्यांवर आल्याने कोल्हे पिंजऱ्यातून बाहेर येऊन कोल्हेकुई करत आहेत. विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी पुढच्या निवडणुकीत नगर परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा विश्वास नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ते म्हणाले की, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शहरातील रस्त्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला असून, तो प्राप्तही झाला आहे. रस्त्यांच्या कामाचा ठेकेदारांना कार्यादेशही देण्यात आला आहे. मात्र, नळपाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारामुळे रस्त्याच्या कामांना विलंब होत आहे. तसेच १५ दिवसात पाऊस न पडल्यास शहरातील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम करु, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि तौक्ते वादळामुळे रस्त्यांचे डांबरीकरण आणि पाणी योजनेच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पाणी योजनेचे काम करणाऱ्या सुमारे २५ कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने इतर कामगारांनी भीतीमुळे पलायन केले. त्याचबरोबर तौक्ते वादळामुळे पाणी योजना आणि रस्त्यांच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. शहरातील कामांचे कार्यादेश जावेद खान आणि आर. डी. सामंत कंपनीला देण्यात आले आहेत. डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असून, पुढील १५ दिवसात पाऊस न पडल्यास रस्त्यांचे ८५ टक्के काम पूर्ण करण्यात येईल. मात्र, आवश्यक ती सर्व तयारी असताना, पाऊस पडल्यास रस्त्याची कामे थांबवावी लागणार आहेत. परंतु, जेवढी कामे होतील तेवढी पूर्ण करण्यात येणार आहेत. काही दिवस शहरवासीयांना त्रास होईल. पण पाणी आणि रस्त्याच्या कामाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे, असेही त्यांनी सांगितले.