शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
2
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
3
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
4
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
5
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
6
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
7
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
8
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
9
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
10
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
11
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
12
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
13
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
14
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
15
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
16
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
17
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...
18
Spying for Pakistan: ज्योती मल्होत्रानंतर यु ट्यूबर प्रियांका सेनापती रडारवर! केंद्रीय गुप्तचर ब्युरोने केली चौकशी
19
एकच आंबा तीन किलोंचा! शेतकऱ्याने दिलेलं गिफ्ट बघून शरद पवार भारावले; फोटो शेअर करत म्हणाले...
20
IPL 2025 खेळण्यासाठी PSL सोडून आला, पण किटबॅग पाकिस्तानात राहिली, मेंडिसने पुढे काय केलं?

निवडणुका जवळ आल्याने काेल्ह्यांची काेल्हेकुई सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 28, 2021 04:24 IST

रत्नागिरी : शहरातील पाणी योजना, रस्त्यांच्या कामावरुन विरोध करणारेच शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत. निवडणुका सहा-सात महिन्यांवर आल्याने कोल्हे ...

रत्नागिरी : शहरातील पाणी योजना, रस्त्यांच्या कामावरुन विरोध करणारेच शहरवासीयांची दिशाभूल करत आहेत. निवडणुका सहा-सात महिन्यांवर आल्याने कोल्हे पिंजऱ्यातून बाहेर येऊन कोल्हेकुई करत आहेत. विरोधकांनी कितीही कोल्हेकुई केली तरी पुढच्या निवडणुकीत नगर परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकणार, असा विश्वास नगराध्यक्ष प्रदीप साळवी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

ते म्हणाले की, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शहरातील रस्त्यांसाठी १० कोटी रुपयांचा निधी दिला असून, तो प्राप्तही झाला आहे. रस्त्यांच्या कामाचा ठेकेदारांना कार्यादेशही देण्यात आला आहे. मात्र, नळपाणी पुरवठा योजनेच्या ठेकेदारामुळे रस्त्याच्या कामांना विलंब होत आहे. तसेच १५ दिवसात पाऊस न पडल्यास शहरातील रस्त्यांचे डांबरीकरणाचे काम करु, असेही त्यांनी सांगितले.

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि तौक्ते वादळामुळे रस्त्यांचे डांबरीकरण आणि पाणी योजनेच्या कामात मोठा अडथळा निर्माण झाला आहे. पाणी योजनेचे काम करणाऱ्या सुमारे २५ कामगारांना कोरोनाची लागण झाल्याने इतर कामगारांनी भीतीमुळे पलायन केले. त्याचबरोबर तौक्ते वादळामुळे पाणी योजना आणि रस्त्यांच्या कामात अडथळे निर्माण झाले आहेत. शहरातील कामांचे कार्यादेश जावेद खान आणि आर. डी. सामंत कंपनीला देण्यात आले आहेत. डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात होणार असून, पुढील १५ दिवसात पाऊस न पडल्यास रस्त्यांचे ८५ टक्के काम पूर्ण करण्यात येईल. मात्र, आवश्यक ती सर्व तयारी असताना, पाऊस पडल्यास रस्त्याची कामे थांबवावी लागणार आहेत. परंतु, जेवढी कामे होतील तेवढी पूर्ण करण्यात येणार आहेत. काही दिवस शहरवासीयांना त्रास होईल. पण पाणी आणि रस्त्याच्या कामाचा प्रश्न कायमचा सुटणार आहे, असेही त्यांनी सांगितले.