शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

निवडणूक अर्जही आॅनलाईन

By admin | Updated: December 2, 2014 23:30 IST

शक्तीप्रदर्शनाच्या उधाणाला निवडणूक आयोगाचा चाप

रत्नागिरी : निवडणूक आयोगाने आता ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठीही उमेदवारी अर्ज आॅनलाईन भरणे अनिवार्य केले असून, आता उमेदवार अगदी घरबसल्या आपला अर्ज आॅनलाईन भरणार आहेत. आॅनलाईन अर्ज भरल्यामुळे शक्तीप्रदर्शनालाही चाप बसणार आहे. आता अगदी ग्रामपंचायत स्तरावरील निवडणुकाही प्रतिष्ठेच्या केल्या जात आहेत. ग्रामपंचायतीसाठी पंचायत समिती कार्यालयात अर्ज भरताना शक्तीप्रदर्शन करूनच अर्ज भरला जात असे. मात्र, आता निवडणूक आयोगाने शक्तीप्रदर्शनाला चाप लावला आहे. त्यामुळे आता निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवाराला आपला अर्ज आॅनलाईन सादर करावा लागणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांचे त्याचे एक दिवसाचे प्रशिक्षण घेण्यात आले. यावेळी अर्जदारांकडून कशा प्रकारे अर्ज आॅनलाईन भरून घेणे अपेक्षित आहे, हे सांगण्यात आले. जिल्ह्यातील बारा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या २३ रोजी निवडणुका होत आहेत. त्यासाठी ४ ते ८ डिसेंबर या कालावधीत अर्ज भरून घेण्यात येणार आहेत. मात्र, आता आॅनलाईन अर्ज भरावे लागणार असल्याने या निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना आता महा-ई सेवा केंद्रात अर्ज भरावा लागणार आहे किंवा निवडणुका असलेल्या दापोली, खेड आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांतील पंचायत समितीमध्ये त्यांना आॅनलाईन अर्ज भरावे लागणार आहेत. मात्र, आयोगाने ग्रामस्तरावरूनच आॅनलाईन अर्ज अनिवार्य केल्याने शक्तीप्रदर्शनात होणाऱ्या खर्चावरही आता नियंत्रण येणार आहे. (प्रतिनिधी)