शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: २ वर्षांपासून सुरू होता स्फोटकं जमवण्याचा जीवघेणा खेळ; डॉ शाहीन शाहिदची कबुली
2
एके-47 ठेवणाऱ्या डॉ. शाहीनचे थेट महाराष्ट्राशी कनेक्शन; जैशच्या महिला विंगची निघाली मास्टरमाईंड
3
“जनतेची काम करतो म्हणून प्रत्येक समाज घटक ८-८ लाखाच्या फरकाने निवडून देतात”: अजित पवार
4
एकही रुपया न गुंतवता दरवर्षी कमावू शकता ₹२.८८ लाख; पाहा PPF च सीक्रेट, लोकही विचारतील कसं केलं?
5
Govinda Hospitalised : ६१ वर्षीय गोविंदाची अचानक तब्येत बिघडली, झाला बेशुद्ध, जुहूच्या रुग्णालयात दाखल
6
ATP Finals 2025: खेळ पाहण्यासाठी आलेल्या दोन चाहत्यांचा मृत्यू, क्रीडाविश्वात शोक!
7
इंजिनीअरिंग, फार्मसी, एमबीएची सीईटी वर्षातून दोनदा, यंदा एप्रिलमध्ये पहिली, तर मेमध्ये दुसरी सीईटी परीक्षा
8
महायुतीच्या त्सुनामीमुळे विरोधकांत भीती, आशिष शेलार यांचा टोला
9
आजचे राशीभविष्य, १२ नोव्हेंबर २०२५: आजचा दिवस आनंदी; पण 'या' राशीला स्त्रीमुळे अडचणीचा धोका
10
पोस्टरमुळे समोर आला डॉक्टरांचा दहशतवादी कट; स्फोटकांचा तपास यशस्वी, पण दिल्लीत कशी झाली चूक?
11
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोटावर पाकिस्ताननं काय म्हटलं? तुर्कीनं तर हद्द ओलांडली!
12
Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज, डॉक्टरांनी दिले हेल्थ अपडेट
13
‘व्हाइट कॉलर’ दहशतवादाचा दिल्ली बॉम्बस्फोटामागे हात, एनआयए करणार तपास; कार चालवणारा पुलवामाचा डॉक्टर
14
कार चालविणाऱ्या डॉक्टरचे दहशतवादी मॉड्युलशी संबंध, ठार झालेल्यांत समावेश
15
लाल किल्ला स्फोट : कालपर्यंत हसत-बोलत होता,आज शव ओळखायला सांगताहेत ! रुग्णालयाबाहेर कुटुंबीयांना अश्रू अनावर
16
एक्झिट पोलमध्ये एनडीएला स्पष्ट बहुमत; बिहारमध्ये पुन्हा नितीश, महाआघाडी सत्तेपासून दूरच; १४ नाेव्हेंबरला प्रत्यक्ष निकाल
17
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
18
विक्रमवीर बिहार : दुसऱ्या टप्प्यात ६८.७९% मतदान, आजवरचे सर्वाधिक मतदान, एकूण मतदान ६६.९०%
19
मुंबईची जमीन खचतेय; दिल्ली, चेन्नईही धोक्यात, वैज्ञानिकांचा सावधगिरीचा इशारा; कोट्यवधी लोक धोक्यात
20
स्वदेशी ‘वंदे भारत’ स्लीपर सुसाट; १८० किमी तास वेगाने धावली, ‘मिशन रफ्तार’, ‘मेक इन इंडिया’ मोहिमेचे ऐतिहासिक यश

जिल्ह्यात आठ महिन्यांत दाेन महिला विकृत वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

तन्मय दाते लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ हाेत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महिलांवरील अत्याचाराचे ...

तन्मय दाते

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ हाेत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात २ महिला वासनेच्या शिकार बनल्या आहेत. त्यामध्ये ओळखीच्या महिला, मुलींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणाऱ्या नराधमांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात अत्याचाराचे २ प्रकार घडले असून, या दाेन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यात पाेलिसांना यश आले आहे. गतवर्षी नाेव्हेंबर महिन्यात चिपळूण येथे प्रकार उघडकीला आला हाेता. त्यामध्ये दोन मुली अत्याचाराच्या बळी पडल्या हाेत्या. नाेकरीचे आमिष दाखवून त्यांना चिपळूण येथे आणण्यात आले हाेते, त्यानंतर त्यांच्याकडून व्यवसाय करवून घेण्यात येत हाेता. पाेलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तपास करून या दाेन्ही मुलींची सुटका केली.

१०० टक्के गुन्ह्यांची उकल

गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यांत अत्याचाराचे दोन प्रकार घडले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना १०० टक्के यश आले आहे. जिल्ह्यात असे प्रकार घडत असतील, अल्पवयीन मुलींना या व्यवसायात ओढत असेल तर पाेलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत झाली आहे वाढ

- गेल्यावर्षी कोरोनामुळे लागू झालेल्या लाॅकडाऊनमुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. गतवर्षी एक विकृत घटना घडली पण त्यांनाही पोलिसांना पकडण्यात यश आले.

n जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये २ वासनेच्या प्रकार घडल्या पण त्याही पोलिसांना आराेपींना पकडण्यात यश आले.

महिलाच ठरल्या विकृतीच्या शिकार

सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विकृतीच्या शिकारींमध्ये महिलांचे प्रमाण आहे. काही जिल्ह्यांमध्ये महिलांपेक्षा अल्पवयीन मुलीचे प्रमाण आहे. रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विकृत प्रकारामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे अल्पवयीन मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. महिलांचे प्रमाण का जास्त आहे याचा शाेध पोलीस घेत आहेत

जिल्ह्यातील बलात्कार

जानेवारी ००

फेब्रुवारी ०१

मार्च ००

एप्रिल ००

मे ००

जून ००

जुलै ०१

ऑगस्ट ००

कोरोनाकाळातही नजर

गतवर्षीपासून कोरोनाचे संकट राज्यभर सुरू आहे. हे कोरोनाचे संकट सुरू असतानाही रत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० मध्ये व फेब्रुवारी व जुलै २०२१ मध्ये ३ केसेस दाखल झाल्या हाेत्या. काेराेनाच्या काळात बंदाेबस्ताचा ताण असतानाही पाेलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला नाही. पाेलीस स्थानकात दाखल हाेणाऱ्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यातही पाेलीस अग्रेसर आहेत.