शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

जिल्ह्यात साडेआठ टक्के लोकांची दारिद्र्यरेषेखालील नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:34 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : २०११ साली देशाची जनगणना झाली. त्यावेळी विविध प्रकारच्या गटानुसार जनगणना झाली. मात्र, त्यानंतर अजूनही ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : २०११ साली देशाची जनगणना झाली. त्यावेळी विविध प्रकारच्या गटानुसार जनगणना झाली. मात्र, त्यानंतर अजूनही जनगणना न झाल्याने आहे त्याचप्रकारे लोकसंख्या विविध बाबींसाठी ग्राह्य धरली जात आहे. त्यामुळे गेल्या दहा वर्षात दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींची यादीही अद्याप सुधारित करण्यात न आल्याने पूर्वीचीच यादी वापरली जात आहे. त्यामुळे या यादीत काही सधन व्यक्तिंचा समावेश असूनही त्यांना शासनाच्या योजनेचे लाभ मिळत आहेत. मात्र, खरे गरजू या लाभापासून वंचित राहात आहेत.

जिल्ह्यात ३८,५५७ रेशनकार्डधारकांचा समावेश दारिद्र्यरेषेखालील यादीत करण्यात आला आहे. या रेशनकार्डवरील ३ लाख ३६ हजार ६९५ लोकांचा समावेश २०११च्या जनगणनेनुसार दारिद्र्यरेषेखालील यादीत असल्याने त्यांना शासनाच्या राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेचा तसेच सध्या काेरोना काळात मोफत धान्याचा लाभ मिळत आहे.

परंतु यापैकी काही जण सधन असूनही या योजनेचा लाभ घेत असल्याने खऱ्या गरजूंना शासनाच्या मदतीचा लाभ मिळताना अडचणी येत आहेत.

दारिद्र्यरेषेखालीलसाठीचे निकष कोणते?

व्यक्तीचे उत्पन्न २१ हजाराच्या आत असेल तर त्या व्यक्तिचा दारिद्र्यरेषेखालील यादीत समावेश करता येतो.

निराधार व्यक्तिचा समावेश दारिद्र्यरेषेखालील यादीत होतो.

त्यासाठी महसूल विभागाकडून दर पाच ते दहा वर्षांनंतर सर्वेक्षण होत असते.

महसूल यंत्रणेकडून होणाऱ्या या सर्वेक्षणात सिद्ध झाल्यास त्या व्यक्तिला प्रमाणपत्र दिले जाते.

हे प्रमाणपत्र घेऊन तहसील कार्यालयात गेल्यास त्या व्यक्तिचा समावेश दारिद्र्यरेषेखालील यादीत करून पिवळे रेशनकार्ड दिले जाते.

दारिद्र्यरेषेखालील लोकांचा आढावाच घेतला गेला नाही

दारिद्र्यरेषेखालील व्यक्तींची यादी अपडेट करण्यासाठी ग्रामपंचायत स्तरावर दर पाच वर्षांनी आढावा घेतला जातो.

२०११ साली राष्ट्रीय जनगणना झाली. त्यानंतर अजूनही जनगणना न झाल्याने आहे तीच यादी वापरली जात आहे.

यादीत गोंधळ कारण...

दारिद्र्यरेषेखालील यादीत समावेश होणाऱ्यांचे उत्पन्न २१ हजार रुपयांपेक्षा कमी असायला हवे. मात्र, काही घरात अनेक माणसे कमावती असली तरीही त्यांच्या रेशनकार्डवर २१ हजारपेक्षा कमी उत्पन्न दाखविले जाते आणि ज्याचे उत्पन्न कमी असले तरीही ते जास्त दाखविले जात असल्याने गरजवंत वंचित राहात आहेत.

कोण गरीब, कोण श्रीमंत? साडे अडतीस हजार लोकांना शासनाच्या योजनेचा लाभ

जिल्ह्यात ३८ हजार ५५७ लोकांकडे दारिद्र्यरेषेखालील यादीत नाव असल्याने त्यांना पिवळ्या रंगाचे रेशनकार्ड देण्यात आले आहे.

काहींनी बनावट कागदपत्रे सादर करून आपले नाव या यादीत समाविष्ट करून घेतले आहे.