शहरं
Join us  
Trending Stories
1
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
5
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
6
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
7
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
8
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
9
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
10
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
11
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
12
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
13
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
14
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
15
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
16
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
17
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
18
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
19
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
20
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
Daily Top 2Weekly Top 5

बसचालकांच्या आडमुठेपणामुळे प्रवासी वेठीस

By admin | Updated: December 23, 2014 23:44 IST

के. बी. देशमुख : बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

रत्नागिरी : कर्मचारी बदली प्रकरण गेले आठवडाभर गाजत असून, चालक - वाहकांच्या आडमुठेपणामुळे प्रवासी मात्र वेठीस धरले जात आहेत. याबाबत विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांच्याशी चर्चा केली असता बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनातर्फे कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा गावोगावी पोहोचली आहे. प्रवासी न घेतल्याच्या वादातून प्रवाशांच्या तक्रारीवर निर्णय घेत असताना चालकाची बदली शहरी वाहतुकीतून ग्रामीण फेरीसाठी करण्यात आली. त्यावर कर्मचारी संघटनांनी अचानक बंद पुकारल्यामुळे प्रवाशांचे नुकसान झाले. संबंधित बदली प्रकरण इतके गाजत आहे की, त्यामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे.शहरी गाड्यांमधील नियम व क्षमतेप्रमाणे ४४+११ इतके प्रवासी काल घेण्यात आले. प्रिंदवणे, चिंचखरी, शिरगाव, म्हामूरवाडी, काळबादेवी, भावेआडोम या मार्गावरील थांब्यांवरचे प्रवासी न घेता केवळ ५५ प्रवाशांवरतीच वाहतूक करण्यात आली. यामुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, वृद्ध, महिला प्रवाशांचे अतोनात हाल झाले.एस. टी.च स्पीड लॉक करून वेगावर मर्यादा आणल्याची तक्रार चालकांकडून होत आहे. परिणामी तीव्र वळणांवर किंवा चढण चढताना त्रास होतो. याबाबत विभाग नियंत्रक देशमुख यांनी वाढते अपघात, दुरुस्ती खर्च व डिझेल खर्च यावर नियंत्रण आणले जात असतानाच स्पीड लॉक करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय महामंडळाचा आहे. महामंडळातील विविध आगारांमध्ये गाड्यांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी स्पीड लॉकचा वापर करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.४४० चालकांपैकी काही नवीन चालक रत्नागिरी विभागामध्ये रुजू झाले आहेत. त्यामुळे यापुढे डबल ड्युटीचा ताण कमी होणार आहे. यापुढे चालकांना सलग दुहेरी ड्युटी करता येणार नाही. जेणेकरुन चालकांवरील ताण कमी होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांसाठी प्रशासन नेहमीच बांधील असताना कर्मचारी प्रवाशांना वेठीस धरु पाहात असतील, तर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)