शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बसचालकांच्या आडमुठेपणामुळे प्रवासी वेठीस

By admin | Updated: December 23, 2014 23:44 IST

के. बी. देशमुख : बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

रत्नागिरी : कर्मचारी बदली प्रकरण गेले आठवडाभर गाजत असून, चालक - वाहकांच्या आडमुठेपणामुळे प्रवासी मात्र वेठीस धरले जात आहेत. याबाबत विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांच्याशी चर्चा केली असता बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनातर्फे कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा गावोगावी पोहोचली आहे. प्रवासी न घेतल्याच्या वादातून प्रवाशांच्या तक्रारीवर निर्णय घेत असताना चालकाची बदली शहरी वाहतुकीतून ग्रामीण फेरीसाठी करण्यात आली. त्यावर कर्मचारी संघटनांनी अचानक बंद पुकारल्यामुळे प्रवाशांचे नुकसान झाले. संबंधित बदली प्रकरण इतके गाजत आहे की, त्यामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे.शहरी गाड्यांमधील नियम व क्षमतेप्रमाणे ४४+११ इतके प्रवासी काल घेण्यात आले. प्रिंदवणे, चिंचखरी, शिरगाव, म्हामूरवाडी, काळबादेवी, भावेआडोम या मार्गावरील थांब्यांवरचे प्रवासी न घेता केवळ ५५ प्रवाशांवरतीच वाहतूक करण्यात आली. यामुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, वृद्ध, महिला प्रवाशांचे अतोनात हाल झाले.एस. टी.च स्पीड लॉक करून वेगावर मर्यादा आणल्याची तक्रार चालकांकडून होत आहे. परिणामी तीव्र वळणांवर किंवा चढण चढताना त्रास होतो. याबाबत विभाग नियंत्रक देशमुख यांनी वाढते अपघात, दुरुस्ती खर्च व डिझेल खर्च यावर नियंत्रण आणले जात असतानाच स्पीड लॉक करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय महामंडळाचा आहे. महामंडळातील विविध आगारांमध्ये गाड्यांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी स्पीड लॉकचा वापर करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.४४० चालकांपैकी काही नवीन चालक रत्नागिरी विभागामध्ये रुजू झाले आहेत. त्यामुळे यापुढे डबल ड्युटीचा ताण कमी होणार आहे. यापुढे चालकांना सलग दुहेरी ड्युटी करता येणार नाही. जेणेकरुन चालकांवरील ताण कमी होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांसाठी प्रशासन नेहमीच बांधील असताना कर्मचारी प्रवाशांना वेठीस धरु पाहात असतील, तर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)