शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
2
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
3
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
4
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
5
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
6
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
7
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
8
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
9
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
10
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
11
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
12
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
13
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
14
"आपणच क्रॅश करवलं एअर इंडियाचं विमान...!"; प्रेमाला नकार दिल्याने बॉयफ्रेंडला अडकवण्यासाठी रचला असा कट
15
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
16
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
17
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
18
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
19
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
20
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?

बसचालकांच्या आडमुठेपणामुळे प्रवासी वेठीस

By admin | Updated: December 23, 2014 23:44 IST

के. बी. देशमुख : बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार

रत्नागिरी : कर्मचारी बदली प्रकरण गेले आठवडाभर गाजत असून, चालक - वाहकांच्या आडमुठेपणामुळे प्रवासी मात्र वेठीस धरले जात आहेत. याबाबत विभाग नियंत्रक के. बी. देशमुख यांच्याशी चर्चा केली असता बेजबाबदार वागणाऱ्या कर्मचाऱ्यांवर प्रशासनातर्फे कारवाई केली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले.प्रवाशांच्या सेवेसाठी ब्रीद वाक्य असलेल्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाची सेवा गावोगावी पोहोचली आहे. प्रवासी न घेतल्याच्या वादातून प्रवाशांच्या तक्रारीवर निर्णय घेत असताना चालकाची बदली शहरी वाहतुकीतून ग्रामीण फेरीसाठी करण्यात आली. त्यावर कर्मचारी संघटनांनी अचानक बंद पुकारल्यामुळे प्रवाशांचे नुकसान झाले. संबंधित बदली प्रकरण इतके गाजत आहे की, त्यामुळे प्रवाशांना त्याचा नाहक त्रास होत आहे.शहरी गाड्यांमधील नियम व क्षमतेप्रमाणे ४४+११ इतके प्रवासी काल घेण्यात आले. प्रिंदवणे, चिंचखरी, शिरगाव, म्हामूरवाडी, काळबादेवी, भावेआडोम या मार्गावरील थांब्यांवरचे प्रवासी न घेता केवळ ५५ प्रवाशांवरतीच वाहतूक करण्यात आली. यामुळे शाळकरी विद्यार्थी, नोकरदार, वृद्ध, महिला प्रवाशांचे अतोनात हाल झाले.एस. टी.च स्पीड लॉक करून वेगावर मर्यादा आणल्याची तक्रार चालकांकडून होत आहे. परिणामी तीव्र वळणांवर किंवा चढण चढताना त्रास होतो. याबाबत विभाग नियंत्रक देशमुख यांनी वाढते अपघात, दुरुस्ती खर्च व डिझेल खर्च यावर नियंत्रण आणले जात असतानाच स्पीड लॉक करण्यात आले आहे. मात्र, हा निर्णय महामंडळाचा आहे. महामंडळातील विविध आगारांमध्ये गाड्यांच्या वेगावर मर्यादा आणण्यासाठी स्पीड लॉकचा वापर करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले.४४० चालकांपैकी काही नवीन चालक रत्नागिरी विभागामध्ये रुजू झाले आहेत. त्यामुळे यापुढे डबल ड्युटीचा ताण कमी होणार आहे. यापुढे चालकांना सलग दुहेरी ड्युटी करता येणार नाही. जेणेकरुन चालकांवरील ताण कमी होणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांसाठी प्रशासन नेहमीच बांधील असताना कर्मचारी प्रवाशांना वेठीस धरु पाहात असतील, तर अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येणार असल्याचेही देशमुख यांनी सांगितले. (प्रतिनिधी)