शहरं
Join us  
Trending Stories
1
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
2
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
3
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
4
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
5
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
6
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
7
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
8
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
9
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
10
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
11
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
12
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
13
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
14
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
15
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
16
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
17
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
18
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
19
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
20
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं

कडक लॉकडाऊनमुळे एस.टी. बंद, मात्र खासगी वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST

राजापूर : तालुक्यातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राजापूर आगारातून गत सप्ताहात सुरू करण्यात आलेल्या राजापूर बोरिवली व ...

राजापूर : तालुक्यातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राजापूर आगारातून गत सप्ताहात सुरू करण्यात आलेल्या राजापूर बोरिवली व राजापूर नालासोपारा अर्नाळा या बसेस ३ जूनपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये एस.टी. वाहतूक बंद असताना काही खासगी वाहतूकदार मात्र राजरोसपणे प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे संतप्त भावना व्यक्त हाेत असून, एस.टी. आणि एस.टी़.तून प्रवास करणाऱ्यांमुळेच काेराेनाचा संसर्ग हाेताे का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत यापूर्वी व आताही मुंबईतून कोकणात येणाऱ्या आणि कोकणातून मुंबईत जाणाऱ्या कोकणी जनतेची गैरसोय होत आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून १५०० ते २००० रुपये तिकीट दर आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. खासगी प्रवासी वाहतूकदार लाॅकडाऊनमध्ये दामदुप्पट तिकीट दर आकारून आपली पाेळी भाजून घेत आहेत.

राजापूर आगारातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी राजापूर - बोरिवली व राजापूर - नालासोपारा - अर्नाळा या दोन गाड्या सुरू केल्या होत्या. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रसंगी प्रवाशांच्या सेवेसाठी तोटा सहन करून एस.टी़.ने ही वाहतूक सुरू केली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, ३ जूनपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या एस.टी़. बस सेवा बंद ठेवण्याचे आदेश आगार प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्या मंगळवारपासूनच बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात पाचल आणि नाटे भागात सुरू करण्यात आलेल्या दोन्ही फेऱ्याही बंद करण्यात आल्या आहेत. आता केवळ राजापूर, रत्नागिरी मार्गावरच दिवसभरात सहा बसेस सोडण्यात येत आहेत. लाॅकडाऊनमध्ये एस.टी. सेवा बंद असली तरी, खासगी वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.