शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
3
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
4
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
5
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
6
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
7
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
8
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
9
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
10
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
11
'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
12
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
13
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास
14
अल्पवयीन मुलीसोबत भाजपा नेत्याचा अश्लील व्हिडिओ व्हायरल; टीका होताच पक्षानं केली हकालपट्टी
15
Uttarakhand Cloudburst: डेहराडूनमध्ये ढगफुटी! दुकाने वाहून गेली, अनेक लोक बेपत्ता, बचावकार्य सुरू
16
महात्मा फुले योजनेत अवयव प्रत्यारोपणासह आता २,३९९ व्याधींवर होणार उपचार
17
"...त्यांची जीभ इतरांना जाब विचारताना अडखळत कशी नाही?"; भाजपाची शरद पवारांवर बोचरी टीका
18
ITR: इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची आज अखेरची संधी! आयकर विभागाने एका दिवसाने मुदत वाढवली
19
आजचे राशीभविष्य- १६ सप्टेंबर २०२५: मित्रांचा सहवास लाभेल, पण घरातील वातावरण बिघडण्याची शक्यता
20
पोलिस ठाण्यांत सीसीटीव्ही का नाहीत?, ही बेफिकिरीच; सर्वोच्च न्यायालय २६ सप्टेंबर रोजी आदेश देणार

कडक लॉकडाऊनमुळे एस.टी. बंद, मात्र खासगी वाहतूक सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2021 04:24 IST

राजापूर : तालुक्यातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राजापूर आगारातून गत सप्ताहात सुरू करण्यात आलेल्या राजापूर बोरिवली व ...

राजापूर : तालुक्यातून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी राजापूर आगारातून गत सप्ताहात सुरू करण्यात आलेल्या राजापूर बोरिवली व राजापूर नालासोपारा अर्नाळा या बसेस ३ जूनपासून सुरू होणाऱ्या कडक लॉकडाऊनमुळे बंद करण्यात आल्या आहेत. मात्र, लॉकडाऊनमध्ये एस.टी. वाहतूक बंद असताना काही खासगी वाहतूकदार मात्र राजरोसपणे प्रवासी वाहतूक करत आहेत. त्यामुळे संतप्त भावना व्यक्त हाेत असून, एस.टी. आणि एस.टी़.तून प्रवास करणाऱ्यांमुळेच काेराेनाचा संसर्ग हाेताे का, असा संतप्त प्रश्न उपस्थित केला जात आहे.

लॉकडाऊनच्या कालावधीत यापूर्वी व आताही मुंबईतून कोकणात येणाऱ्या आणि कोकणातून मुंबईत जाणाऱ्या कोकणी जनतेची गैरसोय होत आहे. खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून १५०० ते २००० रुपये तिकीट दर आकारून प्रवाशांची लूट केली जात आहे. मात्र, याबाबत प्रशासनाकडून कोणतीच कारवाई केली जात नाही. खासगी प्रवासी वाहतूकदार लाॅकडाऊनमध्ये दामदुप्पट तिकीट दर आकारून आपली पाेळी भाजून घेत आहेत.

राजापूर आगारातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांसाठी राजापूर - बोरिवली व राजापूर - नालासोपारा - अर्नाळा या दोन गाड्या सुरू केल्या होत्या. कोरोनाचे सर्व नियम पाळून प्रसंगी प्रवाशांच्या सेवेसाठी तोटा सहन करून एस.टी़.ने ही वाहतूक सुरू केली होती. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. मात्र, ३ जूनपासून जिल्ह्यात कडक लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्याबाहेर जाणाऱ्या एस.टी़. बस सेवा बंद ठेवण्याचे आदेश आगार प्रशासनाला देण्यात आले आहेत. त्यामुळे या दोन्ही गाड्या मंगळवारपासूनच बंद करण्यात आल्या आहेत. तसेच ग्रामीण भागात पाचल आणि नाटे भागात सुरू करण्यात आलेल्या दोन्ही फेऱ्याही बंद करण्यात आल्या आहेत. आता केवळ राजापूर, रत्नागिरी मार्गावरच दिवसभरात सहा बसेस सोडण्यात येत आहेत. लाॅकडाऊनमध्ये एस.टी. सेवा बंद असली तरी, खासगी वाहतूक सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.