शहरं
Join us  
Trending Stories
1
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
2
मोठी बातमी: पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार; भारत-पाक 'युद्धविरामा'बाबत काय बोलणार?
3
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य
4
श्रुती मराठेने विराट कोहलीसोबत जाहिरातीत केलं काम; अनुभव सांगत म्हणाली, "तो चक्क..."
5
Vikram Misri: जाहिरात क्षेत्रात नोकरी ते तीन पंतप्रधानांचे खासगी सचिव; कोण आहेत विक्रम मिस्री?
6
"मीही विराट कोहलीचा खूप मोठा फॅन..." भारतीय सैन्यदलाच्या पत्रकार परिषदेत म्हणाले DGMO !
7
सहकारी कारखान्यांची अवस्था..; अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री फडणवीसांना विनंती
8
तुर्की सरकारचा मोठा विजय, 40 वर्षांचा संघर्ष अखेर संपला; कुर्दीश बंडखोरांनी पत्करली शरणागती
9
मेजर प्रेरणा सिंह झाल्या लेफ्टनंट कर्नल; आजोबांना पाहून लहानपणीच पाहिलेलं देशसेवेचं स्वप्न
10
Viral Video : पठ्ठ्याने चक्क किंग कोब्रालाच घातली लोकरीची टोपी! खेळतोय तर असा जणू...
11
Operation Sindoor: 'पहलगाममध्ये दहशतवाद्यांच्या पापाचा घडा भरला अन् त्यानंतर...', भारताचे डीजीएमओ घई काय बोलले?
12
कोहलीच्या निवृत्तीनंतर क्रिकेटच्या देवाला आठवला तो 'धागा'; शेअर केली १२ वर्षांपूर्वीची खास गोष्ट
13
अरेरे! "तू खूप स्लो आहेस...", १३ तास ​​काम करुनही बसला बॉसचा ओरडा; फ्रेशरने मांडली व्यथा
14
Devendra Fadnavis: मुख्यमंत्री फडणवीसांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक; नागरी सुरक्षेच्या मुद्द्यावर चर्चा
15
Operation Sindoor : "चीनचं मिसाईल फ्लॉप, तुर्कस्तानचं ड्रोन पाडलं"; एअर मार्शल एके भारती यांनी पुरावेच दाखवले
16
'आमचे इस्लामिक सैन्य, आमचे कामच जिहाद', पाकिस्तानी लष्करप्रमुखाचा व्हिडिओ व्हायरल...
17
गुंतवणूकदारांची एकाच दिवसात ४ वर्षातील सर्वात मोठी कमाई! 'या' शेअरमध्ये प्रचंड वाढ
18
व्हेज बिर्याणीच्या गाडीवर लिहिलं होतं 'जय श्री श्याम', भाजप आमदार बालमुकुंद आचार्य संतापले अन्...
19
ड्रोन बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरनं 3 दिवसांत दिला 37% परतावा, 500 रुपयांवर पोहोचला शेअर
20
शाहरुख खानसोबत ३० वर्षांनी दिसणार 'हा' एव्हरग्रीन अभिनेता, 'किंग' सिनेमात झाली एन्ट्री

प्रवाशांच्या प्रतिसादामुळे एस. टी. सेवा अद्याप सुरळीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घोषित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध घोषित केले आहेत. मात्र अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. गतवर्षी लाॅकडाऊन काळात एसटीची चाके पूर्णत: थांबली होती. मात्र सध्या एस. टी. सेवा जिल्ह्यात सुरळीत सुरू असून, प्रवाशांचा अजून चांगला प्रतिसाद लाभत आहे.

शासनाने शनिवारी व रविवारी लाॅकडाऊन कडक करण्याच्या सूचना केल्या आहेत. नागरिकांना कारणाशिवाय घराबाहेर पडण्यास मज्जाव केला आहे. त्यामुळे शनिवारी व रविवारी प्रवाशांची संख्या विचारात घेऊनच संबंधित मार्गावरील प्रवासी सेवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एस. टी. प्रशासनाकडून त्याबाबत जिल्ह्यातील नऊ आगारांना सूचना देण्यात आल्या आहेत.

शासनाच्या सूचनेनुसार एस.टी.च्या प्रवासी क्षमतेनुसार प्रवासी वाहतूक सुरू आहे. उद्योग-व्यवसाय सुरू ठेवण्यासाठी परवानगी असल्याने तसेच खासगी आस्थापना सुरू असल्याने नोकरदारासांठी एस.टी.ने प्रवासी वाहतूक करणे सोपे झाले आहे. शाळा महाविद्यालये बंद असली, तरी कामगार तसेच अन्य प्रवाशांचा प्रतिसाद अद्याप बऱ्यापैकी लाभत असल्याने नऊ आगारांतील सर्व मार्गावरील बसफेऱ्या पूर्ववत सुरू आहेत.

जिल्ह्यातील नऊ आगारांमध्ये ६१० बसेसव्दारे ४२०० फेऱ्या सुरू आहेत. दररोज दोन ते सव्वादोन लाख प्रवाशांची वाहतूक करण्यात येत असून, दिवसाला ४७ ते ४८ लाख रुपयांचे उत्पन्न रत्नागिरी विभागाला प्राप्त होत आहे. मात्र दिवसाचा डिझेल खर्च ५० लाखांच्या घरात आहे. त्यामुळे प्राप्त उत्पन्नापेक्षा अधिक खर्च डिझेलसाठी होत आहे. याशिवाय स्पेअरपार्ट व अन्य खर्चासाठी महामंडळाकडून पैसे घ्यावे लागत आहेत. त्यामुळे सध्या व्यवसाय बुडीत असला, तरी अत्यावश्यक सेवा म्हणून प्रवासी वाहतूक सुरू आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत. शनिवार व रविवार दोन दिवस कडक लाॅकडाऊन घोषित केले आहे. अत्यावश्यक सुविधा असल्याने प्रवासी वाहतूक सुरू आहे. शासन नियमांचे पालन करून मास्कशिवाय एसटीत प्रवेश दिला जात नाही. तसेच प्रत्येक फेरीनंतर बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. शनिवार, रविवारी लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली असल्याने दोन दिवस प्रवाशांची संख्या विचारात घेऊन संबधित मार्गावरील फेऱ्या कमी-जास्त करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. तशा सूचना प्रत्येक आगाराला देण्यात आल्या आहेत.