शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

पावसामुळे भात लागवडीच्या कामांना प्रारंभ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:21 IST

जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. ६९ हजार ४७ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक ...

जिल्ह्यात सरासरी ३५९१ मिलिमीटर पाऊस पडतो. ६९ हजार ४७ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड केली जाते. दुय्यम पीक म्हणून नागली लावण्यात येत असून, १० हजार ९८ हेक्टर क्षेत्रावर नागली लागवड केली जाते. १.४९ हेक्टर क्षेत्रावर कडधान्य, ०.६३ हेक्टर क्षेत्रावर गळितधान्य तसेच ०.४७ हेक्टर क्षेत्रावर तृणधान्य लावण्यात येते.

पारंपरिक पध्दतीने भात लागवड करण्यापूर्वी रोपे काढून लागवड केली जाते. त्यामध्ये सुधारित लागवड पध्दत, चारसुत्री लागवड, ‘श्री’ (एस. आर. आय.) लागवड, ड्रम सिडरने तसेच तिफणीच्या सहाय्याने पेरणी करण्यात येते. रोहिणी किंवा मृग नक्षत्रातच भात पेरणी केली जाते. साधारणत: वीस ते एकवीस दिवसांच्या रोपांची लागवड केली जात असल्याने जिल्ह्यातील विविध भागात शेतकऱ्यांनी भात लागवडीला प्रारंभ केला आहे.

पारंपरिक पध्दतीने भात बियाण्यांची पेरणी केली जाते. त्यानंतर रोपे काढून लागवड पध्दत प्रचलित आहे. पेरणीपूर्वी पेरणी क्षेत्राची भाजावळ करण्याची पध्दतही प्रचलित आहे. कृषी विद्यापीठातर्फे चारसुत्री पध्दत विकसित करण्यात आली आहे. एकाचवेळी भात बियाणे विशिष्ट अंतरावर पेरल्यानंतर पुन्हा लागवडीसाठी रोपे न काढता त्याचपध्दतीने रोपे उगवून पीक घेण्यात येत असल्याने सुधारित तंत्रज्ञानाचा वापरही शेतकरी करू लागले आहेत.

शासनाकडून शेतीला प्रोत्साहन देण्यात येत असल्यामुळे शेतकऱ्यांना बियाण्यांचे वाटप करण्यात आले आहे. सुधारित व संकरीत बियाण्यांचा वापर उत्पादकता वाढविण्यासाठी प्रमुख तंत्रज्ञान असून, अधिक उत्पादन मिळविण्यासाठी सुधारित व संकरीत बियाण्यांचाही वापर शेतकरी करू लागले आहेत. राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत भात बियाणे साखळी विकसित करणे तृणधान्य विकास कार्यक्रम १९९४-९५पासून राबविण्यात येत आहे. भात पिकाची प्रतिहेक्टरी उत्पादकता वाढविणे हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. या योजनेंतर्गत प्रात्यक्षिके घेण्यात येतात. या योजनेंतर्गत भाताची उत्पादकता वाढली असून, हेक्टरी २४.४३ क्विंटल झाली आहे. नागलीची उत्पादकता हेक्टरी १२.०९, कडधान्य ६.५, गळीतधान्य ४.०५, इतर तृणधान्ये ५.५ क्विंटल इतकी आहे. त्यासाठी शेतकरी विद्यापीठ प्रमाणित सुधारित तंत्रज्ञानाचा अवलंब करत असतानाच खत, पाणी व्यवस्थापनाबरोबर कीड नियंत्रणाकडेही लक्ष केंद्रीत केले आहे. जिल्ह्यासाठी १३ हजार मेट्रिक टन खताचे आवंटन मंजूर झाले असून, आतापर्यंत दहा हजार मेट्रिक टन खत उपलब्ध झाले आहे. सेंद्रिय शेतीचे प्रमाण जिल्ह्यात वाढत असतानाच रासायनिक खतांचा वापर करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे.

कोट घ्यावा :

पारंपरिक पध्दतीने पेरण्या करून नंतर रोपे काढून लागवडीची पध्दत सर्रास अवलंबली जाते. पावसावर अवलंबून असलेली शेती करताना सुधारित तंत्राचा अवलंब केला तर नक्कीच उत्पादकता वाढण्यास मदत होईल. पेरणीपूर्वी मशागत, जमिनीनुसार बियाणे निवड, बीजप्रक्रिया, खत, पाणी व्यवस्थापन, लागवडीची पध्दत, तण नियंत्रणाबरोबर भात किडीवरील प्रमुख किडींचे नियंत्रण करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. लाल, काळा तांदूळ याचे वैद्यकीयदृष्ट्या असलेले महत्त्व लक्षात घेता यापासून पोहा, चुरमुराही तयार केला जातो. पोहा, चुरमुऱ्याला बाजारात चांगली मागणी असल्याने लाल तांदूळ, काळा तांदूळ लोकप्रिय होत आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या वाणांचा वापर शेतकरी करू लागले आहेत.

- विजय दळवी, संशोधन अधिकारी, भात संशोधन केंद्र, शिरगाव.