शहरं
Join us  
Trending Stories
1
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
2
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
3
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
4
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
5
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
6
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा
7
"कुठल्याही थेट युद्धातल्या विजयापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी केलं PM नरेंद्र मोदींचं कौतुक
8
Astro Tips: जे पुरुष घरात झाडूने साफसफाई करतात, ते झटपट श्रीमंत होतात; कसे ते पहा!
9
नालासोपाऱ्यात मेफेड्रोन ड्रग्सचा कारखाना उद्ध्वस्त, तुळींज पोलिसांची प्रगतीनगर परिसरात कारवाई
10
Virat Kohli: विराट कोहलीची जर्सी खरेदी करण्यासाठी चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चाहत्यांची झुंबड, व्हिडीओ होतोय व्हायरल!
11
पाकिस्तानविरुद्धच्या संघर्षादरम्यान या पिल्लांना सरकारने दिली झेड प्लस सुरक्षा, ७०० किमी दूर केली रवानगी
12
कॅन्सरसोबत झुंज ठरली अपयशी! ४४ वर्षीय प्रसिद्ध गायिकेचं निधन, चाहत्यांनी व्यक्त केली हळहळ
13
अरे बापरे! एका छोट्याशा चुकीमुळे होऊ शकतो प्रेशर कुकरचा भीषण स्फोट; सेफ्टीसाठी 'हे' करा
14
भारतीय सैन्याची मोठी तयारी!६ जण ठार, ११ जणांच्या खात्म्यासाठी ऑपरेशन; लष्कर -जैश'च्या दहशतवाद्यांचा शोध सुरू
15
Astro Tips: मुलांची दहावी, बारावी झाली की पालकांनी ग्रहदशा जाणून घेत मुलांचे करिअर ठरवणे उत्तम!
16
आयकर अधिकारी सांगून छगन भुजबळ यांच्याकडे मागितली एक कोटीची खंडणी; युवक अटकेत
17
पंख्याच्या हवेवरून वरातीत पेटला वाद, लाठ्या-काठ्या, दगड धोंडे घेऊन तुंबळ हाणामारी, एकाचा मृत्यू  
18
पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप, प्रसिद्ध युट्युबर ज्योती मल्होत्रा हिच्यासह सहा जण अटकेत
19
वेळीच व्हा सावध! टूथपेस्टमुळे होऊ शकतो कॅन्सर; 'हे' केमिकल बेतेल जीवावर, आताच घ्या काळजी
20
गुन्हेगारांना पकडण्यासाठी कालव्यात मारली उडी; तेव्हाच पडली विजेची तार, कॉन्स्टेबलचा मृत्यू

पुराच्या धसक्याने चिपळुणातील चाकरमान्यांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/ चिपळूण : गतवर्षी कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्वे मार्गावर तब्बल ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/ चिपळूण : गतवर्षी कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्वे मार्गावर तब्बल २२४ गणेशोत्सव विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच एस. टी. बसही जादा सोडण्यात आल्या आहेत. या सर्वच गाड्यांचे बुकिंग फुल्ल होते. चिपळुणात आतापर्यंत १६ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत; मात्र चिपळुणात पुराच्या धसक्याने अनेकांनी गणेशोत्सवाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत चाकरमान्यांची संख्या कमीच आहे.

चिपळुणात १६,५०० घरगुती तर १५ सार्वजनिक गणेशमूर्ती स्थानापन्न झाल्या आहेत. काेराेनामुळे सार्वजनिक गणपतींपैकी ५ गणपतींचे प्रथमच दीड दिवसाने विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाला चाकरमानी कोकणात एक दिवस का होईना हजेरी लावतो. गतवर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे फार चाकरमानी गावी आले नाहीत; मात्र यावर्षी काहीशी परिस्थिती नियंत्रणात असल्याने व रेल्वे आणि बस सेवा सुरु आहेत. कोकणात येणारी प्रत्येक गाडी हाऊसफुल्ल आहे, परंतु चिपळूणच्या बाबतीत काहीशी वेगळी परिस्थिती आहे.

चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुरात अतोनात नुकसान झाले. अजूनही येथील परिस्थिती स्थिर झालेली नाही. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुराचा धसका घेत अनेक चाकरमान्यांनी चिपळुणात येणे टाळल्याचे पुढे येत आहे. आतापर्यंत ७५ एस. टी. बस व खासगी वाहनांतून सुमारे १६ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. आतापर्यंत अन्य बस स्थानकातून ४०० बस फेऱ्या येथील आगारात दाखल झाल्या असून, अजूनही गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ सुरुच आहे. त्यामुळे सध्या रेल्वे स्टेशनसह बस स्थानकात आलेल्या चाकरमान्यांची लगबग पाहायला मिळत असली तरी ही संख्याही कमीच आहे.

----------------------

मुंबई, पुण्यातील ६० टक्के चाकरमान्यांचे लसीकरण

कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि प्रशासनाने केले आहे. सुरुवातीला प्रशासनाने दोन डोस न घेतलेल्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. मात्र, चाकरमान्यांच्या तोबा गर्दीमुळे ती शक्य नसल्याने ती चाचणी रॅपिडवर आणण्यात आली; मात्र तेही शक्य नसल्याने चाकरमान्यांची नोंदणी त्या त्या रेल्वेस्थानकांवर, बसस्थानकांवर करण्यात येत आहे. त्यानुसार ६० टक्के चाकरमान्यांनी दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली.