शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
4
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
5
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
6
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
7
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
8
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
9
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
10
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
11
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
12
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
13
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
14
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
15
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
16
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
17
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
18
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
19
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
20
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
Daily Top 2Weekly Top 5

पुराच्या धसक्याने चिपळुणातील चाकरमान्यांचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क संदीप बांद्रे/ चिपळूण : गतवर्षी कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्वे मार्गावर तब्बल ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

संदीप बांद्रे/ चिपळूण : गतवर्षी कोरोनामुळे रेल्वे गाड्या बंद होत्या. यंदा मात्र कोकण रेल्वे मार्गावर तब्बल २२४ गणेशोत्सव विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. तसेच एस. टी. बसही जादा सोडण्यात आल्या आहेत. या सर्वच गाड्यांचे बुकिंग फुल्ल होते. चिपळुणात आतापर्यंत १६ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत; मात्र चिपळुणात पुराच्या धसक्याने अनेकांनी गणेशोत्सवाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे दरवर्षीच्या तुलनेत चाकरमान्यांची संख्या कमीच आहे.

चिपळुणात १६,५०० घरगुती तर १५ सार्वजनिक गणेशमूर्ती स्थानापन्न झाल्या आहेत. काेराेनामुळे सार्वजनिक गणपतींपैकी ५ गणपतींचे प्रथमच दीड दिवसाने विसर्जन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार शनिवारी या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. गणेशोत्सवाला चाकरमानी कोकणात एक दिवस का होईना हजेरी लावतो. गतवर्षी कोरोनाच्या परिस्थितीमुळे फार चाकरमानी गावी आले नाहीत; मात्र यावर्षी काहीशी परिस्थिती नियंत्रणात असल्याने व रेल्वे आणि बस सेवा सुरु आहेत. कोकणात येणारी प्रत्येक गाडी हाऊसफुल्ल आहे, परंतु चिपळूणच्या बाबतीत काहीशी वेगळी परिस्थिती आहे.

चिपळुणात २२ व २३ जुलै रोजी आलेल्या महापुरात अतोनात नुकसान झाले. अजूनही येथील परिस्थिती स्थिर झालेली नाही. त्यानंतर चार दिवसांपूर्वीच येथे पूरसदृश स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे पुराचा धसका घेत अनेक चाकरमान्यांनी चिपळुणात येणे टाळल्याचे पुढे येत आहे. आतापर्यंत ७५ एस. टी. बस व खासगी वाहनांतून सुमारे १६ हजारांहून अधिक चाकरमानी दाखल झाले आहेत. आतापर्यंत अन्य बस स्थानकातून ४०० बस फेऱ्या येथील आगारात दाखल झाल्या असून, अजूनही गावी येणाऱ्या चाकरमान्यांचा ओघ सुरुच आहे. त्यामुळे सध्या रेल्वे स्टेशनसह बस स्थानकात आलेल्या चाकरमान्यांची लगबग पाहायला मिळत असली तरी ही संख्याही कमीच आहे.

----------------------

मुंबई, पुण्यातील ६० टक्के चाकरमान्यांचे लसीकरण

कोरोनाचे नियम पाळून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन मुख्यमंत्री आणि प्रशासनाने केले आहे. सुरुवातीला प्रशासनाने दोन डोस न घेतलेल्या चाकरमान्यांना आरटीपीसीआर चाचणी बंधनकारक केली होती. मात्र, चाकरमान्यांच्या तोबा गर्दीमुळे ती शक्य नसल्याने ती चाचणी रॅपिडवर आणण्यात आली; मात्र तेही शक्य नसल्याने चाकरमान्यांची नोंदणी त्या त्या रेल्वेस्थानकांवर, बसस्थानकांवर करण्यात येत आहे. त्यानुसार ६० टक्के चाकरमान्यांनी दोन्ही डोस घेतले असल्याची माहिती तहसीलदार जयराज सूर्यवंशी यांनी दिली.