शहरं
Join us  
Trending Stories
1
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
2
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
3
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
4
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
5
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
6
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
7
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
8
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
9
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
10
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
11
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
12
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
13
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
14
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
15
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
16
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
17
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
18
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
19
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
20
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी

बेफिकिरी नको; सावधानता हवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यातून एक लाख ९०० लोक आले आहेत. त्यापैकी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस व आरटीपीसीआर चाचणी केलेल्या सवलत ...

गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यातून एक लाख ९०० लोक आले आहेत. त्यापैकी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस व आरटीपीसीआर चाचणी केलेल्या सवलत देण्यात आली असून, ६१,९१६ मुंबईकरांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. प्रशासनाकडून ७२५ आरटीपीआर चाचण्या व ८ हजार १३५ मुंबईकरांची अँटिजन चाचणी करण्यात आली आहे. ३१ हजार १४० जण कोरोना चाचणीशिवाय गावात आले असून, त्यांची नावे ग्रामकृती दलाकडून पाठविण्यात आली असून, त्यांच्या चाचण्या करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही सूचना देण्यात आल्या असून तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. आपला जिल्हा भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेला आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सुविधा, औषधसाठा, आरोग्य यंत्रणा याचे भान बाळगून शासनाच्या नियमावलींचे पालन केले, लसीकरण व कोरोना चाचणीसाठी सहकार्य लाभले तर नक्की कोरोना आटोक्यात येण्यास मदत होईल. कोरोनाग्रस्तांची घटलेली संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाला साथ देण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून मोफत लसीकरण सुरू असतानाही, अद्याप काहींनी पहिला डोसही घेतलेला नाही. गावपातळीवर कोरोना चाचणी करण्यात येत असताना, भीतीमुळे ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभत नाही. शासनाकडून तर कोरोना उपचार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असली तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा वर्ग जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घेऊ शकतो. मात्र सर्वसामान्यांना शासकीय यंत्रणेवरच अवलंबून रहावे लागते. कोरोनाच्या धसक्यामुळे कित्येकांनी जीवही गमावले आहेत. परिणामी जिल्ह्यावर असलेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, परंतु प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून प्रशासनाला साथ देण्याची आवश्यकता आहे. बेफिकिरीऐवजी सावधानता, सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.