शहरं
Join us  
Trending Stories
1
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
2
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
3
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
4
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
5
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
6
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
7
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
8
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
9
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
10
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
11
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
12
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
13
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
14
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
15
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
16
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
17
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
18
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
19
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
20
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
Daily Top 2Weekly Top 5

बेफिकिरी नको; सावधानता हवी...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2021 04:37 IST

गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यातून एक लाख ९०० लोक आले आहेत. त्यापैकी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस व आरटीपीसीआर चाचणी केलेल्या सवलत ...

गणेशोत्सवासाठी मुंबई-पुण्यातून एक लाख ९०० लोक आले आहेत. त्यापैकी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणाचे दोन डोस व आरटीपीसीआर चाचणी केलेल्या सवलत देण्यात आली असून, ६१,९१६ मुंबईकरांना थेट प्रवेश देण्यात आला आहे. प्रशासनाकडून ७२५ आरटीपीआर चाचण्या व ८ हजार १३५ मुंबईकरांची अँटिजन चाचणी करण्यात आली आहे. ३१ हजार १४० जण कोरोना चाचणीशिवाय गावात आले असून, त्यांची नावे ग्रामकृती दलाकडून पाठविण्यात आली असून, त्यांच्या चाचण्या करण्याचे आदेश प्रशासनाने दिले असल्याने आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. त्यानुसार प्राथमिक आरोग्य केंद्रांनाही सूचना देण्यात आल्या असून तपासणीचे काम सुरू करण्यात आले आहे. आपला जिल्हा भौगोलिकदृष्ट्या डोंगरदऱ्यांमध्ये वसलेला आहे. जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या सुविधा, औषधसाठा, आरोग्य यंत्रणा याचे भान बाळगून शासनाच्या नियमावलींचे पालन केले, लसीकरण व कोरोना चाचणीसाठी सहकार्य लाभले तर नक्की कोरोना आटोक्यात येण्यास मदत होईल. कोरोनाग्रस्तांची घटलेली संख्या शून्यावर आणण्यासाठी प्रशासनाला साथ देण्याची आवश्यकता आहे. शासनाकडून मोफत लसीकरण सुरू असतानाही, अद्याप काहींनी पहिला डोसही घेतलेला नाही. गावपातळीवर कोरोना चाचणी करण्यात येत असताना, भीतीमुळे ग्रामस्थांचा प्रतिसाद लाभत नाही. शासनाकडून तर कोरोना उपचार केंद्रांची संख्या वाढविण्यात आली असली तरी आर्थिकदृष्ट्या सक्षम असणारा वर्ग जिल्ह्याबाहेर जाऊन उपचार घेऊ शकतो. मात्र सर्वसामान्यांना शासकीय यंत्रणेवरच अवलंबून रहावे लागते. कोरोनाच्या धसक्यामुळे कित्येकांनी जीवही गमावले आहेत. परिणामी जिल्ह्यावर असलेल्या संकटावर मात करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे, परंतु प्रत्येकाने आपले कर्तव्य ओळखून प्रशासनाला साथ देण्याची आवश्यकता आहे. बेफिकिरीऐवजी सावधानता, सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे.