शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तरुणांची डोकी भडकावू नका, त्यांच्या हाताला काम द्या : अरविंद लांजेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST

राजापूर : एकीकडे वाढती बेरोजगारी यामुळे राजापूर तालुक्यातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय बनले असताना येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला जात आहे. ...

राजापूर : एकीकडे वाढती बेरोजगारी यामुळे राजापूर तालुक्यातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय बनले असताना येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे आमदार राजन साळवी यांनी जन आशीर्वाद यात्रेचे बॅनर फाडून एक नवीन पायंडा घालून दिला आहे. तरुणांची डाेकी भडकावण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्या, असा सल्ला राजापूर तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अरविंद लांजेकर यांनी दिला आहे.

अरविंद लांजेकर प्रसार माध्यमांशी बाेलताना ते पुढे म्हणाले की, देशात, राज्यात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी राजापूर तालुक्याने नेहमीचे शांततेची परंपरा राखलेली आहे. शांत राजापुरात अनेक राजकीय सभा, अनेक सामाजिक राजकीय तसेच वैयक्तिक आजपर्यंत होत होते. पण असे प्रकार केव्हाच होत नव्हते. बॅनर फाडणे, झेंडे काढणे असे समाजकंटकासारखे आपल्या संस्कृतीत न बसणारे काम कोणीही करत नव्हते. प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यक्रम आनंदाने जो तो करत होते. मात्र, मंत्री नारायण राणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरीत जाऊन तेथे एक- दोन बॅनर फाडून सोशल मीडियावर व्हायरल करून अनेकांना अशा घटना करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच राजापुरातही त्याचे पडसाद उमटल्याचे लांजेकर म्हणाले. शिवसेना-भाजप दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आमने-सामने आले. याला राजापूरचे आमदार राजन साळवी हेच जबाबदार असल्याचा आराेपही त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्याऐवजी अशा कृतीतून भडकावण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळे शांत राजापूरच्या शांततेच्या परंपरेला गालबोट लागले. एका लोकप्रतिनिधींकडून असे कृत्य अपेक्षित नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे.

लांजेकर पुढे म्हणाले की, राजापूर मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, आरोग्य सुविधांची वानवा, विकास कामांच्या नावाने बोंब अशी परिस्थिती आहे. तरुण मंडळींना आजपर्यंत रोजगार न देता किंवा रोजगार न आणता किंवा एखादा प्रकल्प, उद्योगधंदा न आणता कोणतेही विधायक काम न करता एखादे हॉस्पिटल न आणता, असे नको ते वादग्रस्त उद्योग तरुण मंडळींना करण्यास भाग पाडले. या गोष्टीचा राजापूर मतदारसंघात निषेध व्हायला सुरुवात झाली. या लोकप्रतिनिधीने राजापूरसाठी काही न केलेल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी असे प्रकार करून तरुण मंडळींची माथी भडकवून हाती दगड देऊन अशा लोकप्रतिनिधींनी तरुण मंडळींसाठी किती उद्योग आणले, किती जणांना रोजगार दिला, किती जणांना नोकऱ्या लावल्या, हे विचारणे गरजेचे आहे, असेही लांजेकर यांनी म्हटले आहे.