शहरं
Join us  
Trending Stories
1
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
2
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
3
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
4
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
5
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
6
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
7
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
8
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
9
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
10
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
11
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
12
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
13
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
14
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
15
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
16
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
17
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?
18
भरधाव कारचा भीषण अपघातात! अनेक वेळा उलटल्यानं चुराडा, तरुणीही दूर फेकली गेली; बघा VIDEO
19
Omega Seiki: जगातील पहिली ड्रायव्हरलेस रिक्षा भारतात लॉन्च, एका चार्जवर १२० किमी धावणार!
20
महात्मा गांधींना शरण जाणे हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा वैचारिक पराभव; काँग्रेसचा खोचक टोला

तरुणांची डोकी भडकावू नका, त्यांच्या हाताला काम द्या : अरविंद लांजेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST

राजापूर : एकीकडे वाढती बेरोजगारी यामुळे राजापूर तालुक्यातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय बनले असताना येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला जात आहे. ...

राजापूर : एकीकडे वाढती बेरोजगारी यामुळे राजापूर तालुक्यातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय बनले असताना येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे आमदार राजन साळवी यांनी जन आशीर्वाद यात्रेचे बॅनर फाडून एक नवीन पायंडा घालून दिला आहे. तरुणांची डाेकी भडकावण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्या, असा सल्ला राजापूर तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अरविंद लांजेकर यांनी दिला आहे.

अरविंद लांजेकर प्रसार माध्यमांशी बाेलताना ते पुढे म्हणाले की, देशात, राज्यात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी राजापूर तालुक्याने नेहमीचे शांततेची परंपरा राखलेली आहे. शांत राजापुरात अनेक राजकीय सभा, अनेक सामाजिक राजकीय तसेच वैयक्तिक आजपर्यंत होत होते. पण असे प्रकार केव्हाच होत नव्हते. बॅनर फाडणे, झेंडे काढणे असे समाजकंटकासारखे आपल्या संस्कृतीत न बसणारे काम कोणीही करत नव्हते. प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यक्रम आनंदाने जो तो करत होते. मात्र, मंत्री नारायण राणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरीत जाऊन तेथे एक- दोन बॅनर फाडून सोशल मीडियावर व्हायरल करून अनेकांना अशा घटना करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच राजापुरातही त्याचे पडसाद उमटल्याचे लांजेकर म्हणाले. शिवसेना-भाजप दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आमने-सामने आले. याला राजापूरचे आमदार राजन साळवी हेच जबाबदार असल्याचा आराेपही त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्याऐवजी अशा कृतीतून भडकावण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळे शांत राजापूरच्या शांततेच्या परंपरेला गालबोट लागले. एका लोकप्रतिनिधींकडून असे कृत्य अपेक्षित नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे.

लांजेकर पुढे म्हणाले की, राजापूर मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, आरोग्य सुविधांची वानवा, विकास कामांच्या नावाने बोंब अशी परिस्थिती आहे. तरुण मंडळींना आजपर्यंत रोजगार न देता किंवा रोजगार न आणता किंवा एखादा प्रकल्प, उद्योगधंदा न आणता कोणतेही विधायक काम न करता एखादे हॉस्पिटल न आणता, असे नको ते वादग्रस्त उद्योग तरुण मंडळींना करण्यास भाग पाडले. या गोष्टीचा राजापूर मतदारसंघात निषेध व्हायला सुरुवात झाली. या लोकप्रतिनिधीने राजापूरसाठी काही न केलेल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी असे प्रकार करून तरुण मंडळींची माथी भडकवून हाती दगड देऊन अशा लोकप्रतिनिधींनी तरुण मंडळींसाठी किती उद्योग आणले, किती जणांना रोजगार दिला, किती जणांना नोकऱ्या लावल्या, हे विचारणे गरजेचे आहे, असेही लांजेकर यांनी म्हटले आहे.