शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतरमध्ये काश्मीरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हटला...
2
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
3
चिदंबरम थरूर यांच्या मार्गावर! आधी युद्धविरामवर मोदी सरकारला पाठिंबा; आता इंडिया आघाडीबाबत सवाल उपस्थित
4
मुंबई एअरपोर्टवरुन प्रवास करणाऱ्यांना आता अधिक खर्च करावा लागणार; 'या' शुल्कात मोठी वाढ, किती पैसे द्यावे लागणार?
5
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
6
SBI मध्ये ₹५ लाख जमा केल्यावर मिळेल ₹२ लाखांपेक्षा अधिक व्याज; पाहा १,२,३ आणि ५ वर्षांचं कॅलक्युलेशन
7
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
8
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
9
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
10
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
11
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
12
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
13
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
14
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
15
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
16
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
17
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
18
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
19
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
20
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान

तरुणांची डोकी भडकावू नका, त्यांच्या हाताला काम द्या : अरविंद लांजेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:34 IST

राजापूर : एकीकडे वाढती बेरोजगारी यामुळे राजापूर तालुक्यातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय बनले असताना येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला जात आहे. ...

राजापूर : एकीकडे वाढती बेरोजगारी यामुळे राजापूर तालुक्यातील तरुणांचे भवितव्य अंधकारमय बनले असताना येणाऱ्या प्रकल्पांना विरोध केला जात आहे. तर दुसरीकडे आमदार राजन साळवी यांनी जन आशीर्वाद यात्रेचे बॅनर फाडून एक नवीन पायंडा घालून दिला आहे. तरुणांची डाेकी भडकावण्यापेक्षा त्यांच्या हाताला काम द्या, असा सल्ला राजापूर तालुका भाजपा युवा मोर्चा सरचिटणीस अरविंद लांजेकर यांनी दिला आहे.

अरविंद लांजेकर प्रसार माध्यमांशी बाेलताना ते पुढे म्हणाले की, देशात, राज्यात कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी राजापूर तालुक्याने नेहमीचे शांततेची परंपरा राखलेली आहे. शांत राजापुरात अनेक राजकीय सभा, अनेक सामाजिक राजकीय तसेच वैयक्तिक आजपर्यंत होत होते. पण असे प्रकार केव्हाच होत नव्हते. बॅनर फाडणे, झेंडे काढणे असे समाजकंटकासारखे आपल्या संस्कृतीत न बसणारे काम कोणीही करत नव्हते. प्रत्येक राजकीय पक्षाचे कार्यक्रम आनंदाने जो तो करत होते. मात्र, मंत्री नारायण राणे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राजापूरचे आमदार राजन साळवी यांनी रत्नागिरीत जाऊन तेथे एक- दोन बॅनर फाडून सोशल मीडियावर व्हायरल करून अनेकांना अशा घटना करण्यास प्रवृत्त केले. त्यामुळेच राजापुरातही त्याचे पडसाद उमटल्याचे लांजेकर म्हणाले. शिवसेना-भाजप दोन्ही पक्षाचे पदाधिकारी आमने-सामने आले. याला राजापूरचे आमदार राजन साळवी हेच जबाबदार असल्याचा आराेपही त्यांनी केला आहे. लोकप्रतिनिधींनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेचे आवाहन करण्याऐवजी अशा कृतीतून भडकावण्याचाच प्रयत्न केला. त्यामुळे शांत राजापूरच्या शांततेच्या परंपरेला गालबोट लागले. एका लोकप्रतिनिधींकडून असे कृत्य अपेक्षित नव्हते, असेही त्यांनी म्हटले आहे.

लांजेकर पुढे म्हणाले की, राजापूर मतदारसंघात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, आरोग्य सुविधांची वानवा, विकास कामांच्या नावाने बोंब अशी परिस्थिती आहे. तरुण मंडळींना आजपर्यंत रोजगार न देता किंवा रोजगार न आणता किंवा एखादा प्रकल्प, उद्योगधंदा न आणता कोणतेही विधायक काम न करता एखादे हॉस्पिटल न आणता, असे नको ते वादग्रस्त उद्योग तरुण मंडळींना करण्यास भाग पाडले. या गोष्टीचा राजापूर मतदारसंघात निषेध व्हायला सुरुवात झाली. या लोकप्रतिनिधीने राजापूरसाठी काही न केलेल्या अपयशाचे खापर फोडण्यासाठी असे प्रकार करून तरुण मंडळींची माथी भडकवून हाती दगड देऊन अशा लोकप्रतिनिधींनी तरुण मंडळींसाठी किती उद्योग आणले, किती जणांना रोजगार दिला, किती जणांना नोकऱ्या लावल्या, हे विचारणे गरजेचे आहे, असेही लांजेकर यांनी म्हटले आहे.