शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणा नको...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

गेले काही दिवस संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, पडसे, तापसरीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ...

गेले काही दिवस संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, पडसे, तापसरीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण डॉक्टरांकडे जाणे टाळत आहेत. तर काही ठिकाणी आजार कोणताही असला तरी काही डॉक्टरही रुग्णांना तपासणीसाठी नकार दर्शवीत असल्याने अखेर जिल्ह्याबाहेर किंवा शहरातील डॉक्टरांकडे रुग्णांना घेऊन जावे लागत आहे. यामध्ये वेळही जातो, शिवाय नातेवाइकांचा मनस्तापही वाढत आहे. एकूणच विविध घटकांना कोरोनाचे पडसाद सोसावे लागत आहेत. कोरोनाची वाढलेली भीती, गैरसमज यामुळे जनतेच्या आरोग्यासाठी प्रबोधन होणेही गरजेचे आहे. त्यासाठी कोणी पुढे यावे, यापेक्षा गावपातळीवरच जनतेमध्ये जागृतता आणणे गरजेचे आहे. गैरसमज दूर करून आरोग्य सुरक्षा व घ्यावयाची खबरदारी, लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. कोरोनामुळे अर्थात प्रत्येकाची जबाबदारी वाढली असून त्याबाबत निव्वळ प्रबोधनाचे चार शब्द ऐकण्याऐवजी स्वत:मध्ये बदल घडवून आणणे रास्त ठरेल. आपल्यामुळे कुटुंबीय, समाज, गावाला वेठीला धरायला लावण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्य सुरक्षेबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

एकीकडे सर्व व्यवहार सुरू होण्याबाबत आग्रही भूमिका तर दुसरीकडे कोरोना संपला पाहिजे, अशी अपेक्षा याची सांगड घालताना, आरोग्य सुरक्षेबाबत घालण्यात आलेल्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. बाजारातील गर्दीद्वारे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसतो. तर काही ‘अति शहाणी’ मंडळी तर विनामास्क मस्त फिरत असतात. याबाबत अजून किती जागृतता हवी आहे? प्राथमिक स्तरावरील खबरदारी घेतली तर नक्कीच याचा फायदा होईल. विविध यंत्रणा कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच समाजातील प्रत्येक घटकाने साथ देणे गरजेचे आहे. वापरलेले मास्क रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. कित्येक दुचाकीस्वार आजही रस्त्यावरून येता-जाता बिनधास्त थुंकत असतात. एकीकडे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मंडळी धडपडत असतानाच दुसरीकडे मात्र निष्काळजी मंडळींचा त्रास अन्य लोकांना होत आहे. कोरोनामुळे अनेकांचे वेळापत्रक कोलमडले आहे. व्यवहारांची घडी सुरळीत होण्यासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. याची जाण असताना जाणूनबुजून दुर्लक्ष का करावे? एखाद्या विषयाची माहिती नसताना गैरसमज करून घेण्यापेक्षा, परिस्थती पाहून तरी स्वत:मध्ये बदल घडविणे काळाची गरज बनली आहे.

मेहरून नाकाडे