शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
4
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
5
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
6
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
7
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
8
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
9
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
10
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
11
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
12
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
13
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
14
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
15
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
16
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
17
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
18
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
19
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
20
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणा नको...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

गेले काही दिवस संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, पडसे, तापसरीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ...

गेले काही दिवस संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, पडसे, तापसरीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण डॉक्टरांकडे जाणे टाळत आहेत. तर काही ठिकाणी आजार कोणताही असला तरी काही डॉक्टरही रुग्णांना तपासणीसाठी नकार दर्शवीत असल्याने अखेर जिल्ह्याबाहेर किंवा शहरातील डॉक्टरांकडे रुग्णांना घेऊन जावे लागत आहे. यामध्ये वेळही जातो, शिवाय नातेवाइकांचा मनस्तापही वाढत आहे. एकूणच विविध घटकांना कोरोनाचे पडसाद सोसावे लागत आहेत. कोरोनाची वाढलेली भीती, गैरसमज यामुळे जनतेच्या आरोग्यासाठी प्रबोधन होणेही गरजेचे आहे. त्यासाठी कोणी पुढे यावे, यापेक्षा गावपातळीवरच जनतेमध्ये जागृतता आणणे गरजेचे आहे. गैरसमज दूर करून आरोग्य सुरक्षा व घ्यावयाची खबरदारी, लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. कोरोनामुळे अर्थात प्रत्येकाची जबाबदारी वाढली असून त्याबाबत निव्वळ प्रबोधनाचे चार शब्द ऐकण्याऐवजी स्वत:मध्ये बदल घडवून आणणे रास्त ठरेल. आपल्यामुळे कुटुंबीय, समाज, गावाला वेठीला धरायला लावण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्य सुरक्षेबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

एकीकडे सर्व व्यवहार सुरू होण्याबाबत आग्रही भूमिका तर दुसरीकडे कोरोना संपला पाहिजे, अशी अपेक्षा याची सांगड घालताना, आरोग्य सुरक्षेबाबत घालण्यात आलेल्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. बाजारातील गर्दीद्वारे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसतो. तर काही ‘अति शहाणी’ मंडळी तर विनामास्क मस्त फिरत असतात. याबाबत अजून किती जागृतता हवी आहे? प्राथमिक स्तरावरील खबरदारी घेतली तर नक्कीच याचा फायदा होईल. विविध यंत्रणा कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच समाजातील प्रत्येक घटकाने साथ देणे गरजेचे आहे. वापरलेले मास्क रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. कित्येक दुचाकीस्वार आजही रस्त्यावरून येता-जाता बिनधास्त थुंकत असतात. एकीकडे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मंडळी धडपडत असतानाच दुसरीकडे मात्र निष्काळजी मंडळींचा त्रास अन्य लोकांना होत आहे. कोरोनामुळे अनेकांचे वेळापत्रक कोलमडले आहे. व्यवहारांची घडी सुरळीत होण्यासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. याची जाण असताना जाणूनबुजून दुर्लक्ष का करावे? एखाद्या विषयाची माहिती नसताना गैरसमज करून घेण्यापेक्षा, परिस्थती पाहून तरी स्वत:मध्ये बदल घडविणे काळाची गरज बनली आहे.

मेहरून नाकाडे