शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

निष्काळजीपणा नको...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

गेले काही दिवस संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, पडसे, तापसरीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे ...

गेले काही दिवस संततधार पर्जन्यवृष्टी सुरू आहे. हवामानातील बदलामुळे सर्दी, पडसे, तापसरीसारख्या आजारांनी डोके वर काढले आहे. कोरोनाच्या भीतीमुळे रुग्ण डॉक्टरांकडे जाणे टाळत आहेत. तर काही ठिकाणी आजार कोणताही असला तरी काही डॉक्टरही रुग्णांना तपासणीसाठी नकार दर्शवीत असल्याने अखेर जिल्ह्याबाहेर किंवा शहरातील डॉक्टरांकडे रुग्णांना घेऊन जावे लागत आहे. यामध्ये वेळही जातो, शिवाय नातेवाइकांचा मनस्तापही वाढत आहे. एकूणच विविध घटकांना कोरोनाचे पडसाद सोसावे लागत आहेत. कोरोनाची वाढलेली भीती, गैरसमज यामुळे जनतेच्या आरोग्यासाठी प्रबोधन होणेही गरजेचे आहे. त्यासाठी कोणी पुढे यावे, यापेक्षा गावपातळीवरच जनतेमध्ये जागृतता आणणे गरजेचे आहे. गैरसमज दूर करून आरोग्य सुरक्षा व घ्यावयाची खबरदारी, लसीकरणाचे महत्त्व पटवून देणे गरजेचे आहे. कोरोनामुळे अर्थात प्रत्येकाची जबाबदारी वाढली असून त्याबाबत निव्वळ प्रबोधनाचे चार शब्द ऐकण्याऐवजी स्वत:मध्ये बदल घडवून आणणे रास्त ठरेल. आपल्यामुळे कुटुंबीय, समाज, गावाला वेठीला धरायला लावण्यापेक्षा प्रत्येकाने स्वत:च्या आरोग्य सुरक्षेबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे.

एकीकडे सर्व व्यवहार सुरू होण्याबाबत आग्रही भूमिका तर दुसरीकडे कोरोना संपला पाहिजे, अशी अपेक्षा याची सांगड घालताना, आरोग्य सुरक्षेबाबत घालण्यात आलेल्या नियमांचे पालन होणे गरजेचे आहे. बाजारातील गर्दीद्वारे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला दिसतो. तर काही ‘अति शहाणी’ मंडळी तर विनामास्क मस्त फिरत असतात. याबाबत अजून किती जागृतता हवी आहे? प्राथमिक स्तरावरील खबरदारी घेतली तर नक्कीच याचा फायदा होईल. विविध यंत्रणा कोरोना संक्रमण साखळी तोडण्यासाठी प्रयत्न करीत असतानाच समाजातील प्रत्येक घटकाने साथ देणे गरजेचे आहे. वापरलेले मास्क रस्त्यावर फेकून देण्यापेक्षा त्याची योग्य विल्हेवाट लावणे गरजेचे आहे. कित्येक दुचाकीस्वार आजही रस्त्यावरून येता-जाता बिनधास्त थुंकत असतात. एकीकडे स्वत:च्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी मंडळी धडपडत असतानाच दुसरीकडे मात्र निष्काळजी मंडळींचा त्रास अन्य लोकांना होत आहे. कोरोनामुळे अनेकांचे वेळापत्रक कोलमडले आहे. व्यवहारांची घडी सुरळीत होण्यासाठी अजून काही महिने प्रतीक्षा करावी लागणार आहे. याची जाण असताना जाणूनबुजून दुर्लक्ष का करावे? एखाद्या विषयाची माहिती नसताना गैरसमज करून घेण्यापेक्षा, परिस्थती पाहून तरी स्वत:मध्ये बदल घडविणे काळाची गरज बनली आहे.

मेहरून नाकाडे