शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मंत्र्यांचे दाैरे सांभाळायचे की काम करायचे? यंत्रणा हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

रत्नागिरी : २० ते २२ जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण केली. जिल्ह्यात चिपळूण आणि ...

रत्नागिरी : २० ते २२ जुलै या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीने राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण केली. जिल्ह्यात चिपळूण आणि खेड या तालुक्यांना याचा अधिक फटका बसला. मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी झालेल्या या तालुक्यांमध्ये तातडीने मदतकार्य करण्यात प्रशासकीय यंत्रणा गुंतलेली असतानाच पहिल्या दिवसापासून विविध मंत्र्यांचे दौरे सुरू झाल्याने दौरे सांभाळायचे की काम करायचे, या प्रश्नाने हैराण झाली आहे.

बुधवारी रात्रीपासून चिपळुणात अतिवृष्टी, वाशिष्ठीला आलेला पूर यामुळे महाप्रलयाचे स्वरूप निर्माण झाले. खेड, राजापूर आणि रत्नागिरी आदी तालुक्यांनाही पुराचा फटका बसला. सर्वाधिक नुकसान चिपळूणमध्ये झाले. चिपळूण आणि खेड तालुक्यांमध्ये महापुराप्रमाणेच गावांमध्ये दरड कोसळून अनेक बळी गेले. बुधवारी रात्रीपासून बचाव कार्यात प्रशासनाच्या विविध यंत्रणा गुंतल्या आहेत. आपत्तीग्रस्तांना तातडीने मदत मिळावी, यासाठी जलदगतीने पंचनामे करण्याचे नियोजन सुरू असतानाच दुसऱ्या दिवसांपासून विविध मंत्र्यांचे दौरे सुरू झाले आहेत.

गुरुवारी पालकमंत्री अ‍ॅड. अनिल परब, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत रत्नागिरीत होते. मध्यरात्रीपासून चिपळुणात पुराचा हाहाकार उडाला असूनही जिल्हा प्रशासनाच्या बैठका दुपारपर्यंत सुरूच होत्या. त्यामुळे गुरुवारी सकाळीच पूरग्रस्तांच्या बचावाचे काम तातडीने होणे गरजेचे असतानाही कुठलीच यंत्रणा बचावकार्यासाठी पोहोचू शकली नाही. त्यामुळे स्थानिकांनीच सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीने बचावकार्य सुरू केले. उशिरा पोहोचलेल्या प्रशासकीय यंत्रणेने त्यानंतरही मदतकार्याला सुरुवात केली; परंतु पूर ओसरल्यानंतर पुन्हा राजकीय नेत्यांचे दौरे सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, केंद्रीय मंत्री नारायण राणे, विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, पालकमंत्री अनिल परब, राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे आणि गुरुवारी ऊर्जा मंत्री नितीन राऊत आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा दौरा झाला.

सध्या चिपळूण, खेडमध्ये पुराने चिखल माजला आहे. तेथील लोकांना जीवनावश्यक वस्तूंच्या मदतीची गरज असल्याने प्रशासकीय यंत्रणा, विविध सामाजिक संस्था, संघटना आणि कार्यकर्ते यांच्या सहकार्याने मदतकार्य करत असतानाच पहिल्या दिवसांपासून सुरू झालेल्या या राजकीय दाैऱ्यांमुळे त्यांचेही नियोजन करताना या यंत्रणा मेटाकुटीस येत आहेत. अन्य कर्मचाऱ्यांबरोबरच अपुरे पोलीसबळही वेठीला लागत आहे. त्यामुळे मदतकार्याबरोबरच पंचनामे करताना अडचणी येत आहेत. पूरग्रस्तांना मदतीपेक्षा आढावा बैठकाच अधिक होत असल्याने मदतकार्य बाजूला रहात आहे. अधिकारी, कर्मचारी आणि पूरबाधित नागरिकही या राजकीय दाैऱ्यांना वैतागले आहेत. त्यामुळे आता हे दाैरे पुरे करा, आम्हाला काम करू द्या, अशा तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.