शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

चायनीज खाताय की पाेटांच्या आजारांना निमंत्रण देताय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : भारतीय पदार्थांची खरी लज्जत मसाल्यांमध्ये असते. त्या तुलनेत चायनीज पदार्थ मिळमिळीत असतात. त्यामुळे त्याची ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : भारतीय पदार्थांची खरी लज्जत मसाल्यांमध्ये असते. त्या तुलनेत चायनीज पदार्थ मिळमिळीत असतात. त्यामुळे त्याची लज्जत वाढविण्यासाठी त्यात अजिनोमोटो हा चायनीज पदार्थ मिसळला जातो. सध्या चायनीज पदार्थांचे वेड मुलांनाच नव्हे तर सर्व वयोगटांतील व्यक्तींना लागले आहे. मात्र, चायनीज खाणे आरोग्याला अपायकारक ठरत असून पोटाच्या आजारांना निमंत्रण देणारे ठरत आहे.

चायनीज खाण्याचे वेड वाढले आहे; परंतु यात चवीसाठी वापरल्या जाणाऱ्या अजिनोमोटोच्या अर्थात सोडियम सॉल्ट ऑफ ग्लुटॅमिक ॲसिड याच्या अतिसेवनामुळे आकलनशक्ती आणि स्मरणशक्तीवर दुष्परिणाम परिणाम होतो. शरीरात अतिप्रमाणात अजिनोमोटो हे फूड ॲडक्टीव्ह गेल्यास पॅनिक अटॅक येणं, गरगरणे अशा समस्या वाढतात.

..........

काय आहे अजिनाेमाेटाे?

भारतीय पदार्थांमध्ये खरी लज्जत मसाल्यांमध्ये असते. त्या तुलनेत चायनीज पदार्थ मिळमिळीत असतात. त्यांना अधिक चविष्ट करण्यासाठी अजिनोमोटोचा वापर केला जातो. अजिनोमोटो म्हणजेच Monosodium glutamate (MSG). याचा वापर करून विशिष्ट पदार्थांचे आकर्षण वाढविले जाते. मात्र, या पदार्थाच्या अतिसेवनामुळे लहान मुलांमध्ये लठ्ठपणा वाढतो. तसेच मेंदू, यकृत, डोकेदुखी हे आजार वाढतात तसेच भुकेवरही परिणाम होतो.

................

...म्हणून चायनिज खाणे टाळा....

अजिनोमोटोचा आहारात अति प्रमाणात समावेश झाल्यास मेटॅबॉलिक सिंड्रोम आणि लठ्ठपणाचा त्रास वाढतो. अजिनोमोटोमुळे कार्डियोव्हसक्युलर म्हणजेच हृदयविकार वाढतात, रक्तदाबाचा त्रास वाढतो तसेच मधुमेह बळावण्याची शक्यता वाढते. मेटॅबॉलिझम मंदावण्यास कारणीभूत ठरतात. विविध व्याधी निर्माण होत असल्याने अजिनोमोटोचा समावेश असलेले चायनीज खाणे टाळण्याचा सल्ला आरोग्यतज्ज्ञ देतात.

.........

- चायनीजच्या अतिसेवनामुळे मेंदूवर परिणाम होतो.

- आकलनशक्ती, स्मरणशक्ती कमी होण्याचा धोका वाढतो.

- यकृत, हृदय विकार, रक्तदाब, मधुमेह यासारखे आजार वाढतात

- भूकेवर परिणाम होतो, त्याचबरोबर लठ्ठपणा वाढतो.

...............

चायनीज पदार्थांमध्ये वापरले जाणारे रंग, लठ्ठपणा तसेच इतर विकार वाढविणारा हानिकारक अजिनोमोटो हा पदार्थ आणि प्रमाणापेक्षा अधिक खाद्यतेलाचा वापर यामुळे चायनीज पदार्थ अपायकारक ठरत असल्याने त्याचे अतिसेवन टाळणे, आरोग्याच्या दृष्टीने गरजेचे आहे.

- डाॅ. कल्पना मेहता, मधुमेह तज्ज्ञ रत्नागिरी