शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
2
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
3
काका-पुतणे पुन्हा एकत्र येणार? शरद पवार पक्षाच्या बैठकीत कशाबद्दल चर्चा? वाचा
4
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द
5
बलुचिस्तान आता पाकिस्तानचा भाग नाही, बलूच नेत्यांनी केली स्वातंत्र्याची घोषणा, भारतासह जगाकडे मागितला पाठिंबा  
6
आधी चिनी एअर डिफेन्स सिस्टिमला केलं झटक्यात जॅम, नंतर भारताने पाकिस्तानचा केला करेक्ट कार्यक्रम   
7
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
8
आधी ग्राहकांना फोटो दाखवायची, नंतर त्यांच्यासोबत लॉजमध्ये पाठवायची; पालघरमधील सेक्स रॅकेटचा पर्दाफाश
9
सीसीटीव्ही लावा, कर्मचाऱ्यांची अल्कोहल टेस्ट करा आणि...; राज्य सरकारची शाळांसाठी नवी नियमावली
10
युद्धविराम झाला, पण घशाची कोरड कायम, पाकिस्तानने भारताला पत्र लिहून केली अशी विनंती
11
युद्धविरामाची घोषणा आधी ट्रम्प यांनी का केली? काँग्रेसचा पंतप्रधान मोदींना प्रश्न
12
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
13
चेहरा सुजला, आईच्या कुशीतच जीव सोडला; हेअर ट्रान्सप्लांटमुळे आणखी एका तरुणाचा मृत्यू
14
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
15
नायब सुभेदार ते लेफ्टनंट कर्नल! भारताचा गोल्डन बॉय नीरज चोप्राचा आर्मीसोबतचा खास प्रवास
16
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
17
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
18
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
19
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
20
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर येत असल्याने मुख्यस्रोतात पुराचे पाणी मिसळून पाणी गढूळ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर येत असल्याने मुख्यस्रोतात पुराचे पाणी मिसळून पाणी गढूळ होते. दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याचे शुद्धीकरण केले जात असले तरी शहरातील अंतर्गत वाहिन्यांना गळती असल्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून गाळून पिणे गरजेचे आहे.

दूषित पाणी व हवामानातील बदलामुळे साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिक कोरोनाच्या भीतीमुळे डाॅक्टरांकडे जाण्याऐवजी घरातच उपचार घेतात. पाण्याच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे.

दूषित पाण्यामुळे

होणारे आजार

उलटी, जुलाब किंवा अतिसाराचा धोका

कावीळ होण्याची असते शक्यता

गॅस्ट्रोमुळे शरीर कोरडे पडण्याचा धोका

विषमज्वरासारख्या तापाची असते शक्यता. तापामुळे शरीरातील पेशींची होते घट.

आजाराची लक्षणे

एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पाण्यासारखे शाैचास होणे.

उलटी, ताप येणे, लघवी पिवळी होणे, भूक मंदावणे,

जुलाब होऊन शरीरातील पाणी कमी होते.

सलग चार ते पाच दिवस सतत ताप येतो. पोटात दुखते, वेळीच उपचाराची आवश्यकता असते.

रत्नागिरीकर पितात दररोज एक कोटी ८० लिटर पाणी

शहराची लोकसंख्या ७६ हजार २२९ आहे. नगर परिषद हद्दीत अकरा हजार नळपाणी जोडण्या असून, शहराला दररोज एक कोटी २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. साळवी स्टाॅप जलशुद्धीकरण केंद्रात गॅस क्लोरिनचा वापर करून पाणी शुद्ध केले जाते. गढुळता कमी करण्यासाठी पाॅलिॲल्युमिनियम क्लोराइडचा वापर करण्यात येतो.

पाणी उकळून प्यायलेले बरे

पावसाळ्यात नदी, ओढ्यांना पूर येतो. पुराचे पाणी मुख्य प्राण्याच्या स्रोतात मिसळल्याने पाणी गढूळ होते. त्यामुळे पाणी उकळून, गाळून पिणे नक्कीच फायदेशीर आहे.