शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरापर्यंत सुरू होती धुमश्चक्री; पाकचे हल्ले भारताने हवेतच उधळले
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
'आम्ही भारत आणि पाकिस्तानला शस्त्रे टाकण्यास सांगू शकत नाही' : जेडी व्हेन्स
4
पुन्हा पाकिस्तानमध्ये घुसून हल्ला; इस्रायल मेड ड्रोनने केली लाहोरची डिफेन्स सिस्टिम ध्वस्त
5
शरद पवार बोलले, त्याचा नक्की अर्थ काय घ्यायचा?
6
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
7
मसूद अझहरचा लहान भाऊ अब्दुल रौफ अझहर ऑपरेशन सिंदूरमध्ये ठार
8
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
9
'मैं भी अगर मारा जाता तो अच्छा होता!' कोण हा मसूद अझर? - आठवून पाहा...
10
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
11
अजित पवारांसोबत जायचे का हे नवी पिढी ठरवेल, मी त्या प्रक्रियेत नाही : शरद पवार
12
संपादकीय : सावध, हे युद्ध छुपेही आहे!
13
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
14
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
15
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
16
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
17
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
18
Operation Sindoor Live Updates: एलओसीवर स्फोटांचे आवाज, जम्मूमध्ये पूर्णपणे ब्लॅकआऊट
19
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
20
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...

जिल्हानिहाय आराखडा लवकरच तयार होणार

By admin | Updated: February 8, 2015 01:04 IST

जलयुक्त शिवार अभियान : जिल्ह्यातील ४५ गावांची निवड

रत्नागिरी : ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४५ गावांची निवड करण्यात आली आहे. हे अभियान राबवण्यासाठी जिल्हानिहाय आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे. राज्यात सतत उद्भवणारी पाणीटंचाई विचारात घेऊन हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्हानिहाय आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात शासनाच्या विविध योजनांतर्गत उपलब्ध होणारा निधी, मनरेगा निधीचाही विनियोग करण्यात येणार आहे. तसेच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, खासगी उद्योगांचे सीएसआरअंतर्गत सहकार्य, सहकारी संस्था आणि लोकसहभाग याचा विचार करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावातील पाणीटंचाई समस्या सोडविणारी कामे हाती घेण्यावर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. राज्याच्या सिंंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करणे. भूजल अधिनियमाची अंमलबजावणी करणे. विकेंद्रीत पाणीसाठे कमी करणे. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे. अस्तित्त्वात असलेले व निकामी झालेल्या विविध स्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, अस्तित्त्वातील जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे, पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीवजागृती निर्माण करणे. शेतीच्या पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी अडविणे, जिरविणेबाबत लोकांना प्रोत्साहित करणे तसेच लोकसहभाग वाढविणे, अशा शाश्वत जलसंचयाला चालना देणाऱ्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सर्वांसाठी पाणी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंटकाँक्रिट नाला बंधाऱ्याची कामे, नाला खोलीकरण, रुंदीकरणासह करणे, जुन्या जलसंरचना कार्यान्वित करणे, अस्तित्त्वातील लघु पाटबंधारे संरचनांची दुरुस्ती करणे. पाझर तलाव, लघुसिंंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)