शहरं
Join us  
Trending Stories
1
Shilpa Shetty: बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीला दणका! मुंबईतील घरावर आयकर विभागाचा छापा
2
SMAT 2025 Final : नवा गडी नव राज्य! ईशानच्या कॅप्टन्सीत झारखंडच्या संघानं पहिल्यांदा उंचावली ट्रॉफी
3
पिंपरी-चिंचवडमध्ये ठाकरेंची 'मशाल' विझली; शहराध्यक्ष संजोग वाघेरेंचा राजीनामा; भाजपमध्ये प्रवेश निश्चित
4
'लाडक्या बहिणी' निवडणूक लढवण्यासाठी तुफान उत्साही; शिवसेनेत मुलाखतींसाठी इच्छुकांची गर्दी
5
“ही त्यांची शेवटची निवडणूक, भविष्यात तर...”; ठाकरे बंधूंच्या युतीवर भाजपा नेत्यांनी डिवचले
6
एकीकडे भाजप-शिवसेनेची युती, दुसरीकडे राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्षांचे महायुतीबाबत मोठे विधान
7
काँग्रेसमध्ये 'इनकमिंग' जोरात, भाजपाच्या भुलथापांना बळी पडू नका; प्रदेशाध्यक्षांचा दावा
8
शाहबाज सरकार पुन्हा तोंडावर आपटलं; सौदी अरेबियाने 50,000 पाकिस्तानी भिकाऱ्यांना हाकलून लावलं
9
"ये 21वीं सदी का भारत है…!"; ओमानमधील भारतीयांना पंतप्रधान मोदींचा संदेश, मिळाला सर्वोच्च सन्मान
10
१२ वर्षांपासून अंथरुणाला खिळून, तरुणाला इच्छामरण देण्याची आई-वडिलांची मागणी, सुप्रीम कोर्ट म्हणाले...
11
“दोन्ही NCP एकत्र येणार असतील, तर शरद पवार गटासोबत जाणार नाही”; उद्धवसेनेने स्पष्टच सांगितले
12
SMAT Final 2025 : विराट फेल! बाकी सर्वांच्या २०० प्लस स्ट्राइक रेटसह धावा अन् झारखंडनं रचला इतिहास
13
माणिकराव कोकाटे मंत्रिमंडळातून बाहेर! अजित पवारांनी CM फडणवीसांकडे पाठवला राजीनामा
14
डॉलर नाही तर हे आहे जगातील सर्वात शक्तिशाली चलन, मोजावे लागतात तब्बल २९४ रुपये
15
185 रुपयांच्या शेअरमध्ये 5881% ची आश्चर्यचकित करणारी तेजी; आता BSE ची अ‍ॅक्शन, व्यवहार बंद!
16
Ishan Kishan Century : ईशान किशनची विक्रमी सेंच्युरी! सर्वाधिक षटकारांचाही सेट केला नवा रेकॉर्ड
17
महाराष्ट्र भूषण राम सुतार यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार; वृद्धापकाळाने झालेले निधन
18
"अजूनही अश्लील प्रश्न विचारतात, घाणेरड्या नावाने हाक मारतात..."; MMS कांडवर स्पष्टच बोलली अंजली
19
"आता काँग्रेस विसर्जित करायला हवी...!"; का आणावा लागला नवा कायदा? G RAM G संदर्भात शिवराज सिंह स्पष्टच बोलले
20
बुरखा न घातल्याने पत्नीसह २ लेकींची हत्या; चेहरा दिसू नये म्हणून १८ वर्षे काढलं नाही आधार कार्ड
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हानिहाय आराखडा लवकरच तयार होणार

By admin | Updated: February 8, 2015 01:04 IST

जलयुक्त शिवार अभियान : जिल्ह्यातील ४५ गावांची निवड

रत्नागिरी : ‘सर्वांसाठी पाणी टंचाईमुक्त महाराष्ट्र २०१९’अंतर्गत जलयुक्त शिवार अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील ४५ गावांची निवड करण्यात आली आहे. हे अभियान राबवण्यासाठी जिल्हानिहाय आराखडा लवकरच तयार करण्यात येणार आहे. राज्यात सतत उद्भवणारी पाणीटंचाई विचारात घेऊन हे अभियान हाती घेण्यात आले आहे. या अभियानांतर्गत जिल्हानिहाय आराखडा तयार करण्यात येणार आहे. या आराखड्यात शासनाच्या विविध योजनांतर्गत उपलब्ध होणारा निधी, मनरेगा निधीचाही विनियोग करण्यात येणार आहे. तसेच स्वयंसेवी संस्थांचा सहभाग, खासगी उद्योगांचे सीएसआरअंतर्गत सहकार्य, सहकारी संस्था आणि लोकसहभाग याचा विचार करण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून गावातील पाणीटंचाई समस्या सोडविणारी कामे हाती घेण्यावर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत पावसाचे जास्तीत जास्त पाणी गावाच्या शिवारातच अडविणे. भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करणे. राज्याच्या सिंंचन क्षेत्रात वाढ करणे, शेतीसाठी संरक्षित पाणी व पाण्याच्या वापराच्या कार्यक्षमतेत वाढ करणे. सर्वांना पुरेशा प्रमाणात पाणी उपलब्ध करण्याची शाश्वती, ग्रामीण भागातील बंद पडलेल्या पाणी पुरवठा योजना पुन्हा सुरू करणे. भूजल अधिनियमाची अंमलबजावणी करणे. विकेंद्रीत पाणीसाठे कमी करणे. पाणी साठवण क्षमता निर्माण करणारी नवीन कामे हाती घेणे. अस्तित्त्वात असलेले व निकामी झालेल्या विविध स्रोतांची पाणी साठवण क्षमता पुनर्स्थापित करणे, अस्तित्त्वातील जलस्रोतातील गाळ लोकसहभागातून काढून जलस्रोतांचा पाणीसाठा वाढविणे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणे, पाण्याच्या ताळेबंदाबाबत जनतेत जाणीवजागृती निर्माण करणे. शेतीच्या पाण्याचा कार्यक्षम वापर करणे, पाणी अडविणे, जिरविणेबाबत लोकांना प्रोत्साहित करणे तसेच लोकसहभाग वाढविणे, अशा शाश्वत जलसंचयाला चालना देणाऱ्या बाबींचा अंतर्भाव करण्यात आला आहे. सर्वांसाठी पाणी हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जलयुक्त शिवार अभियानातंर्गत पाणलोट विकासाची कामे, साखळी सिमेंटकाँक्रिट नाला बंधाऱ्याची कामे, नाला खोलीकरण, रुंदीकरणासह करणे, जुन्या जलसंरचना कार्यान्वित करणे, अस्तित्त्वातील लघु पाटबंधारे संरचनांची दुरुस्ती करणे. पाझर तलाव, लघुसिंंचन तलाव दुरुस्ती, नूतनीकरण व क्षमता पुनर्स्थापित करणे आदी कामे हाती घेण्यात येणार आहेत. (प्रतिनिधी)