शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
4
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
5
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
6
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
7
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
8
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
9
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
10
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
11
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
12
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
13
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
14
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
15
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
16
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
17
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
18
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
19
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
20
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं

जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; पाणी भरणे, जमीन खचणे, दरड कोसळणे आदी प्रकारांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपायला सुरूवात केली आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी ...

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपायला सुरूवात केली आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी भरणे, जमीन खचणे, दरड कोसळणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत एकूण पावसाची नोंद तब्बल ११७८.९० (सरासरी १३०.९९) मिलिमीटर झाली आहे. सर्वाधिक पाऊस दापोलीत १८३.९० मिलिमीटर तर सर्वात कमी संगमेश्वर तालुक्यात ९७.९० मिलिमीटर इतका झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी दिवसभर वादळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे सर्वच तालुक्यांमधील अनेक भागांमध्ये पाणी भरण्याच्या घटना घडल्या. दापोलीखालोखाल मंडणगड १४६.६०, गुहागर १४४.२० राजापूर १३६.४०, रत्नागिरी १२७.४०, लांजा १२३, खेड ११५.९, चिपळूण १०४. ३० इतका पाऊस झाला आहे. या पावसाने जिल्ह्याला गारठवून टाकले आहे. सोमवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यात दाभोळ येथील काशिनाथ जोशी यांच्या घराशेजारी दरड कोसळल्याने घराचे अंशत: २२ हजार रुपयांचे नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यात धामापूर येथे १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण (३३) व चेतन सुरेश सागवेकर (१८) हे नदीवर पोहायला गेले असता, नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला.

रत्नागिरी तालुक्यात गोळप येथे जमीन खचल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून तीन कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. या ठिकाणाला तहसीलदार शशिकांत जाधव यांनी भेट दिली. पावस, टेंभ्ये तसेच परिसरातील अन्य गावांमध्येही पाणी साचण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले.

राजापूर शहराला पुराचा वेढा कायम आहे. तालुक्यातील नाटे येथील ठाकरेवाडीजवळील साकव पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.

सोमवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास केवळ पाच - दहा मिनिटे सूर्यदर्शन झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाळी वातावरण कायम होते. त्यामुळे सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार, असे वाटत होते.