शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्याला वादळी पावसाने झोडपले; पाणी भरणे, जमीन खचणे, दरड कोसळणे आदी प्रकारांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:22 IST

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपायला सुरूवात केली आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी ...

रत्नागिरी : गेल्या काही दिवसांपासून मुसळधार पावसाने जिल्ह्याला झोडपायला सुरूवात केली आहे. रविवारी झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी भरणे, जमीन खचणे, दरड कोसळणे अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या २४ तासांत एकूण पावसाची नोंद तब्बल ११७८.९० (सरासरी १३०.९९) मिलिमीटर झाली आहे. सर्वाधिक पाऊस दापोलीत १८३.९० मिलिमीटर तर सर्वात कमी संगमेश्वर तालुक्यात ९७.९० मिलिमीटर इतका झाला आहे.

गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर वाढला आहे. रविवारी दिवसभर वादळी पावसाने जिल्ह्याला झोडपले. त्यामुळे सर्वच तालुक्यांमधील अनेक भागांमध्ये पाणी भरण्याच्या घटना घडल्या. दापोलीखालोखाल मंडणगड १४६.६०, गुहागर १४४.२० राजापूर १३६.४०, रत्नागिरी १२७.४०, लांजा १२३, खेड ११५.९, चिपळूण १०४. ३० इतका पाऊस झाला आहे. या पावसाने जिल्ह्याला गारठवून टाकले आहे. सोमवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यात दाभोळ येथील काशिनाथ जोशी यांच्या घराशेजारी दरड कोसळल्याने घराचे अंशत: २२ हजार रुपयांचे नुकसान झाले. संगमेश्वर तालुक्यात धामापूर येथे १८ जुलै रोजी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास शैलेश दत्ताराम चव्हाण (३३) व चेतन सुरेश सागवेकर (१८) हे नदीवर पोहायला गेले असता, नदीत बुडून त्यांचा मृत्यू झाला.

रत्नागिरी तालुक्यात गोळप येथे जमीन खचल्याने सावधगिरीचा उपाय म्हणून तीन कुटुंबांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करण्यात आले. या ठिकाणाला तहसीलदार शशिकांत जाधव यांनी भेट दिली. पावस, टेंभ्ये तसेच परिसरातील अन्य गावांमध्येही पाणी साचण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणावर घडले.

राजापूर शहराला पुराचा वेढा कायम आहे. तालुक्यातील नाटे येथील ठाकरेवाडीजवळील साकव पाण्याखाली गेल्याने गावाचा संपर्क तुटला आहे.

सोमवारी सकाळपर्यंत पावसाचा जोर कायम होता. सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास केवळ पाच - दहा मिनिटे सूर्यदर्शन झाले. मात्र, त्यानंतर पुन्हा पावसाळी वातावरण कायम होते. त्यामुळे सोमवारी दिवसभर पावसाचा जोर कायम राहणार, असे वाटत होते.