शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

पूरग्रस्त व्यापाऱ्यांना जिल्हा बॅंक ५ टक्के दराने कर्ज देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डाॅ. तानाजीराव चोरगे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त व्यापाऱ्यांची सकाळी बैठक झाली. या व्यापाऱ्यांना ...

रत्नागिरी : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे अध्यक्ष डाॅ. तानाजीराव चोरगे यांच्या उपस्थितीत पूरग्रस्त व्यापाऱ्यांची सकाळी बैठक झाली. या व्यापाऱ्यांना लवकरात लवकर उभे राहण्याची संधी मिळावी, यासाठी जिल्हा बॅंकेकडून ५ टक्के दराने कर्जपुरवठा केला जाईल, असे डाॅ. चोरगे यांनी जाहीर केले असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी मंगळवारी संयुक्तरीत्या ऑनलाइन आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

ढगफुटीसदृश झालेल्या अतिवृष्टीत चिपळुणात महाप्रलय आला. खेडही जलमय झाले. यात व्यापारी यांचे पूर्णत: नुकसान झाले असून, त्यांचा व्यवसाय उद्ध्वस्त झाला आहे. जिल्ह्यात सुमारे साडेसहा हजार छोटे मोठे व्यापारी पूरग्रस्त झाले आहेत. त्यांना पुन्हा उभे राहण्यासाठी अल्पदराने कर्ज मिळण्याची गरज असल्याने तशी मागणी या व्यापाऱ्यांकडून करण्यात येत आहे. या आनुषंगाने या तिघांच्या उपस्थितीत ही बैठक आयोजित करण्यात आली होती. व्यापाऱ्यांना सध्या अल्प व्याजदराने ५० हजार ते ५० लाखापर्यंत कर्जाची गरज आहे. त्यांना उभे राहण्यासाठी अल्प व्याजदर आणि सबसिडी शासनाकडून मिळाली तर या व्यापाऱ्यांना लवकरात लवकर आपले व्यवसाय सुरू करता येणार आहेत. यादृष्टीने आयोजित या बैठकीत डाॅ. चोरगे यांनी प्रतिसाद दिल्याने त्यांना धन्यवाद देण्यात आले.

याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा झाली असून, या व्यापाऱ्यांना २ टक्के दराने कर्ज सबसिडी मिळाल्यास त्याचा फायदा राज्यातील इतर पूरबाधित व्यापाऱ्यांनाही होईल. तसेच १ वर्षांचा माॅरेटियम लागू केल्यास त्यांना लवकर उभ राहता येईल. इतर राष्ट्रीय बॅंकांनीही हा फाॅर्म्युला लागू करावा, यासाठी इतर बॅंकांशीही याबाबत चर्चा करण्यात येणार आहे. यासाठी सुलभ यंत्रणा उभारून वेगळा कक्ष उभारण्याची मागणीही करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

चिपळूण पूर्वपदावर येत आहे. ९० ते ९५ टक्के वीजपुरवठा मंगळवारी पूर्ववत होईल. स्थिती सुधारायला पाच-सहा दिवस लागतील. रोगराई पसरू नये, याबाबतची दक्षता घेण्यात येत आहे. तिथला चिखल काढण्याचे काम प्रशासन, सामाजिक कार्यकर्ते, राजकीय पक्षाचे पदाधिकारी करीत आहेत, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.

मुंबई-गोवा महामार्गावरील भराव दूर करण्यात आला असून, हलक्या वाहनांची वाहतूक सोमवारपासून सुरू झाली आहे. दोन दिवसांत जड वाहतूकही सुरू होईल, अशी माहितीही खासदार विनायक राऊत यांनी यावेळी दिली.