शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
3
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
4
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
5
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
6
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
7
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
8
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
9
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
10
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
11
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
12
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
13
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
14
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
15
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
16
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
17
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
18
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
19
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले
20
भारत-पाकिस्तान तणाव: BCCI ची मोठी कारवाई; खेळाडूंना धर्मशालामधून बाहेर काढण्यासाठी विशेष ट्रेन

दुसऱ्या टप्प्यात जिल्हा कृती आराखडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:31 IST

रत्नागिरी : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना ...

रत्नागिरी : जलजीवन मिशन कार्यक्रमांतर्गत गावकृती आराखडा पंधरवडा अभियान राबवण्यात येणार आहे. या कार्यक्रमांतर्गत सर्व ग्रामीण भागातील कुटुंबांना घरगुती नळ जोडणीद्वारे पाणी पुरवठा करण्यासाठी हे अभियान हाती घेण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात गाव कृती आराखडा तर नंतर जिल्हा कृती आराखडा तयार करण्यात येणार आहे.

२२ जुलै ते ७ ऑगस्ट २०२१ या कालावधीत गाव कृती आराखडा पंधरवडा अभियान जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे.

ग्रामीण भागात प्रत्येक पात्र कुटुंबाला शुद्ध पाणी पुरवठा करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबवण्यात येत आहे. या अभियानांतर्गत ग्रामीण भागात व्यापक जनजागृती करण्यात आणि गाव कृती आराखडा तयार करण्यासाठी हे अभियान या कालावधीत विशेष करून राबवण्यात येत आहे. सदर अभियान कोविडच्या पार्श्वभूमीवर कोबो कलेक्ट या डिजिटल माध्यमाचा उपयोग करून जिल्हा, तालुका व गावपातळीवर करण्यात येणार आहे. जिल्हा व तालुका स्तरावरील प्रशिक्षित मनुष्यबळाच्या समन्वयाने गाव कृती आराखड्याची प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. गाव पातळीवर संकलित झालेली माहिती व आकडेवारी डिजिटल माध्यमातून भरुन पुढे पाठवून जमा झालेल्या माहितीवर प्रक्रिया करून गाव कृती आराखडा निर्मिती करून अंतिम आराखडा १५ ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्रामसभेत मंजुरीकरिता ठेवण्यात येणार आहे.

जलजीवन मिशन पाणी व स्वच्छता विभागाच्या सहाय्याने कार्यकारी अभियंता, उपअभियंता, शाखा अभियंता, डाटा एण्ट्री ऑपरेटर, जिल्हा कक्षाच्या सनियंत्रण व मूल्यमापन सल्लागार यांना झुम ॲपद्वारे गाव कृती आराखडा माहिती संकलन मोहीम राबविण्याची प्रक्रिया कोबो टुलद्वारे माहिती अपलोड याबाबत प्रशिक्षण देण्यात आले, तसेच तालुका पातळीवरील सर्व गटविकास अधिकारी यांच्याकडून ३१ जुलैपर्यंत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गाव कृती आराखड्यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, जलरक्षक/पंप ऑपरेटर, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता समितीचे दोन प्रतिनिधी यांना ऑनलाइन प्रशिक्षण देण्यात येणार आहे.