शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
3
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
4
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
5
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
6
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
7
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
8
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
9
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
10
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
11
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
12
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
13
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
14
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
15
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

रुग्णांमध्ये नाराजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:29 IST

जलस्रोत आटले आवाशी : खेड तालुक्यात सध्या रणरणत्या उन्हाचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. उष्णतेचा पारा ४० अंशाच्यावर पोहोचला ...

जलस्रोत आटले

आवाशी : खेड तालुक्यात सध्या रणरणत्या उन्हाचा त्रास नागरिकांना सोसावा लागत आहे. उष्णतेचा पारा ४० अंशाच्यावर पोहोचला आहे. उन्हाच्या कडाक्याने नैसर्गिक स्रोत आटले आहेत. त्यामुळे आता दुर्गम भागातील जनतेची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. नजीकच्या काळात तालुक्यातील ५९ गावांना पाणीटंचाईचे चटके बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

विनामास्क कारवाई

राजापूर : वीकेंड लॉकडाऊन संपताच शहरातील बाजारपेठेत खरेदीसाठी गर्दी उसळली होती. नागरिक बेशिस्तपणे सोशल डिस्टन्सिंग न पाळता वावरत होते. त्यामुळे राजापूर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या १५ जणांवर दंडात्मक कारवाई केली तर चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बागायती नष्ट

दापोली : मंडणगड आणि दापोली या दोन तालुक्यातील सुमारे १०० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील सुपारी बागा निसर्ग चक्रीवादळाच्या फटक्याने पूर्णत: नष्ट झाल्या आहेत. या बागायतदारांना आर्थिक हातभार मिळावा, यासाठी कोकण कृषी विद्यापीठ आणि शासनाने या झाडांची पूर्तता करून वाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी मागणी केली जात आहे.

फळबागांची नासाडी

देवरुख : अनेक गावांमध्ये विविध फळांची झाडे घरांच्या आवारात लावण्यात आली आहेत. सध्या या झाडांवर फळेही लागली आहेत. मात्र माकडांचा उच्छाद सुरू झाल्याने ही माकडे या फळांची नासाडी करीत आहेत. काही माकडे आक्रमकपणे घरात घुसू लागल्याने ग्रामस्थांनी या माकडांचा धसका घेतला आहे.