शहरं
Join us  
Trending Stories
1
विरारमध्ये इमारत कोसळून १४ जणांचा मृत्यू, ३० तासांनंतरही बचाकार्य सुरु; शेजारील चाळही उद्ध्वस्त
2
दुर्गा पूजेदरम्यान धुबरीत 'शूट अ‍ॅट साइट ऑर्डर' लागू, आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी सांगितलं कारण
3
हृदयद्रावक! लेकीचा पहिला वाढदिवस, घर सजवलं, केक कापला आणि पाच मिनिटांत इमारत कोसळली, माय लेकीचा मृत्यू, वडील बेपत्ता
4
ट्रम्प यांच्या पत्नीची 'AI चॅलेन्ज', जिंकणाऱ्याला मिळणार लाखोंचं बक्षीस...! जाणून घ्या, करायचं काय?
5
ट्रम्प टॅरिफचा बाजाराला जोरदार झटका! सेन्सेक्स ६०० अंकांनी कोसळला; काही मिनिटांत ४.१४ लाख कोटींचे नुकसान
6
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
7
Ganesh Chaturthi 2025: 'चिक मोत्याची माळ' हे अतिशय लोकप्रिय गाणे; त्याची निर्मिती कशी झाली माहितीय?
8
Russia Ukraine War: रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर भयावह हल्ला, तीन ठार, १२ जण जखमी
9
"रशिया युक्रेन युद्ध मोदींचे" अमेरिकन राजदूताने भारताला धरलं जबाबदार, टॅरिफ कमी करण्यासाठी ठेवली अट
10
Rishi Panchami 2025: ऋषी मुनी तथा देव, मृत हरणाचे किंवा वाघाचे कातडे 'आसन' म्हणून का वापरत असत? वाचा 
11
पुतिन नव्हे..., आता झेलेन्स्कींवरच भडकले ट्रम्प, म्हणाले, "युद्ध..., युक्रेनने ऐकले नाही, तर बंदी घालेन!"
12
गजानन महाराज पुण्यतिथि: जाणून घ्या त्यांनी दिलेला सिद्धमंत्र; जो तुमचे आयुष्य बदलून टाकेल!
13
Mumbai: डॉकयार्ड रेल्वे स्टेशनजवळ सापडलेल्या मृतदेहाचा उलगडा, जमिनीच्या वादातून हत्या, तिघांना अटक
14
जामीन अर्जावरील सुनावणी ४३ वेळा पुढे ढकलल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाची नाराजी, आरोपीला दिलासा
15
आजचे राशीभविष्य, २८ ऑगस्ट २०२५: मानहानी होण्याची शक्यता, विधायक कार्य हातून घडेल
16
जम्मू-काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार, वैष्णोदेवी मार्गावरील भूस्खलन घटनेतील मृतांची संख्या ४१ वर, जम्मू-उधमपूरमध्ये ११५ वर्षांतील रेकॉर्ड झाले ब्रेक
17
ट्रम्प यांच्या सूचनेनंतर पाच तासांतच शस्त्रसंधी, मतदार अधिकार यात्रेत राहुल गांधी यांचा आरोप
18
वर्षानुवर्षे खटला चालणे, हे शिक्षेसारखेच. सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली खंत
19
Manoj Jarange Patil: मराठा वादळ मुंबईच्या दिशेने, आंदोलनाला केवळ एक दिवसासाठी सशर्त परवानगी
20
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार

राष्ट्रवादीमध्ये फाटाफूट

By admin | Updated: November 10, 2014 23:53 IST

रत्नागिरी नगर पालिका : रत्नागिरीत चार नगरसेवकांचा स्वतंत्र गट

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेमधील राष्ट्रवादीच्या ४ फुटीर नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन केल्याचे जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्र दिले आहे. त्यापूर्वी राष्ट्रवादीकडून त्यांच्या सहाही नगरसेवकांना व्हीप बजावण्यात आला आहे. या सर्व घडामोडीमध्ये राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांकडून शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देण्यात येणार असल्याने नगर परिषदेतील राजकारणाला कलाटणी मिळणार आहे. आज रत्नागिरी नगर परिषदेतील पक्षीय बलाबल पाहता शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष असून, १३ नगरसेवक आहेत, तर भाजपा ८, राष्ट्रवादी ६ आणि काँग्रेस १ अशी नगरसेवकांची संख्या आहे. गेली २५ वर्षे रत्नागिरी नगरपरिषदेमध्ये शिवसेना-भाजपा युती आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीमध्ये युती तुटल्याने त्याचे परिणाम रत्नागिरी नगर परिषदेच्या राजकीय पटलावर झाल्याचे दिसून येत आहेत.युतीमध्ये ठरल्याप्रमाणे भाजपचे महेंद्र मयेकर नगराध्यक्ष आहेत. मात्र, आता युती तुटल्यानंतर शिवसेनेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रतोद सुदेश मयेकर यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला होता. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात अस्वस्थता पसरली होती. मात्र, उदय सामंत यांच्यापाठीमागून राष्ट्रवादीच्या नगरसेवकांचा एक गट आधीपासूनच कार्यरत होता. त्याचा फायदा रत्नागिरी नगर परिषदेतील उपनगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला होणार हे जवळजवळ निश्चित आहे. दोन दिवसांपूर्वी नगर परिषदेतील राजकीय घडामोडीना वेग आल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या सहापैकी चार नगरसेवकांनी शहर विकास आघाडीच्या नावाखाली वेगळा गट स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामध्ये नगरसेवक बाळू साळवी, नगरसेविका स्मितल पावस्कर, प्रीती सुर्वे आणि मुनीज जमादार यांचा समोवश आहे. नगरसेवक बाळू साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली चारही नगरसेवकांनी जिल्हाधिकाऱ्यांना वेगळा गट स्थापन केल्याचे पत्र दिले आहे. उपनगराध्यक्षपदाची निवडणूक मंगळवारी, दि. ११ रोजी होत असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगर परिषदेतील राष्ट्रवादीच्या सहाही नगरसेवकांना चार नगरसेवकांचा गट स्थापन होण्यापूर्वी पक्षाकडून पक्षादेश बजावण्यात आला असल्याचे गटनेते नगरसेवक सुदेश मयेकर यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांनी वेगळा गट स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आज पत्र दिले. आपला गट उपनगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेच्या उमेदवाराला पाठिंबा देणार असल्याचे नगरसेवक बाळू साळवी यांनी सांगितले. त्यामुळे शिवसेनेचे संजय साळवी उपनगराध्यक्ष होणार, हे निश्चित झाले आहे. (शहर वार्ताहर)शहर विकास आघाडीरत्नागिरी नगर परिषदेत राष्ट्रवादीच्या ४ फुटीर नगरसेवकांनी एकत्र येऊन वेगळा गट स्थापन केला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना तसे पत्रही दिले असून, आपल्या गटाला शहर विकास आघाडी असे नाव दिले आहे. त्यामुळे शिवसेनेचा उपनगराध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.