शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
5
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
6
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
7
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
8
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
9
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
10
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
11
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
12
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
13
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
14
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
15
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
16
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
17
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
18
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
19
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
20
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
Daily Top 2Weekly Top 5

चिपळुणातील आपत्ती व्यवस्थापन ठरले कुचकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : दरवर्षी पावसाळ्यात येथे भीषण पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : दरवर्षी पावसाळ्यात येथे भीषण पूरपरिस्थिती निर्माण होते. त्यासाठी नगर परिषदेच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापनाचे नियोजन केले जाते. मात्र, यावेळी नगर परिषदेची यंत्रणा कुचकामी ठरल्याने त्याचा मोठा फटका शहरातील नागरिकांना व व्यापाऱ्यांना बसला आहे. याला नगर परिषद प्रशासनापेक्षा पदाधिकारी कारणीभूत असल्याचा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी मंगळवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला.

ते पुढे म्हणाले की, यावेळच्या महापुराने चिपळूणच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठी उंची गाठली. त्यामुळे बाजारपेठेसह आजूबाजूचा परिसर बाधित झाला आणि व्यापाराबरोबरच सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा मोठा फटका बसला. या महापुरात माझ्याही घरी पुराचे पाणी शिरल्याने मला टेरव गावी स्थलांतरित व्हावे लागले. मात्र, महापूर ओसरल्यानंतर आपण प्रत्येक अधिकाऱ्याच्या संपर्कात असून, त्यांना वेळोवेळी मदत व मार्गदर्शन करीत आहे. प्रत्यक्षात नगर परिषदेने आपत्ती व्यवस्थापनाचे कोणतेही नियोजन केले नव्हते.

दरवर्षी पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर गोवळकोट, पेठमाप व बाजारपेठ भागात बोटी सज्ज ठेवल्या जात होत्या. तसेच नावाडी २४ तास सज्ज राहत होते. याशिवाय शहरात पोहणाऱ्या नागरिकांची यादी व त्यांचे संपर्क ठेवले जात होते. तसेच जेसीबी, डंपर वाहने यंत्रणा तत्काळ उपलब्ध केली जात होती. परंतु, यावेळी असे कोणतेही नियोजन झाले नाही. मुळात यापुढे पूरपरिस्थितीचा अंदाज घेता शहरातील बांधकामांविषयी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी नगर परिषद प्रशासनाने विशेष लक्ष घालण्याची गरज आहे, असे कदम यांनी सांगितले.