शहरं
Join us  
Trending Stories
1
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
2
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
3
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
4
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
5
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
6
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
7
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
8
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
9
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
10
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
11
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
12
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
13
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
14
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
15
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?
16
BRICS शिखर परिषदेसाठी PM मोदी ब्राझीलमध्ये दाखल; भारताला काय फायदा? जाणून घ्या...
17
भारतीय चलनी नोटांवर फक्त महात्मा गांधीजींचेच चित्र का? आरबीआयने स्वतःच सांगितले कारण
18
2028 च्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत उतरणार 'America Party'? इलॉन मस्क यांनी वेगळीच हिंट दिली!
19
संपत्तीवरून वाद झाला, काकीनेच पुतण्याचा गेम केला! तरुणाचा दुर्दैवी मृत्यू 
20
अमेरिकेचा मोठा निर्णय! १ ऑगस्टपासून १०० देशांवर लादणार नवीन शुल्क, भारतावर काय परिणाम?

उच्च दाब विजेमुळे विद्युत उपकरणे जळून खाक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:28 IST

राजापूर : रविवारी शहरानजीकच्या कोंढेतड गाडगीळवाडी भागात उच्च दाबाने झालेल्या वीज पुरवठ्यामुळे या भागातील आठ ते दहा ग्रामस्थांचे टीव्ही, ...

राजापूर : रविवारी शहरानजीकच्या कोंढेतड गाडगीळवाडी भागात उच्च दाबाने झालेल्या वीज पुरवठ्यामुळे या भागातील आठ ते दहा ग्रामस्थांचे टीव्ही, फ्रिज, कुलर, फोन, मोबाईल अशा विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाल्या आहेत. यात अनेकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

उच्च दाबाने वीज पुरवठा होत असल्याची माहिती देऊनही महावितरणकडून योग्य दखल घेतली गेली नाही, असा ग्रामस्थांचा आक्षेप आहे.

रविवारी दुपारी ते सायंकाळी यादरम्यान वीज पुरवठा कमी जास्त होत होता. याबाबत ग्रामस्थांनी महावितरण कार्यालयाशी संपर्क साधला होता. तसेच अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र, प्रतिसाद मिळाला नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.

महावितरणच्या दुर्लक्षामुळे उच्च दाबाने पुरवठा सुरू झाला. त्यामुळे घरात सुरू असलेले टीव्ही, फ्रिज, मिक्सर, मोबाईल फोन जळून गेल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. महावितरणने याची जबाबदारी घेऊन नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून करण्यात आली आहे.