शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

विलास देशमुख यांच्या उपोषणाला आठ दिवस उलटूनही प्रशासन ढिम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

रत्नागिरी : मुसळधार पावसातही सतत आठ दिवस आफ्रोहचे साखळी उपोषण सुरूच आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. भरपावसात हे ...

रत्नागिरी : मुसळधार पावसातही सतत आठ दिवस आफ्रोहचे साखळी उपोषण सुरूच आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. भरपावसात हे उपोषण सुरू आहे. मात्र, जिल्हा प्रशासन ढिम्मच आहे. दरम्यान, आफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष सोनपरोते व पुण्यातील पदाधिकारी बुधवारी रत्नागिरीत येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या २१ डिसेंबर २०१९च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४.२ची अंमलबजावणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडील सेवामुक्त लिपिक - टंकलेखक विलास देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश मिळावे. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ५ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. सोमवार ते सोमवार आठ दिवसांचा कालावधी झाला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या मागण्यांबाबत कोणतीही दखल घेतल्याचे दिसून येत नसल्याची खंत आफ्रोहच्या वतीने व्यक्त करण्यात आली. देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश देण्यासाठी केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढेच काम असतांना मात्र नकारार्थी भूमिका घेऊन हेतुपुरस्सर टाळाटाळ करण्यासाठी २५ सप्टेंबर २०२० रोजी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले.

संबंधित कार्यालयाकडूनच अधिसंख्य पदाचे आदेश देण्यात येतात व प्रशासकीय विभागाकडून या अधिसंख्य पदाला मंजुरी देण्यात येत असल्याचे मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून गजेंद्र पौनीकर यांना माहिती अधिकारात कळविले आहे. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाकडे आफ्रोह संघटनेने विलास देशमुखांच्या प्रकरणात पाठपुरावा केला असता महसूल विभागाकडूनच यावर कार्यवाही करणे अभिप्रेत असल्याचे, सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे. मात्र, सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या त्रांगड्यात विलास देशमुख १८ महिन्यांच्या वेतनापासून वंचित राहिल्याची खंत व्यक्त केली. याला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही पौनीकर यांनी केला आहे.

गेले सात दिवस विलास देशमुख व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नसल्याने देशमुख यांच्यासोबत उपोषणाला बसण्यासाठी आफ्रोह पुण्याची टीम रत्नागिरीत दाखल होणार आहे. आफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोतेही रत्नागिरीत येत असून, जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी दिली.