शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

विलास देशमुख यांच्या उपोषणाला आठ दिवस उलटूनही प्रशासन ढिम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

रत्नागिरी : मुसळधार पावसातही सतत आठ दिवस आफ्रोहचे साखळी उपोषण सुरूच आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. भरपावसात हे ...

रत्नागिरी : मुसळधार पावसातही सतत आठ दिवस आफ्रोहचे साखळी उपोषण सुरूच आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. भरपावसात हे उपोषण सुरू आहे. मात्र, जिल्हा प्रशासन ढिम्मच आहे. दरम्यान, आफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष सोनपरोते व पुण्यातील पदाधिकारी बुधवारी रत्नागिरीत येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या २१ डिसेंबर २०१९च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४.२ची अंमलबजावणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडील सेवामुक्त लिपिक - टंकलेखक विलास देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश मिळावे. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ५ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. सोमवार ते सोमवार आठ दिवसांचा कालावधी झाला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या मागण्यांबाबत कोणतीही दखल घेतल्याचे दिसून येत नसल्याची खंत आफ्रोहच्या वतीने व्यक्त करण्यात आली. देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश देण्यासाठी केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढेच काम असतांना मात्र नकारार्थी भूमिका घेऊन हेतुपुरस्सर टाळाटाळ करण्यासाठी २५ सप्टेंबर २०२० रोजी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले.

संबंधित कार्यालयाकडूनच अधिसंख्य पदाचे आदेश देण्यात येतात व प्रशासकीय विभागाकडून या अधिसंख्य पदाला मंजुरी देण्यात येत असल्याचे मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून गजेंद्र पौनीकर यांना माहिती अधिकारात कळविले आहे. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाकडे आफ्रोह संघटनेने विलास देशमुखांच्या प्रकरणात पाठपुरावा केला असता महसूल विभागाकडूनच यावर कार्यवाही करणे अभिप्रेत असल्याचे, सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे. मात्र, सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या त्रांगड्यात विलास देशमुख १८ महिन्यांच्या वेतनापासून वंचित राहिल्याची खंत व्यक्त केली. याला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही पौनीकर यांनी केला आहे.

गेले सात दिवस विलास देशमुख व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नसल्याने देशमुख यांच्यासोबत उपोषणाला बसण्यासाठी आफ्रोह पुण्याची टीम रत्नागिरीत दाखल होणार आहे. आफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोतेही रत्नागिरीत येत असून, जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी दिली.