शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
2
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
3
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
4
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
5
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
6
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
7
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
8
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
9
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
10
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
11
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
12
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
13
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
14
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
15
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
16
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
17
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
18
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
19
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
20
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू

विलास देशमुख यांच्या उपोषणाला आठ दिवस उलटूनही प्रशासन ढिम्म

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

रत्नागिरी : मुसळधार पावसातही सतत आठ दिवस आफ्रोहचे साखळी उपोषण सुरूच आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. भरपावसात हे ...

रत्नागिरी : मुसळधार पावसातही सतत आठ दिवस आफ्रोहचे साखळी उपोषण सुरूच आहे. सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे. भरपावसात हे उपोषण सुरू आहे. मात्र, जिल्हा प्रशासन ढिम्मच आहे. दरम्यान, आफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष सोनपरोते व पुण्यातील पदाधिकारी बुधवारी रत्नागिरीत येणार आहेत.

महाराष्ट्र शासनाच्या २१ डिसेंबर २०१९च्या शासन निर्णयातील मुद्दा क्र. ४.२ची अंमलबजावणी करून जिल्हाधिकारी कार्यालयाकडील सेवामुक्त लिपिक - टंकलेखक विलास देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश मिळावे. या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांसाठी ५ जुलैपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आलेले आहे. सोमवार ते सोमवार आठ दिवसांचा कालावधी झाला. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या मागण्यांबाबत कोणतीही दखल घेतल्याचे दिसून येत नसल्याची खंत आफ्रोहच्या वतीने व्यक्त करण्यात आली. देशमुख यांना अधिसंख्य पदाचे आदेश देण्यासाठी केवळ शासन निर्णयाची अंमलबजावणी करणे एवढेच काम असतांना मात्र नकारार्थी भूमिका घेऊन हेतुपुरस्सर टाळाटाळ करण्यासाठी २५ सप्टेंबर २०२० रोजी शासनाकडे मार्गदर्शन मागविण्यात आले.

संबंधित कार्यालयाकडूनच अधिसंख्य पदाचे आदेश देण्यात येतात व प्रशासकीय विभागाकडून या अधिसंख्य पदाला मंजुरी देण्यात येत असल्याचे मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाकडून गजेंद्र पौनीकर यांना माहिती अधिकारात कळविले आहे. मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाकडे आफ्रोह संघटनेने विलास देशमुखांच्या प्रकरणात पाठपुरावा केला असता महसूल विभागाकडूनच यावर कार्यवाही करणे अभिप्रेत असल्याचे, सामान्य प्रशासन विभागाने कळविले आहे. मात्र, सामान्य प्रशासन विभाग, महसूल विभाग व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या त्रांगड्यात विलास देशमुख १८ महिन्यांच्या वेतनापासून वंचित राहिल्याची खंत व्यक्त केली. याला जिल्हा प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही पौनीकर यांनी केला आहे.

गेले सात दिवस विलास देशमुख व त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळत नसल्याने देशमुख यांच्यासोबत उपोषणाला बसण्यासाठी आफ्रोह पुण्याची टीम रत्नागिरीत दाखल होणार आहे. आफ्रोहचे राज्य कार्याध्यक्ष राजेश सोनपरोतेही रत्नागिरीत येत असून, जिल्हाधिकारी यांची भेट घेणार आहेत, अशी माहिती जिल्हाध्यक्ष गजेंद्र पौनीकर यांनी दिली.