शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! कोट्यवधींचे महाघोटाळे, बोगस भरतीही; शनि शिंगणापूर मंदिर ट्रस्ट बरखास्त
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल
3
शिंदेसेना वादात, विरोधकांना संधी; आमदारांच्या व्हायरल व्हिडिओमुळे एकनाथ शिंदेंची पंचाईत
4
होमिओपॅथीची नोंद एमएमसीमध्ये करायची की नाही?; तज्ज्ञ समिती करणार अभ्यास
5
बीकेसी ते शिळफाट्यादरम्यान बुलेट ट्रेनसाठीचा बोगदा पूर्ण; प्रकल्पाला मिळणार गती
6
अखेर ६ दिवसांनी बोया सापडला पण सर्च ऑपरेशनमध्ये आढळल्या ९२४ बेकायदा मच्छीमार बोटी
7
कुजबुज! उपमुख्यमंत्र्यांच्या कपाटात दडलं काय?; आमदारांचे PA, कार्यकर्त्यांचे लक्ष वेधले
8
कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
9
मतदार याद्यातील घोळ, घुसखोरी आणि गोंधळ; घोळ निस्तरणे निवडणूक आयोगाला शक्य होत नाही
10
...तर गो बॅक टू द थर्ड वर्ल्ड; न्यू यॉर्कमध्ये हाताने बिर्याणी खाल्ली, काय बिघडले?
11
फास्टॅग नीट न लावल्यास चालक ब्लॅकलिस्टमध्ये; तुम्हीही वाहन चालवताना करता का 'ही' चूक?
12
Video : शिवाजीनगर येथे पीएमटी बसला आग;नागरिकांच्या तत्परतेने टळली जीवितहानी
13
Wimbledon 2025: अल्काराझनं सलग तिसऱ्यांदा गाठली फायनल! नदालनंतर अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा
14
दोन भिन्न वंशावळी न्यायालयात का सादर केल्या गेल्या? सात्यकी सावरकर यांनी याचा खुलासा करावा
15
नवऱ्याने रागाच्या भरात बायकोच्या नाकाचा घेतला चावा, झाले दोन तुकडे... नेमकं घडलं तरी काय?
16
"जनसुरक्षा विधेयका'चं नाव 'भाजप सुरक्षा विधेयक' करायला हवं"; मिसा, टाडाचा उल्लेख करत उद्धव ठाकरेंचा सरकारवर हल्लाबोल
17
"नोटांनी भरलेली बॅग मी आल्याबरोबर कपाटात..."; खळबळ उडवणाऱ्या व्हिडीओवर संजय शिरसाटांनी सोडलं मौन
18
Video: तुफान राडा ! आधी 'कॅप्टन' गिल पंचांशी भांडला, मग सिराजचाही पारा चढला, काय घडलं?
19
“नव्या कायद्याची गरज का? जनतेच्या मनातील संभ्रम...”; जनसुरक्षा विधेयकाला काँग्रेसचा विरोध
20
“आम्ही राज्यपालांना जनसुरक्षा विधेयक मंजूर करू नये ही विनंती करणार”; ठाकरे गटाचा निर्धार

पालकमंत्रीपद असूनही सामंत यांना पेपर कठीणच!

By admin | Updated: June 10, 2014 01:26 IST

रत्नागिरी मतदारसंघ : लोकसभेतील विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेस आघाडीचे वर्चस्व मोडीत काढत महायुतीने आपला झेंडा फडकावला. शिवसेनेचे विनायक राऊत तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. गेल्या दोन विधानसभा निवडणुकात रत्नागिरी विधानसभेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही रत्नागिरीतच आघाडी ३१ हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर गेल्याने विद्यमान मंत्री उदय सामंत यांची या मतदारसंघातील हॅट्ट्रिक सोपी नाही, हे स्पष्ट झाले आहे. २००४ व २००९च्या रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत दोन्हीवेळी राष्ट्रवादीचे तरूण उमेदवार उदय सामंत यांनी करिश्मा दाखवित विजय संपादन केला. आमदारकीच्या दुसऱ्या कार्यकालात शेवटच्या टप्प्यात त्यांना नगरविकाससह १० खात्यांचे राज्यमंत्रीपद मिळाले. रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेच्या एका गटाने मागच्या दोन्ही निवडणुकांच्या वेळी केलेल्या बंडखोरीमुळे सामंत यांचा विजय झाला, अशी निष्ठावंत शिवसैनिकांची व भाजपच्या कार्यकर्त्यांचीही भावना बनली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सेनेंतर्गत गटाला विनायक राऊत व सेनेच्या वरिष्ठांनी स्थानिक पातळीवरच पक्षाच्या नियमांमध्ये जखडून ठेवत कारवाईचा इशारा दिल्याने यावेळी मतांची फाटाफूट झाली नाही. त्यामुळेच विनायक राऊत यांना रत्नागिरी मतदारसंघात ३१५६५ एवढे मताधिक्य मिळाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सुरेश प्रभू ५००० मतांनी पिछाडीवर होते. कॉँग्रेसच्या नीलेश राणेंना या मतदारसंघात ५ हजारांचे मताधिक्य होते. यावेळच्या राऊत यांच्या मताधिक्याचा विचार केला, तर २००९मधील ५ हजार मतांची पिछाडी तोडून ३१५६५ चे मताधिक्य त्यांना मिळाले. लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून किमान ५ ते १० हजारांचे मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे निवडणुकीआधी पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केले होते. मात्र, मताधिक्य तर नाहीच उलट राणे यांना ३१ हजार मतांचा घाटाच झाला. त्यामुळे कॉँग्रेसमध्येही राष्ट्रवादीबाबत नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आमदारकीची हॅट्ट्रिक करण्यासाठी सामंत यांना काँग्रेसचे कितपत सहकार्य मिळेल, याबाबतही शंका आहे. एकिकडे महायुती मतदारसंघात मजबूत असताना राष्ट्रवादीतही अनेक गटातटाचे राजकारण आहे. सन २००४च्या निवडणुकीत सामंत यांना साथ देणारे कुमार शेट्ये, बाबू पाटील यांच्यासारखे रत्नागिरी तालुक्यातील महत्त्वाचे अनेक मोहरे आज त्यांची साथ सोडून गेले आहेत. या बाजू लक्षात घेता, विधानसभेचा पेपर सामंत यांच्यासाठी थोडा अवघडच आहे. अर्थात मतदारसंघात कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून विकासकामांना गती दिल्याने थेट कार्यकर्त्यांशी असलेले संबंध हे सामंत यांच्यासाठी निश्चित जमेची बाजू आहे. दुसरीकडे बाळ माने हे गेल्या दहा वर्षांच्या काळात या-ना त्या कारणाने सातत्याचे प्रकाशझोतात आहेत. आमदार नसले तरी त्यांच्या घरी रोजच जनता दरबार भरतो. लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे मताधिक्य विधानसभेतही राखण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत.