शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
2
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
3
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
4
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
5
शस्त्रसंधीची चर्चा भारत-पाकिस्तानमध्येच, डोनाल्ड ट्रम्प यांचा काहीही संबंध नाही; विक्रम मिस्रींनी संसदीय समितीला सगळं सांगितलं
6
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
7
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?
8
साताऱ्यात चीड आणणारी घटना! चुलत भावाकडून १३ वर्षीय बहिणीवर अनेकदा बलात्कार
9
राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेतृत्वात लवकरच बदल दिसेल; रोहित पवारांचं विधान
10
कॅपिटल गेन टॅक्स काय असतो, कोणत्या प्रकारे आणि किती द्यावा लागतो? सगळं गणित समजून घ्या
11
लातूर : पाठीमागून येणाऱ्या दुचाकीची भयंकर धडक; आई, मुलासह जावयाचा मृत्यू
12
'मीदेखील या गोष्टीला बळी पडलोय', सरन्यायाधीश प्रोटोकॉल प्रकरणावर उपराष्ट्रपतींची प्रतिक्रिया
13
निक्की आधी बॅटिंगला येऊन पंतचा पुन्हा फ्लॉप शो! Sanjiv Goenka यांनी असा काढला राग
14
'ऑपरेशन सिंदूर' आधी पाकिस्तानला दिली होती माहिती?; परराष्ट्र सचिवांनी संसदीय समितीत केला खुलासा
15
IPL 2025 : विदर्भकराचं स्वप्न झालं साकार! पण विकेटमागे इशान किशननं घोळ घातला, नाहीतर...
16
Rain update: साताऱ्यात धडाम् धूम! वळवाची दमदार हजेरी, शहरातील वीजपुरवठा खंडित
17
ट्रॅक्टर-ऑटोचा भीषण अपघात, तीन जागीच ठार; लातूर-बार्शी महामार्गावरील घटना
18
Shocking: व्हिडीओ कॉलसमोर प्रेमीयुगुलानं केलं विषप्राशन; प्रेयसीचा मृत्यू, प्रियकर आयसीयूमध्ये!
19
Jalana: कामाहून परतणाऱ्या तीन कष्टकरी मित्रांवर वीज कोसळली; दोघांचा मृत्यू
20
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...

पालकमंत्रीपद असूनही सामंत यांना पेपर कठीणच!

By admin | Updated: June 10, 2014 01:26 IST

रत्नागिरी मतदारसंघ : लोकसभेतील विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेस आघाडीचे वर्चस्व मोडीत काढत महायुतीने आपला झेंडा फडकावला. शिवसेनेचे विनायक राऊत तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. गेल्या दोन विधानसभा निवडणुकात रत्नागिरी विधानसभेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही रत्नागिरीतच आघाडी ३१ हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर गेल्याने विद्यमान मंत्री उदय सामंत यांची या मतदारसंघातील हॅट्ट्रिक सोपी नाही, हे स्पष्ट झाले आहे. २००४ व २००९च्या रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत दोन्हीवेळी राष्ट्रवादीचे तरूण उमेदवार उदय सामंत यांनी करिश्मा दाखवित विजय संपादन केला. आमदारकीच्या दुसऱ्या कार्यकालात शेवटच्या टप्प्यात त्यांना नगरविकाससह १० खात्यांचे राज्यमंत्रीपद मिळाले. रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेच्या एका गटाने मागच्या दोन्ही निवडणुकांच्या वेळी केलेल्या बंडखोरीमुळे सामंत यांचा विजय झाला, अशी निष्ठावंत शिवसैनिकांची व भाजपच्या कार्यकर्त्यांचीही भावना बनली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सेनेंतर्गत गटाला विनायक राऊत व सेनेच्या वरिष्ठांनी स्थानिक पातळीवरच पक्षाच्या नियमांमध्ये जखडून ठेवत कारवाईचा इशारा दिल्याने यावेळी मतांची फाटाफूट झाली नाही. त्यामुळेच विनायक राऊत यांना रत्नागिरी मतदारसंघात ३१५६५ एवढे मताधिक्य मिळाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सुरेश प्रभू ५००० मतांनी पिछाडीवर होते. कॉँग्रेसच्या नीलेश राणेंना या मतदारसंघात ५ हजारांचे मताधिक्य होते. यावेळच्या राऊत यांच्या मताधिक्याचा विचार केला, तर २००९मधील ५ हजार मतांची पिछाडी तोडून ३१५६५ चे मताधिक्य त्यांना मिळाले. लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून किमान ५ ते १० हजारांचे मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे निवडणुकीआधी पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केले होते. मात्र, मताधिक्य तर नाहीच उलट राणे यांना ३१ हजार मतांचा घाटाच झाला. त्यामुळे कॉँग्रेसमध्येही राष्ट्रवादीबाबत नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आमदारकीची हॅट्ट्रिक करण्यासाठी सामंत यांना काँग्रेसचे कितपत सहकार्य मिळेल, याबाबतही शंका आहे. एकिकडे महायुती मतदारसंघात मजबूत असताना राष्ट्रवादीतही अनेक गटातटाचे राजकारण आहे. सन २००४च्या निवडणुकीत सामंत यांना साथ देणारे कुमार शेट्ये, बाबू पाटील यांच्यासारखे रत्नागिरी तालुक्यातील महत्त्वाचे अनेक मोहरे आज त्यांची साथ सोडून गेले आहेत. या बाजू लक्षात घेता, विधानसभेचा पेपर सामंत यांच्यासाठी थोडा अवघडच आहे. अर्थात मतदारसंघात कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून विकासकामांना गती दिल्याने थेट कार्यकर्त्यांशी असलेले संबंध हे सामंत यांच्यासाठी निश्चित जमेची बाजू आहे. दुसरीकडे बाळ माने हे गेल्या दहा वर्षांच्या काळात या-ना त्या कारणाने सातत्याचे प्रकाशझोतात आहेत. आमदार नसले तरी त्यांच्या घरी रोजच जनता दरबार भरतो. लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे मताधिक्य विधानसभेतही राखण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत.