शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
2
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
3
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
4
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
5
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
6
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
7
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
8
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
9
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
10
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
11
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
12
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
13
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
14
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
15
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
16
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
17
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
18
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
19
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
20
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
Daily Top 2Weekly Top 5

पालकमंत्रीपद असूनही सामंत यांना पेपर कठीणच!

By admin | Updated: June 10, 2014 01:26 IST

रत्नागिरी मतदारसंघ : लोकसभेतील विजयामुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य

प्रकाश वराडकर ल्ल रत्नागिरी नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील कॉँग्रेस आघाडीचे वर्चस्व मोडीत काढत महायुतीने आपला झेंडा फडकावला. शिवसेनेचे विनायक राऊत तब्बल दीड लाखांच्या मताधिक्याने निवडून आले. गेल्या दोन विधानसभा निवडणुकात रत्नागिरी विधानसभेवर राष्ट्रवादीचे वर्चस्व असतानाही रत्नागिरीतच आघाडी ३१ हजारांपेक्षा अधिक मतांनी पिछाडीवर गेल्याने विद्यमान मंत्री उदय सामंत यांची या मतदारसंघातील हॅट्ट्रिक सोपी नाही, हे स्पष्ट झाले आहे. २००४ व २००९च्या रत्नागिरी विधानसभा निवडणुकीत दोन्हीवेळी राष्ट्रवादीचे तरूण उमेदवार उदय सामंत यांनी करिश्मा दाखवित विजय संपादन केला. आमदारकीच्या दुसऱ्या कार्यकालात शेवटच्या टप्प्यात त्यांना नगरविकाससह १० खात्यांचे राज्यमंत्रीपद मिळाले. रत्नागिरी मतदारसंघात शिवसेनेच्या एका गटाने मागच्या दोन्ही निवडणुकांच्या वेळी केलेल्या बंडखोरीमुळे सामंत यांचा विजय झाला, अशी निष्ठावंत शिवसैनिकांची व भाजपच्या कार्यकर्त्यांचीही भावना बनली होती. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सेनेंतर्गत गटाला विनायक राऊत व सेनेच्या वरिष्ठांनी स्थानिक पातळीवरच पक्षाच्या नियमांमध्ये जखडून ठेवत कारवाईचा इशारा दिल्याने यावेळी मतांची फाटाफूट झाली नाही. त्यामुळेच विनायक राऊत यांना रत्नागिरी मतदारसंघात ३१५६५ एवढे मताधिक्य मिळाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे सुरेश प्रभू ५००० मतांनी पिछाडीवर होते. कॉँग्रेसच्या नीलेश राणेंना या मतदारसंघात ५ हजारांचे मताधिक्य होते. यावेळच्या राऊत यांच्या मताधिक्याचा विचार केला, तर २००९मधील ५ हजार मतांची पिछाडी तोडून ३१५६५ चे मताधिक्य त्यांना मिळाले. लोकसभा निवडणुकीत नीलेश राणे यांना रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून किमान ५ ते १० हजारांचे मताधिक्य मिळवून देण्याचा प्रयत्न असल्याचे निवडणुकीआधी पालकमंत्री सामंत यांनी जाहीर केले होते. मात्र, मताधिक्य तर नाहीच उलट राणे यांना ३१ हजार मतांचा घाटाच झाला. त्यामुळे कॉँग्रेसमध्येही राष्ट्रवादीबाबत नाराजीचे वातावरण आहे. त्यामुळे आमदारकीची हॅट्ट्रिक करण्यासाठी सामंत यांना काँग्रेसचे कितपत सहकार्य मिळेल, याबाबतही शंका आहे. एकिकडे महायुती मतदारसंघात मजबूत असताना राष्ट्रवादीतही अनेक गटातटाचे राजकारण आहे. सन २००४च्या निवडणुकीत सामंत यांना साथ देणारे कुमार शेट्ये, बाबू पाटील यांच्यासारखे रत्नागिरी तालुक्यातील महत्त्वाचे अनेक मोहरे आज त्यांची साथ सोडून गेले आहेत. या बाजू लक्षात घेता, विधानसभेचा पेपर सामंत यांच्यासाठी थोडा अवघडच आहे. अर्थात मतदारसंघात कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचून विकासकामांना गती दिल्याने थेट कार्यकर्त्यांशी असलेले संबंध हे सामंत यांच्यासाठी निश्चित जमेची बाजू आहे. दुसरीकडे बाळ माने हे गेल्या दहा वर्षांच्या काळात या-ना त्या कारणाने सातत्याचे प्रकाशझोतात आहेत. आमदार नसले तरी त्यांच्या घरी रोजच जनता दरबार भरतो. लोकसभा निवडणुकीतील महायुतीचे मताधिक्य विधानसभेतही राखण्यासाठी त्यांच्या हालचाली सुरू आहेत.