शहरं
Join us  
Trending Stories
1
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
3
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
4
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
5
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
6
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
7
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
8
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
9
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
10
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
11
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
12
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न
13
Road Rage Case: ट्रक चालकाचे अपहरण; पूजा खेडकरच्या वडिलांच्या ड्रायव्हरला अटक, आई- वडील फरार
14
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
15
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
16
सूर्य ग्रहण २०२५: चंद्रग्रहणात केला तोच उपाय सूर्यग्रहणातही, साठवणीच्या अन्न-पाण्यावर ठेवा तुळशीचे पान 
17
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
18
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
19
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
20
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."

कॉजवे होऊनही प्रश्न ‘जैसे थे’च

By admin | Updated: March 3, 2015 00:28 IST

जिल्हा वार्षिक योजना : शासनाचे चौदा लाख रूपये पाण्यात

रत्नागिरी : सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे आणि लोकप्रतिनिधींनी निधी दिल्यानंतर पाठ फिरवल्याने शासनाचे तब्बल १४ लाख रुपये पाण्यात गेले आहेत. राजापूर-जैतापूरदरम्यान रखडलेला कॉजवे झाला. मात्र, खाडीत येणाऱ्या भरती ओहोटीचा विचारच न केल्याने भरती आली की भर पावसाळ्याप्रमाणे कॉजवेवर दीड फूट पाणी चढते. त्यामुळे कॉजवे होऊनही भरती आणि ओहोटीची वेळ पाहूनच त्याचा वापर करावा लागत आहे.राजापूर - जैतापूरदरम्यान असलेल्या वहाळावरील कॉजवे सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. देसाई वहाळावर जिल्हा परिषदेने बांधलेला लोखंडी साकव अत्यंत जीर्ण होऊन धोकादायक झाल्याने दळेचे माजी सरपंच विजय गोरिवले यांनी शासनाच्या पश्चिम घाट योजनेतून येथे छोट्या पुलाचे काम मंजूर करून घेतले होते. या पुलाची निविदा प्रक्रिया होऊन धनंजय चव्हाण नामक ठेकेदाराला कामाचा ठेका देण्यात आला होता. मात्र, शासनाने अचानक योजना गुंडाळल्याने हे काम होऊ शकले नाही. त्यानंतर विजय गोरिवले यांनी आमदार राजन साळवी यांना विनंती केली. आमदार साळवी यांनी सन २०१४/१५च्या जिल्हा वार्षिक योजनेतून साकव कार्यक्रमात या कॉजवेला मंजुरी मिळवली होती. हे काम होण्याबाबत ‘लोकमत’नेही वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानुसार या कॉजवेचे कामही सुरू झाले. मात्र, ठेकेदाराने खाडीच्या भरती ओहोटीचा विचारच केला नाही. त्यामुुळे या कामावरील पैसा पाण्यातच गेला आहे. विशेष म्हणजे कोणत्याही अधिकाऱ्याने तसेच ज्यांनी या कामासाठी निधी दिला, त्या आमदार राजन साळवी यांनी या कामाकडे ढुंकूनही पाहिले नाही. केवळ निधी देऊन पाठ फिरवली. त्यामुळे आता एवढा पैसा खर्च करूनही प्रश्न कायम आहे.१४.१२ लाख खर्चाला प्रशासकीय मान्यता असलेल्या कामाचे १२ लाख ११ हजार ८४२ रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले. खाडीच्या भरतीचं पाणी सुमारे दीड फूट कॉजवेवर येत असल्याने कॉजवे असूनही वाहतूक आणि रहदारी भरती ओहोटीची वेळ पाहूनच करावी लागते. कारण भरतीच्या वेळी हा कॉजवे सुमारे दीड फूट पाण्याखाली जातो. त्यामुळे दोन्ही भागांचा संपर्क तुटतोच शिवाय या मार्गावरील वाहतूकही भरती संपेपर्यंत खोळंबून राहाते. या कॉजवेवरून जाण्या-येण्यासाठी भरती ओहोटीचे वेळापत्रक पाहावे लागते. अशा कॉजवेवरून जाण्यापेक्षा जलप्रवास बरा, अशी प्रतिक्रिया सामान्य जनतेमधून उमटत आहेत.अतिवृष्टीत वहाळाचं पाणी साकवावरून जाणं हे ठीक आहे. मात्र खाडीच्या नियमित भरती ओहोटीचं पाणीदेखील या साकवावरून जावं, याबाबत परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.यावर कॉजवेची उंची वाढवणे हा एकच पर्याय आहे. बांधकाम जनतेसाठी होत असल्याने त्याचा उपयोग जनतेसाठी व्हायला हवा आणि एवढा पैसा ओतूनही समस्या तशीच राहात असेल तर त्याचा उपयोग काय? असा सवाल आता ग्रामस्थांमधून करण्यात येत आहे. जनतेसाठी कामे करावी लागतात. त्यावेळी त्याच्यासाठीचे नियम आणि निकषांचा प्रश्न येतोच कुठे? असा सवाल विजय गोरिवले यांनी केला आहे. (प्रतिनिधी)