शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

तीन हजार लोकांची वणवण

By admin | Updated: April 13, 2016 23:32 IST

जिल्हा परिषद : आठ टँकर्सने पाणीपुरवठा सुरु

रहिम दलाल -- रत्नागिरी --जिल्ह्यात २१ गावांतील ३५ वाड्यांमधील २९२५ लोकांना भीषण पाणीटंचाईची झळ बसली असून, त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. या टंचाईग्रस्तांना ८ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून, तोही अपुरा पडत असल्याने लोक हैराण झाले आहेत. जिल्ह्यात पावसाचे प्रमाण जास्त असले तरी येथील जमिनीमध्ये पाणी धरुन ठेवण्याची क्षमता नाही. कारण येथील जमीन जांभ्या दगडाची बनलेली असून, पडणारे पावसाचे पाणी नद्यांवाटे समुद्राला जाऊन मिळते. त्याचबरोबर उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाढणाऱ्या उष्म्याने पाण्याची पातळी खालावते. त्यामुळे विहिरी, नाले, झरे आटतात. कितीही पाऊस पडला तरी येथे उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई भेडसावते.मागील आठवड्यामध्ये जिल्ह्याच्या ४ तालुक्यांमध्ये ११ गावातील १८ वाड्यांना भीषण पाणीटंचाई जाणवत होती़ त्यामध्ये दापोलीमध्ये एका गावातील एक वाडीमध्ये, चिपळुणातील २ गावातील ४ वाड्यांमध्ये, खेडमध्ये ६ गावातील ११ वाड्यांना आणि लांजात २ गावातील २ वाड्यांचा समावेश होता. या टंचाईग्रस्तांना प्रशासनाकडून ६ टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात होता. दिवसेंदिवस वाढणाऱ्या उष्म्याचा परिणाम येथील पाणीसाठ्यावर होत असून, टंचाईग्रस्तांची संख्या वाढत आहे. चालू आठवड्यात खेड तालुक्यामध्ये ४ गावातील ७ वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. मंडणगडमध्ये १ एका गावातील एका वाडीमध्ये आणि संगमेश्वर तालुक्यात ५ गावातील ८ वाड्यांमध्ये चालू आठवड्यामध्ये पाणीटंचाई सुरु झाली आहे. या टंचाईग्रस्तांना २ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा सुरु करण्यात येत आहे.या टंचाईग्रस्तांना शासनाकडून केवळ ८ टँकर्सद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. त्यामुळे शासनाकडून टंचाईग्रस्तांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.तसेच संभाव्य टंचाईग्रस्त गावांसाठी पावसाळ्यापूर्वीच उपाययोजना करणे आवश्यक आहे, जेणेकरुन पावसाच्या पाण्याचा वापर करुन उन्हाळ्यातील पाणीटंचाईवर मात होऊ शकते.वाढत्या उकाड्यामुळे दिवसेंदिवस पाण्याची पातळी खालावत चालली आहे. त्यामुळे विहिरी, तलाव यांनी तळ गाठले आहेत. वाढणाऱ्या टंचाईग्रस्त वाड्यांमध्ये टँकरद्वारे पुरवण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करण्यात येत आहे. मात्र, इतर बाबींसाठी पाणी कुठून आणावे, असा प्रश्न भेडसावत आहे.