शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

दापाेली नगरपंचायतीतील सफाई कर्मचारी पगारापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

दापाेली : दापोली नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या अस्थायी व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारच नगरपंचायत प्रशासनाने न दिल्याने गुरुवारी ...

दापाेली : दापोली नगरपंचायतीमध्ये काम करणाऱ्या अस्थायी व कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांना दोन महिन्यांचा पगारच नगरपंचायत प्रशासनाने न दिल्याने गुरुवारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी नगराध्यक्ष परवीन शेख यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी सोमवार, दि. १२ जुलैपर्यंत सफाई कर्मचाऱ्यांचा पगार न दिल्यास दापोली शहरात भाजपतर्फे भीक मांगो आंदोलन करण्यात येईल व त्यातून जमा होणारी रक्कम नगरपंचायतीच्या प्रशासनाकडे पगारासाठी जमा करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

दापोली नगरपंचायत येथे सुमारे ६० ते ७० अस्थायी व कंत्राटी सफाई कर्मचारी असून, त्यांचा मागील दोन महिन्याचा पगार नगरपंचायतीने दिलेला नाही. कोरोनाच्या काळात कार्यरत असूनही त्यांना वेळेवर पगार दिला जात नसल्याची बाब माजी नगरसेवक संजय सावंत यांनी नगराध्यक्षा परवीन शेख यांना सांगितली. या कर्मचाऱ्यांना अत्यंत अल्प वेतन असून जर दोनदोन महिने त्यांना पगारच मिळत नसेल तर कोविडच्या काळात त्यांनी कुटुंबासाठी खर्च तरी कसा करायचा, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

यासंदर्भात बोलताना नगराध्यक्षा परवीन शेख यांनी सांगितले की, राज्य शासनाकडून नगरपंचायतीला वेतनासाठी येणारे सहायक अनुदान वेळेवर येत नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर देता येत नाही. शहरात विकासाची कोणतीही कामे सुरू नसताना तीन-तीन अभियंते नगरपंचायतीने कशासाठी घेतले आहेत याची विचारणा स्वरूप महाजन यांनी केली. कर्मचाऱ्यांच्या पगारासंदर्भात मुख्याधिकारी यांच्याशी चर्चा करून लवकरच सफाई कर्मचारी यांना पगार देण्यात येईल, असे नगरध्यक्षा परवीन शेख यांनी सांगितले. त्यावेळी दापोली नगरपंचायतीचा सर्व कारभार वरच्या मजल्यावरून (मुखाधिकारी यांच्याकडून) चालत असून, त्यावर नगराध्यक्ष यांचे नियंत्रण नसल्याचा आरोप संजय सावंत यांनी केला. यावेळी नगरसेविका जया साळवी, महिला मोर्चाच्या लीना शेठ, संदीप केळकर, अतुल गोंदकर, अजय शिंदे, स्वरूप महाजन, अ‍ॅड. ऋषिकेश भागवत, फझल रखांगे, संकेत कदम, शकील मणियार, कुणाल शिंदे, देवराज राठोड, दिप्तेश खटावकर उपस्थित होते.

------------------------------

आमदारांचाही विश्वास नाही

आमदार योगेश कदम यांनी मंजूर करून आणलेली शहरातील विकास कामे नगरपंचायतीकडे न देता ती सार्वजनिक बांधकाम विभागाकडे देण्यात आली आहेत. दापोली नगरपंचायतीच्या कारभारावर खुद्द आमदारांचाच विश्वास नसल्याचे दिसून येत असल्याचे भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष अजय शिंदे यांनी सांगितले.