शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

साैरदीप सुरू करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST

बंधारा लवकर पूर्ण करावा रत्नागिरी : रत्नागिरी ते मिऱ्या किनाऱ्याला सलग्न असणारा मिऱ्या बंधारा गेले अनेक वर्षे पूर्ण न ...

बंधारा लवकर पूर्ण करावा

रत्नागिरी : रत्नागिरी ते मिऱ्या किनाऱ्याला सलग्न असणारा मिऱ्या बंधारा गेले अनेक वर्षे पूर्ण न झाल्यामुळे समुद्राचे पाणी अनेकांच्या घराच्या अंगणात येते. फेसाळणाऱ्या, उंच उडणाऱ्या लाटांनी संरक्षक बंधाराच फोडून टाकला आहे. त्याचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याची मागणी होत आहे. पावसाळा तोंडावर असल्याने नागरिकांनी लक्ष वेधले आहे.

सराफी व्यवसायावर परिणाम

रत्नागिरी : गुढीपाडवा सणाला सोने खरेदी केली जाते. मात्र लाॅकडाऊनमुळे सराफी व्यवसाय अडचणीत आला आहे. स्टाॅकवरील कराची रक्कम वाढत आहे. सोन्याचा वाढत जाणाऱ्या दरामुळे स्टाॅकवरील कराची रक्कमदेखील वाढत असून भरणे अवघड झाले आहे.

लिलाव प्रक्रिया बंदच

दापोली : कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेतील सर्व दुकाने व्यापाऱ्यांकडून बंद ठेवण्यात आली आहेत. मच्छीमारांनी मासेमारी नाैका समुद्रात लोटल्या नसल्याने हर्णे बंदरात होणारा मासळी लिलाव बंदच आहे. बंदरावर शुकशुकाट जाणवत आहे.

केळबाई यात्रोत्सव रद्द

रत्नागिरी : समस्त मयेकर बंधू मंडळ-मुंबई संस्थेतर्फे दरवर्षी आयोजित करण्यात येणारा श्री केळबाई देवीचा वार्षिक जत्रोत्सव रद्द करण्यात आला आहे. दरवर्षी मालवण तालुक्यातील वायरी येथील श्री केळबाई मंदिर येथे दि. १९ व २० एप्रिल रोजी वार्षिक जत्रोत्सव होणार होता. जिल्ह्यातून अनेक भाविक यात्रेसाठी उपस्थिती दर्शवित असतात. मात्र मंदिरच बंद असल्याने उत्सव रद्द करण्यात आला आहे.

काजू बोर्ड निर्माण करण्याची मागणी

रत्नागिरी : काजूचे उत्पादन कमी असून हंगाम सुरू झाला असला तरी काजूला हमीभाव दिला जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. काजू किफायतशीर पीक असून काजू बोर्ड निर्माण करून हमीभाव जाहीर करण्यात यावा, अशी मागणी काजू उत्पादकातून होत आहे.

विद्यार्थ्यांना टॅबचे वाटप

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या शाळा क्रमांक ९ मधील गरीब विद्यार्थ्यांना नगरसेवक राजन शेट्ये, मधू घोसाळ, रशिदा गोदड यांच्या हस्ते टॅबचे वाटप करण्यात आले. नगरसेविका मीरा पिलणकर उपस्थित होत्या. नगर परिषदेकडून शहरातील १०० विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येत आहेत. ऑनलाईन शिक्षणासाठी याचा वापर होणार आहे.

चुकीचा मजकूर

मंडणगड : सार्वजिनक बांधकाम खात्याने वाहतुकीस उपयुक्त ठरतील व प्रवाशांना गावे, अंतराची माहिती देणाऱ्या फलक नूतनीकरणाची मोहीम घाईघाईत राबविली आहे. या मोहिमेत अनेक ठिकाणी नव्याने फलक लावण्यात आले असले तरी त्यामध्ये असंख्य चुका आहेत. त्याकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

पालगड किल्ल्यावर स्वच्छता मोहीम

दापोली : सह्याद्री प्रतिष्ठानच्या दापोली, मंडणगड, खेड विभागांच्या समूहातर्फे पालगड किल्ल्यांवर स्वच्छता माेहीम राबविण्यात आली. किल्ल्यावर मध्यभागी असलेल्या पाण्याच्या टाकीतील माती काढून स्वच्छ करण्यात आली. मुख्य प्रवेशद्वारासमोरील, मध्यवर्ती भागातील झाडीझुडपे, गवत काढून टाकण्यात आले.

कविता लेखन स्पर्धा

देवरूख : साहित्यप्रेमी मंडळ, सोमेश्वर (बारामती) तर्फे राज्यस्तरीय खुली मराठी कविता लेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी स्वरचित एक किंवा दोन कविता पाठविण्याची सूचना केली आहे. विजेते प्रथम तीन क्रमांकासह उत्तेजनार्थ दोन क्रमांकांना रोख रकमेची बक्षिसे दिली जाणार आहेत. दि. ३० एप्रिलपर्यंत कविता पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.