शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
2
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
3
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
4
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
5
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
6
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
7
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
8
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
9
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
10
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत
11
Asia Cup 2025 : बाबरनं षटकार मारत रुबाब झाडला! पण दुसऱ्याच चेंडूवर गोलंदाजानं असा घेतला बदला (VIDEO)
12
शाळेच्या वेळेत मुले गावभर फिरले, गावकरी शाळेत जाऊन पाहतात तर काय? विद्येच्या मंदिरात नशेचा नंगा नाच !
13
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
14
दुपारी आनंदानं बहिणीशी बोलली अन् संध्याकाळी सगळं संपवलं! जळगावच्या नवविवाहितेनं उचललं टोकाचं पाऊल
15
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
16
आप खासदार संजय सिंह जम्मू-काश्मीरमध्ये नजरकैदेत; अरविंद केजरीवालांचा भाजपवर निशाणा...
17
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
18
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
19
जिंकलंस भावा! जवानाने आई-वडिलांचा 'असा' केला मोठा सन्मान; Video पाहून म्हणाल 'एक नंबर'
20
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन

रस्त्यांवरील चिखलाचे साम्राज्य हटवा; समविचारीचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर भर पावसात जे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्याला वेळीच लक्ष न देणारे नगरपालिका ...

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर भर पावसात जे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्याला वेळीच लक्ष न देणारे नगरपालिका प्रशासन आणि नळपाणी योजनेचा ठेकेदार कारणीभूत आहेत. संबंधितांच्या अक्षम्य बेपर्वाईतून नागरिकांना अकारण त्रास सोसावा लागत आहे. रस्त्यावरील चिखल दूर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे देण्यात आले आहे.

याबाबत समविचारीच्या वतीने शहरातील नागरिकांना संबंधित निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुमारे ६३ नागरिकांनी यात सहभाग घेतला. यात असे नमूद करण्यात आले आहे की, संपूर्ण शहरात उन्हाळ्यात नळपाणी योजनेच्या निमित्ताने खोदाई झाली; पण वेळीच खड्डे बुजविले गेले नाहीत. तेव्हा दक्षता घेतली असती तर कदाचित ही परिस्थिती झाली नसती. त्या ठेकेदारावर निर्बंध वा देखरेखही झाली नाही. निव्वळ बेपर्वाईतून आबालवृद्धांना भर पावसात चिखलाच्या खाईतून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. या निमित्ताने होणाऱ्या राजकीय उणीदुणीत जनतेसह आम्हाला त्यात स्वारस्य नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अस्तावस्त पसरलेल्या चिखलातून जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने अनिर्बंध घाणीमुळे रोगराई पसरण्याचा धोका विचारात घेऊन चिखल माती त्वरित साफ करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात यावे. जिल्हास्तरावरील सर्व शासकीय कार्यालये मुख्यत्वे आपल्या अधिपत्याखालील कार्यालय इथे असताना जिल्हा प्रशासनप्रमुखांच्या अखत्यारितच समोरासमोर हे असे घडावे, हे दुर्दैवी असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांच्या या कारणामुळे होणाऱ्या संभाव्य उद्रेकाला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या निवेदनाद्वारे समविचारीचे माजी उपनगराध्यक्ष बाबा ढोल्ये, संजू पुनसकर, रघुनंदन भडेकर, नीलेश आखाडे, मंदार लेले, राजाराम गावडे, मयूर नाईक, प्रवीण नागवेकर, मनोहर गुरव आदींनी दिला आहे.