शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदाराचे बनावट लेटरहेड, सही वापरून ३ काेटींचा निधी पळवला
2
गरीब अन् मध्यमवर्गीयांना दिलासा; ‘जीएसटी’त बदलाचा केंद्राचा विचार; आवश्यक वस्तूंवरील १२% कर रद्द करण्याची शक्यता
3
‘घड्याळ’बाबत जसा आदेश, तसाच ‘धनुष्यबाण’बाबतही द्या; उद्धवसेना सुप्रीम कोर्टात; १४ जुलै रोजी सुनावणी
4
ठाकरे - भाऊबंदकी ते भावबंधन; मागचे सर्व विसरून नवीन सुरुवात करावी लागेल
5
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून विधानसभेत रणकंदन, विरोधकांनी सरकारला धरले धारेवर; तत्काळ चर्चेची मागणी फेटाळली
6
मनसे-उद्धवसेनेकडून मेळावा स्थळाची पाहणी; सर्वच राजकीय नेत्यांना आमंत्रण
7
१.३५ लाख कोटींचे गुंतवणूक प्रस्ताव मंजूर; १ लाख रोजगारनिर्मिती होणार
8
वाहतूकदारांचा संप सुरूच, परिवहनमंत्र्यांसोबतच्या बैठकीत तोडगा निघाला नाही
9
त्यांचा २,००० कोटींच्या मालमत्तेवर हाेता डाेळा; साेनिया, राहुल गांधींनी कट रचल्याचा ईडीचा आरोप
10
लिंगाची पुनर्रचना करून रुग्णाला दिले नवे आयुष्य; नागपुरात मध्य भारतातील पहिल्या शस्त्रक्रियेचा दावा
11
काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
12
गळके छत, ओल्या भिंती... सांगा आता शिकायचं कसं; अंबरनाथ नगरपालिकेच्या शाळेची दुरवस्था; विद्यार्थ्यांचे हाल
13
कल्याणमधील पाणीपुरी विकणाऱ्याच्या मुलाने मारली ‘आयआयटी’पर्यंत मजल; रुरकी येथील आयआयटीत मिळाला प्रवेश
14
पदवी प्रमाणपत्रावर ‘मुंबई’चे स्पेलिंग चुकले; कंत्राटदाराला ठेक्याच्या २०% दंड; मुंबई विद्यापीठाच्या समितीच्या अहवालानंतर कारवाई
15
परिवहन मंत्र्यांनीच पकडली रॅपिडो बाइक टॅक्सी; ॲप नसल्याची परिवहन विभागाकडून खोटी माहिती
16
विदेशी विद्यापीठांचा उपयोग ‘इंडिया’ला होईल की ‘भारता’ला?
17
शशी थरूर, आप खुश तो बहोत होंगे!
18
मायक्रोसॉफ्टमध्ये मोठी कपात होणार! ९००० हून अधिक कर्मचाऱ्यांना फटका बसणार?
19
यशस्वी जैस्वालची सेंच्युरी हुकली! पण एका डावात अनेक विक्रम; हिटमॅन रोहित शर्मालाही टाकले मागे
20
खतरनाक इनस्विंग! स्टायलिश अंदाजात बॉल सोडला अन् 'क्लीन बोल्ड' होऊन तंबूत परतला (VIDEO)

रस्त्यांवरील चिखलाचे साम्राज्य हटवा; समविचारीचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर भर पावसात जे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्याला वेळीच लक्ष न देणारे नगरपालिका ...

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर भर पावसात जे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्याला वेळीच लक्ष न देणारे नगरपालिका प्रशासन आणि नळपाणी योजनेचा ठेकेदार कारणीभूत आहेत. संबंधितांच्या अक्षम्य बेपर्वाईतून नागरिकांना अकारण त्रास सोसावा लागत आहे. रस्त्यावरील चिखल दूर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे देण्यात आले आहे.

याबाबत समविचारीच्या वतीने शहरातील नागरिकांना संबंधित निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुमारे ६३ नागरिकांनी यात सहभाग घेतला. यात असे नमूद करण्यात आले आहे की, संपूर्ण शहरात उन्हाळ्यात नळपाणी योजनेच्या निमित्ताने खोदाई झाली; पण वेळीच खड्डे बुजविले गेले नाहीत. तेव्हा दक्षता घेतली असती तर कदाचित ही परिस्थिती झाली नसती. त्या ठेकेदारावर निर्बंध वा देखरेखही झाली नाही. निव्वळ बेपर्वाईतून आबालवृद्धांना भर पावसात चिखलाच्या खाईतून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. या निमित्ताने होणाऱ्या राजकीय उणीदुणीत जनतेसह आम्हाला त्यात स्वारस्य नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अस्तावस्त पसरलेल्या चिखलातून जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने अनिर्बंध घाणीमुळे रोगराई पसरण्याचा धोका विचारात घेऊन चिखल माती त्वरित साफ करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात यावे. जिल्हास्तरावरील सर्व शासकीय कार्यालये मुख्यत्वे आपल्या अधिपत्याखालील कार्यालय इथे असताना जिल्हा प्रशासनप्रमुखांच्या अखत्यारितच समोरासमोर हे असे घडावे, हे दुर्दैवी असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांच्या या कारणामुळे होणाऱ्या संभाव्य उद्रेकाला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या निवेदनाद्वारे समविचारीचे माजी उपनगराध्यक्ष बाबा ढोल्ये, संजू पुनसकर, रघुनंदन भडेकर, नीलेश आखाडे, मंदार लेले, राजाराम गावडे, मयूर नाईक, प्रवीण नागवेकर, मनोहर गुरव आदींनी दिला आहे.