शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
6
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
7
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
8
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
9
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
10
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
11
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
12
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
13
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
14
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
15
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
16
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
17
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
18
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
19
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
20
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यांवरील चिखलाचे साम्राज्य हटवा; समविचारीचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर भर पावसात जे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्याला वेळीच लक्ष न देणारे नगरपालिका ...

रत्नागिरी : रत्नागिरी शहरातील रस्त्यांवर भर पावसात जे चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे त्याला वेळीच लक्ष न देणारे नगरपालिका प्रशासन आणि नळपाणी योजनेचा ठेकेदार कारणीभूत आहेत. संबंधितांच्या अक्षम्य बेपर्वाईतून नागरिकांना अकारण त्रास सोसावा लागत आहे. रस्त्यावरील चिखल दूर करण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने जिल्हाधिकारी यांना ई-मेलद्वारे देण्यात आले आहे.

याबाबत समविचारीच्या वतीने शहरातील नागरिकांना संबंधित निवेदन सादर करण्याचे आवाहन करण्यात आले होते. सुमारे ६३ नागरिकांनी यात सहभाग घेतला. यात असे नमूद करण्यात आले आहे की, संपूर्ण शहरात उन्हाळ्यात नळपाणी योजनेच्या निमित्ताने खोदाई झाली; पण वेळीच खड्डे बुजविले गेले नाहीत. तेव्हा दक्षता घेतली असती तर कदाचित ही परिस्थिती झाली नसती. त्या ठेकेदारावर निर्बंध वा देखरेखही झाली नाही. निव्वळ बेपर्वाईतून आबालवृद्धांना भर पावसात चिखलाच्या खाईतून जीव मुठीत घेऊन चालावे लागत आहे. या निमित्ताने होणाऱ्या राजकीय उणीदुणीत जनतेसह आम्हाला त्यात स्वारस्य नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

अस्तावस्त पसरलेल्या चिखलातून जागोजागी कचऱ्याचे साम्राज्य पसरल्याने अनिर्बंध घाणीमुळे रोगराई पसरण्याचा धोका विचारात घेऊन चिखल माती त्वरित साफ करण्याचे निर्देश संबंधितांना देण्यात यावे. जिल्हास्तरावरील सर्व शासकीय कार्यालये मुख्यत्वे आपल्या अधिपत्याखालील कार्यालय इथे असताना जिल्हा प्रशासनप्रमुखांच्या अखत्यारितच समोरासमोर हे असे घडावे, हे दुर्दैवी असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे.

शहरातील नागरिकांच्या या कारणामुळे होणाऱ्या संभाव्य उद्रेकाला जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा या निवेदनाद्वारे समविचारीचे माजी उपनगराध्यक्ष बाबा ढोल्ये, संजू पुनसकर, रघुनंदन भडेकर, नीलेश आखाडे, मंदार लेले, राजाराम गावडे, मयूर नाईक, प्रवीण नागवेकर, मनोहर गुरव आदींनी दिला आहे.