शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
5
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
6
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
7
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
8
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
9
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
10
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
11
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
12
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
13
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या
14
बॉलिवूड सेलिब्रिटींच्या घरी बाप्पाचे आगमन, पाहा खास PHOTOS
15
एका वर्षापूर्वी झालेला बेपत्ता; आता केदारनाथ मंदिराजवळ सापडला भाविकाचा सांगाडा
16
इस्रायलप्रमाणे युद्धाची तयारी करत आहे 'हा' देश, ८१ प्रदेशांमध्ये काम सुरू!
17
"भारत आणि अमेरिका यांच्यात लवकरच होणार 'मुक्त व्यापार करार'!"; माजी परराष्ट्र सचिवांचं मोठं विधान, आणखी काय म्हणाले?
18
महाराष्ट्राच्या सीमेवर भयंकर चकमक; 'सी- ६०' दलाकडून भर पावसात चार नक्षल्यांचा खात्मा
19
भयंकर... पाचवीतील विद्यार्थिनीने शाळेतच घेतलं पेटवून, कुटुंबीय म्हणाले, 'तिच्यावर अत्याचार...'
20
हे लक्षात ठेवाच! कमी पाणी प्यायल्याने वाढू शकते स्ट्रेस लेव्हल; दररोज किती प्यावं पाणी?

देवरुखात ‘सप्तलिंगी’ बचाव

By admin | Updated: May 21, 2015 00:08 IST

सृष्टी नेचर क्लब : गाळमुक्त नदीसाठी जिल्ह्यातील पहिली मोहीम

देवरुख : देवरुख शहरातून जाणारी टिकलेश्वरच्या पायथ्याशी उगम पावून वांद्री येथे बावनदीला मिळणारी सुमारे १८ किलोमीटर लांबीची सप्तलिंगी नदी प्रदूषणापासून संरक्षित करण्याच्या हेतूने ‘सप्तलिंगी बचाव’ मोहीम राबवण्यात येत आहे. देवरुखमधील ‘सृष्टी नेचर क्लब’च्या वतीने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.सृष्टी नेचर क्लब या संस्थेने जिल्ह्यात पहिल्यांदाच असा उपक्रम राबवला आहे. या मोहिमेची संकल्पना नेचर क्लब आणि सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते यांच्या विचारातून पुढे आली आहे. तीन दिवसांच्या कालावधीत ही मोहीम राबवली जाणार आहे. जिल्हा परिषद शाळा, हरपुढे येथे २३ मे रोजी सकाळी या मोहिमेचे उद्घाटन होणार आहे. उद्घाटनानंतर सृष्टी नेचर क्लबचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि विविध पर्यावरणविषयकतज्ज्ञ, लोकप्रतिनिधी हे स्थानिक ग्रामस्थांच्या सहकार्याने नदीच्या पात्रातून पायी प्रवास करुन नदीचा पर्यावरणविषयक तसेच अन्य बाबींविषयक अभ्यास करुन त्याच्या नोंदी करण्यात येणार आहेत.तसेच या नदीपात्राच्या दोन्ही बाजूच्या गावातील सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ यांच्या बैठका घेऊन नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी आणि त्याअनुषंगाने विविध योजना राबवण्यासाठी चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती सृष्टी नेचर क्लबच्या वतीने देण्यात आली आहे.नदीच्या उगमापासून तळेकांटे येथील बावनदीच्या संगमापर्यंत नदीपात्रातून प्रवास करणे, नदीतील प्रदूषणकारी घटकांचा अभ्यास करुन नोंदी करणे, नदीतील पाण्याची पातळी तपासणे, नदीकाठच्या विविध पाणीपुरवठा योजनांची माहिती संंकलीत करणे, नदीतील बंधारे, डोह व नदी पात्रात साचलेला गाळ यांच्या नोंदी करणे, नदीकाठच्या विविध वनस्पती व वृक्ष यांचा अभ्यास करुन नोंदी करणे, नदीतील मत्स्यजीव व अन्य प्राणीजीवन यांचा अभ्यास करणे, हे या मोहीमेचे उद्देश आहेत.त्याचबरोबर सप्तलिंगी नदीला मिळणाऱ्या अन्य उपनद्या व पऱ्ये यांच्या माध्यमातून होणाऱ्या प्रदूषणाची माहिती संकलीत करणे. संबंधित गावाच्या प्रमुखांना ते प्रदूषण सुरु करण्यासाठी जबाबदारी देण्यात येणार आहे.मानवी कारणामुळे होणाऱ्या प्रदूषणाबाबत नदीच्या दोन्ही बाजूच्या जनतेला माहिती देऊन त्याबद्दल प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबद्दल आग्रह धरण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)तीन दिवसांची योजनादरम्यान, सृष्टी नेचर क्लबतर्फे राबवण्यात आलेला हा उपक्रम जिल्ह्यातील पहिला उपक्रम ठरला आहे. खारलँड विभागाने निवडलेल्या दोन बंधाऱ्यांवर ४ किलोवॅट अपारंपरिक ऊर्जा तयार करण्यात येणार होती. त्यामुळे भविष्यात छोट्या गावांसाठी ही ऊर्जानिर्मिती फायद्याची ठरली असती. मात्र, खारलँडकडे त्यासाठी तरतूद नसल्याने हे प्रस्ताव बारगळलेला आहे.