शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
नागपुरात चोरट्यांचा आतंक; दिवसाढवळ्या कारची काच फोडून २५ लाख पळवले!
4
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
6
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
7
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
8
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
9
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
10
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
11
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
12
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
13
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
14
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
15
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
16
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
17
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
18
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
19
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
20
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?

देवरुखात बीएसएनएलचा बोजवारा!

By admin | Updated: November 25, 2015 00:38 IST

ग्राहकांची गैरसोय : आॅनलाईन बँकिंग सेवाही विस्कळीत

देवरुख : गेल्या दोन दिवसांपासून भारत दूरसंचार निगमच्या मोबाईलला रेंज नसल्याने ग्राहकांतून कमालीचा संताप व्यक्त करण्यात येत आहे. नेटवर्क नसल्याने मोबाईल अक्षरश: खेळण्याचे डबे झाले आहेत. रेंजअभावी देवरुख परिसरातील एटीएमदेखील बंद असल्याने ग्राहकांची गैरसोय होत आहे. मोबाईलबरोबरच दूरध्वनीदेखील कोमातच गेले आहेत.थ्रीजी, फोरजीसारख्या सेवा आज उपलब्ध होत असल्याने आणि गावागावात बीएसएनएलची सेवा उपलब्ध असल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातदेखील बीएसएनएलला मागणी वाढत आहे. मागणी वाढत असताना बीएसएनएल कंपनीने ग्राहकांना विनाव्यत्य सेवा देण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. मात्र, दिवसेंदिवस बीएसएनएलच्या सेवेचा बोजवारा उडत आहे.ज्या ठिकाणी सर्वच शासकीय कार्यालये, रुग्णालये, बँका, एटीएम, महाविद्यालये असलेल्या शहरामध्ये बीएसएनएलच्या यंत्रणेचा सलग दोन दिवस बोजवारा उडत असल्याने ग्राहकांमध्ये कमालीचा असंतोष पसरला आहे.मोबाईलबरोबरच देवरुख शहरासह आंगवली, साखरपा परिसरातील हजारो ग्राहकांचे दूरध्वनीदेखील कोमातच गेले असल्याने संपर्क साधणे कठीण होऊन बसले आहे. बीएसएनएलच्या या कारभाराबाबत संतप्त ग्राहक कोणत्याही क्षणी कार्यालयावरच धडकण्याची स्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारनंतर हे दूरध्वनी सुरु करण्यात आले. (प्रतिनिधी)