शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर काँग्रेस पक्षाला थेट आरोपी बनवता येईल"; नॅशनल हेराल्ड प्रकरणात EDचा न्यायालयात दावा
2
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना मोठा धक्का, सहा महिन्यांच्या तुरुंगवासाची शिक्षा!
3
"माझ्यासमोरच त्याने तिघांना मारलंय"; वाल्मिक कराडच्या जुन्या सहकाऱ्याचा धक्कादायक दावा; म्हणाले, "त्याला बीडचा..."
4
"लग्न करुन येऊ? घर देणार का मग?", अ‍ॅक्टर असल्यामुळे मिळत नाहीये घर, पूजा कार्तुडे संतापली!
5
...तर अशी भागणार पाकिस्तानची तहान; सिंधू जल करार रद्द केल्यानंतर शहबाज शरीफ मोठं पाऊल उचलणार!
6
“उद्धव ठाकरे ‘मातोश्री’चा एक हिस्सा काढून राज ठाकरेंना देणार का?”; नारायण राणेंचा सवाल
7
ENG vs IND : यशस्वी जैस्वाल इंग्लंडला नडला अन् कॅप्टन बेन स्टोक्सलाही भिडला; नेमकं काय घडलं?
8
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
9
काँग्रेस मजबूत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष सपकाळांचा पुढाकार; ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या
10
KL राहुलला विश्वासच बसेना! क्रिस वोक्सनं अप्रतिम चेंडूवर उडवला त्रिफळा (VIDEO)
11
मुसळधार पावसात AC सुरू ठेवणं योग्य आहे का? बहुतेक लोक करतात 'ही' चूक
12
राहुल आणि सोनिया गांधींनी केलेला २००० कोटी रुपये लाटण्याचा प्रयत्न; ईडीचा मोठा आरोप
13
भयंकर! कुत्रा चावल्यामुळे कबड्डीपटूचा तडफडून मृत्यू; अँटी रेबीज इंजेक्शन न घेणं बेतलं जीवावर
14
लग्नाआधीच अनेकदा तुझ्या रूममध्ये का दिसायची रितिका? भज्जीच्या प्रश्नावर रोहित शर्माचं भन्नाट उत्तर
15
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
16
काय वाटले असेल...? एनआयटी टॉपरला ४५ लाखांचे पॅकेज मिळाले अन् अचानक नोकरीवरून काढले...
17
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षावर दोन ग्रहणांचे सावट; श्राद्धविधीत होणार अडचण? 
18
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
19
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
20
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत

पावसाचा जाेर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीही ठरावीक जोरदार सरी वगळता पावसाची काहीशी विश्रांती ...

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीही ठरावीक जोरदार सरी वगळता पावसाची काहीशी विश्रांती होती. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर पाहता संततधार सुरूच राहणार असे वाटत होते. मात्र, अधूनमधून सूर्यदर्शन घडवीत मधूनच सर कोसळत होती. दरम्यान गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३०६.८० मिलीमीटर (३४.०९ मिलीमीटर) पाऊस झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यात खोपी येथे महेश वसंत निकम हे १० जून रोजी घरातून बेपत्ता होते, त्यांचा मृतदेह १३ जून रोजी चक्रवती नदीजवळ सापडला.

रत्नागिरी तालुक्यात शिरगाव येथे महेंद्र प्रभाकर खामकर व इतर ४ जणांच्या शेतात पावसाचे पाणी शिरून शेताचे (नारळ व आंबे व पेरणी केलेले भात क्षेत्र) बांध फुटून अंशत: नुकसान झाले. हरचिरी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. कुरतडे येथील चंद्रकांत लिंगायत यांच्या ताब्यातील गाडी (क्र. एमएच ०३ बीएच ३३४०) ही टेंभ्ये पूल येथे चालवित आले असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. त्यांनी गाडीतून उडी घेऊन बाहेर पडल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. उक्षी येथे दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला आहे. बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.

राजापूर तालुक्यात धोपेश्वर येथील गणपती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली. गोविळ-बुरंबेवाडी या रस्त्यावर पन्हाळेतर्फे राजापूर येथे मोरी पावसामुळे खचली.

मंगळवारी सकाळी पावसाचा जोर वाढेल, असे वाटत होते. मात्र, अधूनमधून विश्रांती घेत पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, दिवसभर पावसाचा जोर कमी झालेला दिसत होता.