शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

पावसाचा जाेर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीही ठरावीक जोरदार सरी वगळता पावसाची काहीशी विश्रांती ...

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीही ठरावीक जोरदार सरी वगळता पावसाची काहीशी विश्रांती होती. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर पाहता संततधार सुरूच राहणार असे वाटत होते. मात्र, अधूनमधून सूर्यदर्शन घडवीत मधूनच सर कोसळत होती. दरम्यान गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३०६.८० मिलीमीटर (३४.०९ मिलीमीटर) पाऊस झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यात खोपी येथे महेश वसंत निकम हे १० जून रोजी घरातून बेपत्ता होते, त्यांचा मृतदेह १३ जून रोजी चक्रवती नदीजवळ सापडला.

रत्नागिरी तालुक्यात शिरगाव येथे महेंद्र प्रभाकर खामकर व इतर ४ जणांच्या शेतात पावसाचे पाणी शिरून शेताचे (नारळ व आंबे व पेरणी केलेले भात क्षेत्र) बांध फुटून अंशत: नुकसान झाले. हरचिरी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. कुरतडे येथील चंद्रकांत लिंगायत यांच्या ताब्यातील गाडी (क्र. एमएच ०३ बीएच ३३४०) ही टेंभ्ये पूल येथे चालवित आले असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. त्यांनी गाडीतून उडी घेऊन बाहेर पडल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. उक्षी येथे दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला आहे. बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.

राजापूर तालुक्यात धोपेश्वर येथील गणपती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली. गोविळ-बुरंबेवाडी या रस्त्यावर पन्हाळेतर्फे राजापूर येथे मोरी पावसामुळे खचली.

मंगळवारी सकाळी पावसाचा जोर वाढेल, असे वाटत होते. मात्र, अधूनमधून विश्रांती घेत पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, दिवसभर पावसाचा जोर कमी झालेला दिसत होता.