शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

पावसाचा जाेर कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीही ठरावीक जोरदार सरी वगळता पावसाची काहीशी विश्रांती ...

रत्नागिरी : जिल्ह्यात सोमवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. रात्रीही ठरावीक जोरदार सरी वगळता पावसाची काहीशी विश्रांती होती. मंगळवारी सकाळी पावसाचा जोर पाहता संततधार सुरूच राहणार असे वाटत होते. मात्र, अधूनमधून सूर्यदर्शन घडवीत मधूनच सर कोसळत होती. दरम्यान गेल्या २४ तासात जिल्ह्यात ३०६.८० मिलीमीटर (३४.०९ मिलीमीटर) पाऊस झाल्याची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षाकडे झाली आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, खेड तालुक्यात खोपी येथे महेश वसंत निकम हे १० जून रोजी घरातून बेपत्ता होते, त्यांचा मृतदेह १३ जून रोजी चक्रवती नदीजवळ सापडला.

रत्नागिरी तालुक्यात शिरगाव येथे महेंद्र प्रभाकर खामकर व इतर ४ जणांच्या शेतात पावसाचे पाणी शिरून शेताचे (नारळ व आंबे व पेरणी केलेले भात क्षेत्र) बांध फुटून अंशत: नुकसान झाले. हरचिरी येथे रस्त्यावर दरड कोसळल्याने रस्ता बंद झाला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे. कुरतडे येथील चंद्रकांत लिंगायत यांच्या ताब्यातील गाडी (क्र. एमएच ०३ बीएच ३३४०) ही टेंभ्ये पूल येथे चालवित आले असता पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. त्यांनी गाडीतून उडी घेऊन बाहेर पडल्याने कोणतीही दुर्घटना घडली नाही. उक्षी येथे दरड कोसळल्याने हा रस्ता बंद झाला आहे. बांधकाम विभागाकडून दरड हटविण्याचे काम सुरू आहे.

राजापूर तालुक्यात धोपेश्वर येथील गणपती मंदिराची संरक्षक भिंत कोसळली. गोविळ-बुरंबेवाडी या रस्त्यावर पन्हाळेतर्फे राजापूर येथे मोरी पावसामुळे खचली.

मंगळवारी सकाळी पावसाचा जोर वाढेल, असे वाटत होते. मात्र, अधूनमधून विश्रांती घेत पावसाच्या सरी कोसळत होत्या. मात्र, दिवसभर पावसाचा जोर कमी झालेला दिसत होता.