शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

दापोली---कमी मतदानाची उत्साही चर्चा

By admin | Updated: October 17, 2014 22:13 IST

कमी झालेले मतदान निरुत्साहामुळे झाले की

शिवाजी गोरे - दापोली -दापोली विधानसभा मतदारसंघात २ लाख ६३ हजार एवढी मतदारसंख्या आहे. त्यापैकी १ लाख ६१ हजार ६५० एवढे मतदान झाल्याने या मतदारसंघात सरासरी ६१ टक्के मतदान झाले आहे. २००९च्या तुलनेत यावर्षी मतदानात मोठी वाढ झाली नाही. मतदारांना परिवर्तन हवे होते म्हणून लोकसभेला ७० टक्केपेक्षा अधिक मतदान झाले होते. परंतु यावेळी मात्र मतदारांमध्ये फारसा उत्साह आढळून आला नाही. कमी झालेले मतदान निरुत्साहामुळे झाले की, मतदारांना बदल नको होता, याबाबत उत्सुकता लागून राहिली आहे.दापोली विधानसभा मतदारसंघात यावेळी फारच चुरशीची लढाई पाहायला मिळाली. निवडणुकीच्या रिंगणात १० उमेदवार असल्याने मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडते, हा मुद्दा विजय सोपा करणारा असल्याने राजकीय पक्षांचे डावपेच अपक्षांभोवती फेकले गेले होते. या निवडणुकीत शिवसेनेकडून सूर्यकांत दळवी हे एकमेव अनुभवी उमेदवार निवडणूक रिंगणात होते. पाच वेळा निवडून जाणारे दळवी यावेळी षटकार मारण्याच्या तयारीत आहेत. मात्र, ते यावेळी षटकार मारतात की, षटकार मारताना ‘कॅचआऊट’ होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागल आहे. दापोली विधानसभा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र, शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच भाजपा, राष्ट्रवादी या पक्षाने तगडे आव्हान दिल्यामुळे या वेळी विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत सेनेला झगडावे लागले. दापोली शिवसेनेचा बालेकिल्ला असूनसुद्धा कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची प्रचार सभा घेण्याची वेळ पहिल्यांदाच आली. सत्ता आल्यास दापोलीला लाल दिवा देण्यात येईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. हे स्वप्न पूर्ण होते की स्वप्नच राहाते, हे येत्या १९ तारखेलाच कळेल.दापोली विधानसभा मतदार संघात यावेळी भाजपातर्फे केदार साठे तरुण नेतृत्व निवडणुकीच्या रिंगणात होते. शिवसेनेचे आमदार सूर्यकांत दळवी यांना विकासाच्या मुद्द्यावर उघडपणे चॅलेंज देणारे केदार साठे एकमेव होते. मात्र, त्यांनी केलेल्या प्रचाराचा किती फायदा झाला. मतदारांना काय अपेक्षित आहे. मतदार तरुण नेतृत्व मान्य करतात की जुनं तेच सोने म्हणतात. हा मुद्दाही तितकाच महत्त्वाचा आहे. भाजपा यावेळी स्वतंत्र लढल्यामुळे सेनेमुळे झाकोळलेल्या भाजपाची ताकद किती हेसुद्धा या निकालावरुन सिद्ध होणार आहे. दापोली मतदारसंघात २५ वर्षांनंतर पहिल्यांदाच राष्ट्रवादीला स्वतंत्र लढण्याची संधी मिळाली. आघाडीतही जागा काँग्रेस पक्षाकडे होती. मात्र, काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटातटामुळे ही जागा १९९० च्या निवडणुकीत काँग्रेसला गमवावी लागली. राष्ट्रवादीच्या उदयानंतर राष्ट्रवादीने या जागेवर पहिल्यांदाच राष्ट्रवादीचा उमेदवार निवडणूक रिंगणात उभा केला होता. राष्ट्रवादीचे संजय कदम यांनी या निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण केली. राष्ट्रवादीचे स्वतंत्र अस्तित्व दाखविण्यासाठी ही निवडणूक फार महत्त्वाची मानली जात आहे. परंतु एकेकाळचे सहकारी राष्ट्रवादीचे खेड माजी तालुकाध्यक्ष विजय कदम यांनी ऐन निवडणुकीत राष्ट्रवादी सोडून शिवसेनेत प्रवेश केला. रामदास कदम समर्थक आपल्याला साथ देतील, असे वाटत असताना रामदास कदम यांचे बंधू अण्णा कदम यांनी खेड तालुका शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहील, असा रामदास कदम यांचा आदेश असल्याचे सांगून खेड शिवसेनेला कानमंत्र देण्याचा उद्धव ठाकरे यांच्या साक्षीने प्रयत्न केला. मात्र, विजय कदम फॅक्टर, रामदास कदम फॅक्टर किती प्रभावी ठरतो. मतदार कोणाला झुकते माप देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.