शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेला धक्का? १५ माजी नगरसेवक नाराजीची चर्चा
2
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, वक्फ कायद्याला अभय; बोर्डात ३ गैर मुस्लीम सदस्य बनू शकतात, परंतु...
3
Acharya Devvrat: आचार्य देवव्रत यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ 
4
पाकिस्तान फायनलमध्ये हवीय...! प्लीज भारताने पुढला सामना बॉयकॉट करावा; पाकिस्तानी चाहत्यांची मागणी
5
"...तर माझ्या वडिलांचा जीव वाचला असता"; नवजोत सिंग यांच्या मुलाने केला गंभीर आरोप
6
ITR भरण्याची अंतिम मुदत वाढणार? सोशल मीडियावर चर्चा; आयकर विभागाने केलं स्पष्ट
7
"आपण कधी काळी तोडले गेलो, पण तेही परत मिळवू"; सरसंघचालक मोहन भागवत यांचे मोठे विधान
8
टीम इंडियाने हस्तांदोलन नाकारल्याने पाकिस्तानचा तीळपापड, पत्रक जारी करत नोंदवला निषेध
9
बाबाचं लक्ष फोनमध्ये, आई चेंजिंगरूममध्ये; स्विमिंग पूलमध्ये पडलेल्या ४ वर्षांच्या मुलीकडे कुणी पाहिलच नाही अन्...
10
Ameesha Patel : "९० टक्के सेलिब्रिटी पैसे देऊन..."; अमिषा पटेलने उलगडलं बॉलिवूड इंडस्ट्रीचं गुपित, सांगितलं 'ते' सत्य
11
शेवटी आईच ती! स्वत:ला झोकून दिले आणि लेकीला मगरीच्या जबड्यातून सोडवले, पण... 
12
४ महिन्यापूर्वी लग्न झालेल्या विवाहितेचा संशयास्पद मृत्यू; हुंड्यासाठी छळ करून केली हत्या? 
13
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
14
२२ सप्टेंबरपासून टीव्ही, फ्रीज, एसीसह इलेक्ट्रॉनिक वस्तू स्वस्त होणार; किती रुपयांची बचत होईल?
15
Cloudburst In Maharashtra: अहिल्यानगर जिल्ह्यात ढगफुटी, अनेक गावांना फटका; छोटा तलाव फुटला
16
कहानी में ट्विस्ट! नवऱ्याने बायकोचं बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं, आता 'त्याचं' भलतंच सत्य समोर आलं
17
सचिनला तुम्ही सीनिअर आहात?, मिश्कील प्रश्नावर दिलीप प्रभावळकरांना आलं हसू; मग म्हणाले...
18
दबावाखाली बाजार: ऑक्टोबर ‘ब्रेकआउट’ देईल की ‘ब्रेक’ घ्यावा लागेल?
19
झारखंडमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई; तीन माओवादी ठार, एकावर एक कोटी रुपयांचे बक्षीस
20
अहिल्यानगरमध्ये भूकंपाचे धक्के! बोटा, घारगाव परिसर हादरला; लोकांमध्ये भीतीचे वातावरण

महामार्गाची संरक्षक भिंत कोसळल्याने वाहतुकीला धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाच्या कामामध्ये तालुक्यातील कोंढेतड येथे रस्त्यालगत बांधण्यात आलेली संरक्षक भिंत या वर्षी पावसाळ्याचा प्रारंभ ...

राजापूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदीकरणाच्या कामामध्ये तालुक्यातील कोंढेतड येथे रस्त्यालगत बांधण्यात आलेली संरक्षक भिंत या वर्षी पावसाळ्याचा प्रारंभ होण्यापूर्वी सुमारे पाचशे फूट खोल दरीमध्ये कोसळली. त्यामुळे परिसरातून धावणाऱ्या वाहनांच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाला आहे. राजापूर तालुक्यामध्ये सुरू असलेल्या चौपदरीकरणाच्या कामाच्या दर्जाबाबत स्थानिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. मात्र, त्याकडे ठेकेदार कंपनीसह सार्वजनिक बांधकाम विभागाकडून कानाडोळा केला जात आहे.

शहरानजीकच्या कोंढेतड येथे वाहनांच्या सुरक्षिततेसाठी संरक्षक भिंत बांधली आहे. मात्र, पावसाळ्याचा शुभारंभ होण्यापूर्वीच ही भिंत लगतच्या दरीमध्ये कोसळली. कोसळलेल्या भिंतीमुळे त्या परिसरातून धावणाऱ्या वाहनांना धोका निर्माण झाला आहे. निकृष्ट दर्जाबाबत नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, संरक्षक भिंत कोसळलेल्या ठिकाणाची पाहणी भाजपचे तालुकाध्यक्ष अभिजित गुरव, कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी सहकाऱ्यांसमवेत केली. या वेळी संबंधित ठेकेदाराशी संपर्क साधून संरक्षक भिंतीच्या बांधकामाच्या निकृष्ट दर्जाबाबत तीव्र नापसंती व्यक्त करताना तातडीने नव्याने संरक्षक भिंत बांधण्याची सूचना केल्याचे लांजेकर यांनी सांगितले.

---------------------------

मुंबई-गाेवा महामार्गाच्या चाैपदरीकरणाच्या कामामध्ये राजापूर तालुक्यातील काेंढेतड येथील संरक्षक भिंत काेसळली आहे़