शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रानंतर ISI च्या आणखी एका एजंटला अटक, उत्तर प्रदेश एटीएसची कारवाई
2
IPL 2025 Playoffs Scenarios: आता एका जागेसाठी ३ संघ! MI अन् DC त कडवी टक्कर; LSG चं काही खरं नाही
3
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
4
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
5
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
6
IPL च्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं; शुबमन गिल-साई जोडीच्या जोरावर GT नं साधला विक्रमी डाव
7
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
8
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
9
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
10
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
11
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
12
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
13
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
14
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
15
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
16
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
17
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
18
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
19
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
20
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...

धरणांमध्ये मुबलक पाणी, विहिरी कोरड्याच

By admin | Updated: April 27, 2016 23:45 IST

पाण्यासाठी दाहीदिशा : पाणी ना शेतीला ना लोकांना...

रत्नागिरी : जिल्ह्यातील २५ लघुपाटबंधारे प्रकल्पांत ५४ टक्के, तर दोन मध्यम प्रकल्पात ६८ टक्के एवढा मुबलक पाणीसाठा आहे. सिंचनासाठी यातील ५० टक्के पाणीही वापरले जात नसल्याने हे पाणी पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्यांच्या मुखापर्यंत पोहोचविण्याची कोणतीही यंत्रणा जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळेच धरणांपासून दूर असलेल्या दुर्गम भागातील जनतेला पाणीटंचाईच्या झळा आता सोसवेना झाल्या आहेत. धरणांमध्ये मुबलक पाणी असून त्याचा काहीच उपयोग नाही. परिणामी जनतेला कोरड्या विहिरी व आटलेल्या नळांकडे पाहातच दिवस ढकलावे लागत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पाटबंधारे धरणांमध्ये असलेला पाणीसाठा ८ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणू शकेल इतका आहे. परंतु त्यातील ५० टक्के पाणीही सिंचनासाठी वापरले जात नाही, अशी स्थिती आहे. उरलेले पाणी ना शेतीला ना लोकांना पिण्यासाठी, अशी विचित्र स्थिती आहे. हे पाणी सिंचनासाठी वापरले जात नसेल तर ते किमान तहानलेल्यांसाठी तरी पुरवावे, अशी मागणी याआधीही करण्यात आली होती. परंतु त्याचा गांभीर्याने विचार झालेला नाही. राज्यातील अन्य विभागांपेक्षा कोकणातील पाणीसाठा अधिक दिसून येत असला तरी हा साठा धरणांमध्ये आहे. त्यातील पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाही, हे विदारक चित्र समोर आले आहे. धरणांमध्ये मुबलक पाणी असतानाही त्याकडे पाहण्यापलिकडे जनता काहीही करू शकत नाही, हतबल आहे. २२ एप्रिल २०१६पर्यंत जिल्ह्यातील नातूवाडी व अर्जुना मध्यम प्रकल्पांमध्ये ६८.१६१ टक्के पाणीसाठा होता. लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा मुबलक असला तरी त्यातील काही धरणांमध्येच पाण्याची टक्केवारी चांगली आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेले ९ लघु प्रकल्प आहेत. त्यामध्ये आंबतखोल, खोपड, मालघर, अडरे, तेलेवाडी, झापडे, बारेवाडी, चिंचवाडी व मुचकुंदी या प्रकल्पांचा समावेश आहे. सहा प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षाही कमी साठा आहे. त्यातील निवे प्रकल्पात ५.८८ टक्के, तर फणसवाडीत ७.८६ टक्के एवढा अल्प साठा आहे. जिल्ह्यात असलेल्या या धरणांच्या जवळच जॅकवेल उभारून जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायती त्यावर नळपाणी योजना राबवत आहेत. ज्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठी मुबलक आहे त्यांना पाण्याचा तुटवडा नाही. परंतु अनेक प्रकल्पांतील पाणी पातळी घसरल्याने तेथील नळयोजनाही धोक्यात आल्या आहेत. आधीच विहिरी कोरड्या झाल्या आहेत. त्यातच नळही आटत चालल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीसाठी वापर होत नसलेले व ज्या काही धरणांत मुबलक असलेले पाणी सर्वसामान्य जनतेला कधी मिळणार, असा सवाला निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)