शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

धरणांमध्ये मुबलक पाणी, विहिरी कोरड्याच

By admin | Updated: April 27, 2016 23:45 IST

पाण्यासाठी दाहीदिशा : पाणी ना शेतीला ना लोकांना...

रत्नागिरी : जिल्ह्यातील २५ लघुपाटबंधारे प्रकल्पांत ५४ टक्के, तर दोन मध्यम प्रकल्पात ६८ टक्के एवढा मुबलक पाणीसाठा आहे. सिंचनासाठी यातील ५० टक्के पाणीही वापरले जात नसल्याने हे पाणी पाण्यासाठी टाहो फोडणाऱ्यांच्या मुखापर्यंत पोहोचविण्याची कोणतीही यंत्रणा जिल्हा प्रशासनाकडे नाही. त्यामुळेच धरणांपासून दूर असलेल्या दुर्गम भागातील जनतेला पाणीटंचाईच्या झळा आता सोसवेना झाल्या आहेत. धरणांमध्ये मुबलक पाणी असून त्याचा काहीच उपयोग नाही. परिणामी जनतेला कोरड्या विहिरी व आटलेल्या नळांकडे पाहातच दिवस ढकलावे लागत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील पाटबंधारे धरणांमध्ये असलेला पाणीसाठा ८ हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आणू शकेल इतका आहे. परंतु त्यातील ५० टक्के पाणीही सिंचनासाठी वापरले जात नाही, अशी स्थिती आहे. उरलेले पाणी ना शेतीला ना लोकांना पिण्यासाठी, अशी विचित्र स्थिती आहे. हे पाणी सिंचनासाठी वापरले जात नसेल तर ते किमान तहानलेल्यांसाठी तरी पुरवावे, अशी मागणी याआधीही करण्यात आली होती. परंतु त्याचा गांभीर्याने विचार झालेला नाही. राज्यातील अन्य विभागांपेक्षा कोकणातील पाणीसाठा अधिक दिसून येत असला तरी हा साठा धरणांमध्ये आहे. त्यातील पाणी लोकांच्या घरापर्यंत पोहोचलेले नाही, हे विदारक चित्र समोर आले आहे. धरणांमध्ये मुबलक पाणी असतानाही त्याकडे पाहण्यापलिकडे जनता काहीही करू शकत नाही, हतबल आहे. २२ एप्रिल २०१६पर्यंत जिल्ह्यातील नातूवाडी व अर्जुना मध्यम प्रकल्पांमध्ये ६८.१६१ टक्के पाणीसाठा होता. लघु प्रकल्पांमध्ये पाणीसाठा मुबलक असला तरी त्यातील काही धरणांमध्येच पाण्याची टक्केवारी चांगली आहे. ५० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असलेले ९ लघु प्रकल्प आहेत. त्यामध्ये आंबतखोल, खोपड, मालघर, अडरे, तेलेवाडी, झापडे, बारेवाडी, चिंचवाडी व मुचकुंदी या प्रकल्पांचा समावेश आहे. सहा प्रकल्पांमध्ये २५ टक्क्यांपेक्षाही कमी साठा आहे. त्यातील निवे प्रकल्पात ५.८८ टक्के, तर फणसवाडीत ७.८६ टक्के एवढा अल्प साठा आहे. जिल्ह्यात असलेल्या या धरणांच्या जवळच जॅकवेल उभारून जिल्ह्यातील ९२ ग्रामपंचायती त्यावर नळपाणी योजना राबवत आहेत. ज्या प्रकल्पांमध्ये पाणीसाठी मुबलक आहे त्यांना पाण्याचा तुटवडा नाही. परंतु अनेक प्रकल्पांतील पाणी पातळी घसरल्याने तेथील नळयोजनाही धोक्यात आल्या आहेत. आधीच विहिरी कोरड्या झाल्या आहेत. त्यातच नळही आटत चालल्याने पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतीसाठी वापर होत नसलेले व ज्या काही धरणांत मुबलक असलेले पाणी सर्वसामान्य जनतेला कधी मिळणार, असा सवाला निर्माण झाला आहे. (प्रतिनिधी)