शहरं
Join us  
Trending Stories
1
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
2
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
3
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
4
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
5
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
6
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
7
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
8
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
9
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
10
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
11
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
12
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
13
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
14
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
15
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
16
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
17
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
18
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
19
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
20
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   

तौक्ते वादळामुळे एस.टी.चे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी.ची सेवा सुरू आहे. मात्र,भारमानाअभावी उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तौक्ते वादळामुळे ...

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी.ची सेवा सुरू आहे. मात्र,भारमानाअभावी उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तौक्ते वादळामुळे रविवारी सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे रविवारी व सोमवारी एस.टी.ची सेवा विस्कळीत होती. मंगळवारपासून पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

लाॅकडाऊनपूर्वी दैनंदिन ६०० गाड्यांमधून ४ हजार २०० फेऱ्यांद्वारे एक लाख ८० हजार किलोमीटर वाहतूक करण्यात येत असे. त्यामुळे ४८ ते ५० लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत होेते. मात्र, लाॅकडाऊन घोषित झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांच्या वाहतुकीसाठी एस.टी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. नागरिकांनीही अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक सुरू ठेवण्यासाठी परवागी असली तरी प्रत्यक्ष भारमान अत्यल्प असल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे रविवारी सकाळी काही प्रमाणात एस.टीच्या बसेस सुरू होत्या. मात्र, दुपारनंतर वादळाचा प्रभाव वाढल्यानंतर दापोली, राजापूर, गुहागर, रत्नागिरी आगारातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सोमवारी सकाळपर्यंत बससेवा बंद होती. रविवारी दिवसभरात २९१९ किलोमीटर वाहतूक करण्यात आली. जेमतेम ४२ फेऱ्या सोडण्यात आल्याने ५० हजार इतकेच उत्पन्न प्राप्त झाले असले तरी ४५ लाख ५० हजाराचा तोटा सोसावा लागला आहे. सोमवारी दुपारपर्यंत पाऊस, वारा सुरू होता. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले होते. प्रवासी प्रतिसाद नसल्यामुळे सोमवारीही एस.टी वाहतूक विस्कळीत होती. मात्र, मंगळवारपासून एस.टी सेवा पूर्ववत होईल, असे एस.टी .प्रशासनाकडून सांगण्यात आले. वादळामुळे रत्नागिरी आगारातील संरक्षक भिंत कोसळली असून देवरूख आगारातील पत्रे उडाले असल्याने नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामे सुरू होते.