शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
7
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
8
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
9
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
10
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
11
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
12
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
13
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
14
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
15
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
16
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
17
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
18
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
19
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
20
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा

तौक्ते वादळामुळे एस.टी.चे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:33 IST

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी.ची सेवा सुरू आहे. मात्र,भारमानाअभावी उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तौक्ते वादळामुळे ...

रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन सुरू आहे. अत्यावश्यक सेवेंतर्गत एस.टी.ची सेवा सुरू आहे. मात्र,भारमानाअभावी उत्पन्नावर परिणाम झाला आहे. तौक्ते वादळामुळे रविवारी सर्वत्र कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नागरिकांनीही घराबाहेर पडणे टाळले. त्यामुळे रविवारी व सोमवारी एस.टी.ची सेवा विस्कळीत होती. मंगळवारपासून पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

लाॅकडाऊनपूर्वी दैनंदिन ६०० गाड्यांमधून ४ हजार २०० फेऱ्यांद्वारे एक लाख ८० हजार किलोमीटर वाहतूक करण्यात येत असे. त्यामुळे ४८ ते ५० लाखांपर्यंत उत्पन्न प्राप्त होत होेते. मात्र, लाॅकडाऊन घोषित झाल्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी, अधिकारी यांच्या वाहतुकीसाठी एस.टी वाहतूक सुरू ठेवण्यात आली आहे. नागरिकांनीही अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. ५० टक्के प्रवासी क्षमतेने वाहतूक सुरू ठेवण्यासाठी परवागी असली तरी प्रत्यक्ष भारमान अत्यल्प असल्याने उत्पन्नावर परिणाम झाला आहे.

तौक्ते चक्रीवादळामुळे रविवारी सकाळी काही प्रमाणात एस.टीच्या बसेस सुरू होत्या. मात्र, दुपारनंतर वादळाचा प्रभाव वाढल्यानंतर दापोली, राजापूर, गुहागर, रत्नागिरी आगारातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. सोमवारी सकाळपर्यंत बससेवा बंद होती. रविवारी दिवसभरात २९१९ किलोमीटर वाहतूक करण्यात आली. जेमतेम ४२ फेऱ्या सोडण्यात आल्याने ५० हजार इतकेच उत्पन्न प्राप्त झाले असले तरी ४५ लाख ५० हजाराचा तोटा सोसावा लागला आहे. सोमवारी दुपारपर्यंत पाऊस, वारा सुरू होता. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले होते. प्रवासी प्रतिसाद नसल्यामुळे सोमवारीही एस.टी वाहतूक विस्कळीत होती. मात्र, मंगळवारपासून एस.टी सेवा पूर्ववत होईल, असे एस.टी .प्रशासनाकडून सांगण्यात आले. वादळामुळे रत्नागिरी आगारातील संरक्षक भिंत कोसळली असून देवरूख आगारातील पत्रे उडाले असल्याने नुकसान झाले आहे. याबाबत पंचनामे सुरू होते.