शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

तौउते वादळामुळे राजापूर तालुक्यात सुमारे २ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST

- आंबा व काजू पिकांचेही नुकसान, अद्यापही पंचनामे सुरू - अनेक भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित राजापूर : तौउते चक्रीवादळातील ...

- आंबा व काजू पिकांचेही नुकसान, अद्यापही पंचनामे सुरू

- अनेक भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित

राजापूर : तौउते चक्रीवादळातील नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे़ सोमवारी सायंकाळपर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये तालुक्यात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या नुकसानात वाढ होण्याचीही शक्यता असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. या चक्रीवादळात ४१० घरे, ३७ गोठे व २० सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले असून, सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अद्यापही पंचनाने सुरू असून नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तौक्ते चक्रीवादळाते राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावांबरोबरच ग्रामीण भागातही तडाखा दिला आहे. तालुक्यात समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या राजवाडी, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, सागवे, अणसुरे, जैतापूर, माडबन, कशेळी, वाडापेठ, कुवेशी, दळे, या १३ ग्रामपंचायतीमधील गावे व वाड्यांमध्ये या वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. या परिसरात ५ घरांचे पूर्णत: तर ४१५ घरांचे अंशत: नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. तर ३७ गोठ्यांची पडझड झाली असून शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा २० सार्वाजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे पंचनामे सध्या करण्यात आले आहेत.

काही भागांत आंबा व काजू पिकांचे नुकसान झाले असून त्यांचेही पंचनामे करण्याचे काम सुरू आहेत. नेरकेवाडी येथील तानाजी शंकर विचारे यांच्या काजू बागेला या वादळाचा तडाखा बसला असून, काजूच्या रोपांची पुरती धुळधाण उडाली आहे. यात विचारे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुका कृषी विभागातर्फे मंगळवारी शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला आहे.

या वादळाचा तडाखा महावितरणला बसला असून अनेक ठिकाणी वीजखांब पडल्याने व वीजवाहिन्या तुटल्याने अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही़ नाटे, साखरीनाटे, कारिवणे, सोलगाव, गोवळ, शिवणेखुर्द, देवाचे गोठणे या परिसरात अद्यापही वीजपुरवठा खंडित आहे. तर पाचल, ओणी, सौंदळ परिसरासह अन्य भागातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू हाेते़