शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

तौउते वादळामुळे राजापूर तालुक्यात सुमारे २ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST

- आंबा व काजू पिकांचेही नुकसान, अद्यापही पंचनामे सुरू - अनेक भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित राजापूर : तौउते चक्रीवादळातील ...

- आंबा व काजू पिकांचेही नुकसान, अद्यापही पंचनामे सुरू

- अनेक भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित

राजापूर : तौउते चक्रीवादळातील नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे़ सोमवारी सायंकाळपर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये तालुक्यात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या नुकसानात वाढ होण्याचीही शक्यता असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. या चक्रीवादळात ४१० घरे, ३७ गोठे व २० सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले असून, सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अद्यापही पंचनाने सुरू असून नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तौक्ते चक्रीवादळाते राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावांबरोबरच ग्रामीण भागातही तडाखा दिला आहे. तालुक्यात समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या राजवाडी, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, सागवे, अणसुरे, जैतापूर, माडबन, कशेळी, वाडापेठ, कुवेशी, दळे, या १३ ग्रामपंचायतीमधील गावे व वाड्यांमध्ये या वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. या परिसरात ५ घरांचे पूर्णत: तर ४१५ घरांचे अंशत: नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. तर ३७ गोठ्यांची पडझड झाली असून शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा २० सार्वाजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे पंचनामे सध्या करण्यात आले आहेत.

काही भागांत आंबा व काजू पिकांचे नुकसान झाले असून त्यांचेही पंचनामे करण्याचे काम सुरू आहेत. नेरकेवाडी येथील तानाजी शंकर विचारे यांच्या काजू बागेला या वादळाचा तडाखा बसला असून, काजूच्या रोपांची पुरती धुळधाण उडाली आहे. यात विचारे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुका कृषी विभागातर्फे मंगळवारी शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला आहे.

या वादळाचा तडाखा महावितरणला बसला असून अनेक ठिकाणी वीजखांब पडल्याने व वीजवाहिन्या तुटल्याने अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही़ नाटे, साखरीनाटे, कारिवणे, सोलगाव, गोवळ, शिवणेखुर्द, देवाचे गोठणे या परिसरात अद्यापही वीजपुरवठा खंडित आहे. तर पाचल, ओणी, सौंदळ परिसरासह अन्य भागातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू हाेते़