शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
4
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
5
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
6
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
7
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
8
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
9
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
10
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
11
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
12
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
13
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
14
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
15
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
16
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
17
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
18
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
19
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
20
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
Daily Top 2Weekly Top 5

तौउते वादळामुळे राजापूर तालुक्यात सुमारे २ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST

- आंबा व काजू पिकांचेही नुकसान, अद्यापही पंचनामे सुरू - अनेक भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित राजापूर : तौउते चक्रीवादळातील ...

- आंबा व काजू पिकांचेही नुकसान, अद्यापही पंचनामे सुरू

- अनेक भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित

राजापूर : तौउते चक्रीवादळातील नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे़ सोमवारी सायंकाळपर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये तालुक्यात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या नुकसानात वाढ होण्याचीही शक्यता असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. या चक्रीवादळात ४१० घरे, ३७ गोठे व २० सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले असून, सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अद्यापही पंचनाने सुरू असून नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तौक्ते चक्रीवादळाते राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावांबरोबरच ग्रामीण भागातही तडाखा दिला आहे. तालुक्यात समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या राजवाडी, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, सागवे, अणसुरे, जैतापूर, माडबन, कशेळी, वाडापेठ, कुवेशी, दळे, या १३ ग्रामपंचायतीमधील गावे व वाड्यांमध्ये या वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. या परिसरात ५ घरांचे पूर्णत: तर ४१५ घरांचे अंशत: नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. तर ३७ गोठ्यांची पडझड झाली असून शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा २० सार्वाजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे पंचनामे सध्या करण्यात आले आहेत.

काही भागांत आंबा व काजू पिकांचे नुकसान झाले असून त्यांचेही पंचनामे करण्याचे काम सुरू आहेत. नेरकेवाडी येथील तानाजी शंकर विचारे यांच्या काजू बागेला या वादळाचा तडाखा बसला असून, काजूच्या रोपांची पुरती धुळधाण उडाली आहे. यात विचारे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुका कृषी विभागातर्फे मंगळवारी शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला आहे.

या वादळाचा तडाखा महावितरणला बसला असून अनेक ठिकाणी वीजखांब पडल्याने व वीजवाहिन्या तुटल्याने अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही़ नाटे, साखरीनाटे, कारिवणे, सोलगाव, गोवळ, शिवणेखुर्द, देवाचे गोठणे या परिसरात अद्यापही वीजपुरवठा खंडित आहे. तर पाचल, ओणी, सौंदळ परिसरासह अन्य भागातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू हाेते़