शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

तौउते वादळामुळे राजापूर तालुक्यात सुमारे २ कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:33 IST

- आंबा व काजू पिकांचेही नुकसान, अद्यापही पंचनामे सुरू - अनेक भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित राजापूर : तौउते चक्रीवादळातील ...

- आंबा व काजू पिकांचेही नुकसान, अद्यापही पंचनामे सुरू

- अनेक भागांत अद्यापही वीजपुरवठा खंडित

राजापूर : तौउते चक्रीवादळातील नुकसानाचे पंचनामे करण्याचे काम प्रशासनाने हाती घेतले आहे़ सोमवारी सायंकाळपर्यंत करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये तालुक्यात सुमारे दोन कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, या नुकसानात वाढ होण्याचीही शक्यता असल्याची माहिती महसूल प्रशासनाने दिली. या चक्रीवादळात ४१० घरे, ३७ गोठे व २० सार्वजनिक मालमत्तांचे नुकसान झाले असून, सुमारे १ कोटी ९३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, अद्यापही पंचनाने सुरू असून नुकसानाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

तौक्ते चक्रीवादळाते राजापूर तालुक्यातील समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या गावांबरोबरच ग्रामीण भागातही तडाखा दिला आहे. तालुक्यात समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या राजवाडी, नाटे, साखरीनाटे, आंबोळगड, सागवे, अणसुरे, जैतापूर, माडबन, कशेळी, वाडापेठ, कुवेशी, दळे, या १३ ग्रामपंचायतीमधील गावे व वाड्यांमध्ये या वादळाचा जोरदार तडाखा बसला आहे. या परिसरात ५ घरांचे पूर्णत: तर ४१५ घरांचे अंशत: नुकसान झाल्याची नोंद प्रशासनाकडे आहे. तर ३७ गोठ्यांची पडझड झाली असून शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र अशा २० सार्वाजनिक मालमत्तांचे नुकसान झाल्याचे पंचनामे सध्या करण्यात आले आहेत.

काही भागांत आंबा व काजू पिकांचे नुकसान झाले असून त्यांचेही पंचनामे करण्याचे काम सुरू आहेत. नेरकेवाडी येथील तानाजी शंकर विचारे यांच्या काजू बागेला या वादळाचा तडाखा बसला असून, काजूच्या रोपांची पुरती धुळधाण उडाली आहे. यात विचारे यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुका कृषी विभागातर्फे मंगळवारी शिंदे यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पंचनामा केला आहे.

या वादळाचा तडाखा महावितरणला बसला असून अनेक ठिकाणी वीजखांब पडल्याने व वीजवाहिन्या तुटल्याने अद्यापही वीजपुरवठा सुरळीत झालेला नाही़ नाटे, साखरीनाटे, कारिवणे, सोलगाव, गोवळ, शिवणेखुर्द, देवाचे गोठणे या परिसरात अद्यापही वीजपुरवठा खंडित आहे. तर पाचल, ओणी, सौंदळ परिसरासह अन्य भागातही वीजपुरवठा वारंवार खंडित होत आहे. मात्र, महावितरणकडून वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू हाेते़