शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

धरणक्षेत्र पूर्ण सुरक्षित : डॅम सेफ ऑर्गनायझेशनचा निष्कर्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

रत्नागिरी : पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्पाची गळती थांबविण्यासाठी (ता. मंडणगड) रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. धरण ...

रत्नागिरी : पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्पाची गळती थांबविण्यासाठी (ता. मंडणगड) रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून उपाययोजना हाती घेण्यात आल्या. धरण सुरक्षिततेच्या बाबतीत ‘डॅम सेफ ऑर्गनायझेशन’चे कार्यकारी अभियंता यांनी धरणास भेट दिली असून धरण सुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे.

पणदेरी लघुपाटबंधारे प्रकल्प (ता. मंडणगड) योजनेतंर्गत पणदेरी धरण १९९५-९६ मध्ये पूर्ण करण्यात आले आहे. ५ जुलैला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास धरणातून गळती होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर रत्नागिरी पाटबंधारे विभागाकडून गळती थांबविण्यासाठी तत्काळ उपाययोजना हाती घेण्यात आल्या. त्यामध्ये मातीचा भराव करून गळती थांबविण्याचे काम सुरू आहे. धरणफुटीचा धोका टाळण्यासाठी सांडवा मोकळा करून धरणातील पाण्याची पातळी कमी धरणाच्या खालच्या बाजूस पणदेरी मोहल्ला, सुतारवाडी, पाटीलवाडी, कुंभारवाडी, रोहिदासवाडी व बौद्धवाडी येथे लोकवस्ती असून या वाडी व गावातील लोकांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने रोहिदासवाडी व बौद्धवाडी येथील सुमारे २०० ग्रामस्थांना त्यांच्या मौल्यवान वस्तूंसह सुरक्षित ठिकाणी स्थलांतरीत करण्यात आले आहे. त्यांच्या भोजनाची व निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे. सुरक्षिततेची उपाययोजना म्हणून धरणाच्या ठिकाणी स्वयंसेवकांच्या मदतीने बचाव पथक कार्यरत आहे. त्याशिवाय ॲम्ब्युलन्ससह आरोग्य पथक, पुरेसा पोलीस बंदोबस्त व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे पथक घटनास्थळी तैनात करण्यात आले आहे. सद्य:स्थितीत जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीने सर्व उपाययोजना करण्यात येत असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

धरण सुरक्षिततेच्या बाबतीत ‘डॅम सेफ ऑर्गनायझेशन’चे‘डॅम सेफ ऑर्गनायझेशन’चे कार्यकारी अभियंता यांनी धरणास भेट दिली असून धरण सुरक्षित असल्याचा निष्कर्ष नोंदविला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी तथापि घाबरुन जाण्याचे कारण नाही तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये. कोणत्याही प्रकारचा धोका निर्माण होत असल्याची शक्यता निदर्शनास आल्यास मंडणगडचे तहसीलदार, गटविकास अधिकारी आणि पोलीस निरीक्षक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी केले आहे.