शहरं
Join us  
Trending Stories
1
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
2
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
3
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
4
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
5
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
6
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
7
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
8
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
9
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
10
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
11
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
12
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
13
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
14
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
15
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
16
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट
17
Aadhaar: आधार कार्डावरील एका चुकीमुळे मोफत राशन आणि पीएफचे पैसे मिळणार नाहीत!
18
भिवंडीत डाईंग कंपनीस भीषण आग; कल्याण, उल्हासनगर, ठाणे अग्निशामक दलाची घ्यावी लागली मदत
19
इंस्टाग्रामवर फॉलोअर्स वाढवायचेत? 'या' टिप्स येतील कामी; धडाधड वाढतील व्ह्यूज, प्रोफाईलही दिसेल वेगळे 
20
Parth Pawar Land Scam Pune: नवी माहिती! पार्थ पवारांनी सहीचे अधिकार दिले होते दिग्विजय पाटलांना, ठराव समोर आल्यानं वेगळं वळण

बाजारपेठेत लोकांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:41 IST

रत्नागिरी : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दुकानांवर गर्दी झालेली दिसत आहे. बाजारपेठेत भरलेली असून रहदारीही वाढलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत ...

रत्नागिरी : लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर दुकानांवर गर्दी झालेली दिसत आहे. बाजारपेठेत भरलेली असून रहदारीही वाढलेली आहे. त्यामुळे बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

मच्छिमारांसमोर आर्थिक संकट

रत्नागिरी : गेल्या मासेमारी मोसमामध्ये अनेकदा वादळवारे झाल्याने मच्छिमारांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांवर डोक्यावर हात मारण्याची वेळ आली आहे. ते आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांच्यावर कर्जाचा बोजा असून त्याचे हप्तेही थकले आहेत. त्यामुळे त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे.

लोकांच्या तयारीवर परिणाम

रत्नागिरी : पावसाळ्यापूर्वीची लोक अगोदरच तयारी करतात. त्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. मात्र, कोरोना प्रादुर्भाव असल्याने त्याचा परिणाम या तयारीवर झाल्याचे दिसून येत. पावसाळ्यापूर्वी तयारी करताना मसाले, सुकलेले मासे तसेच अन्य पदार्थ बनवून ठेवले जातात. मात्र, कोरोनामुळे अनेक लोक ही तयारी करू शकलेले नाहीत.

राजीवड्यात मोहल्ला क्लिनिकचा रुग्णांना फायदा

रत्नागिरी : शहरातील गजबजलेली लोकवस्ती असलेल्या राजीवडा गावामध्ये कोअर कमिटीने माेहल्ला क्लिनिक सुरू केले आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेतही कोअर कमिटीने मोहल्ला क्लिनिकची स्थापना करून अनेकांचा जीव वाचविला होता. त्याप्रमाणे दुसऱ्या लाटेतही पोलिसांच्या सहकार्याने हे क्लिनिक सुरू करण्यात आले असून त्याचा रुग्णांचा फायदा होत आहे.

रस्ता खोदाईमुळे अपघात

रत्नागिरी : पावसाळा तोंडावर आला तरी शहर परिसरात नगरपरिषदेकडून खोदाईची कामे कमी झालेली नाहीत. ती कामे अजूनही सुरूच आहेत. शहरातील सन्मित्रनगर ते उद्यमनगरपर्यंतच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अनेक अपघात होऊन लोक जखमी झाल्याच्या घटना सतत घडत आहेत. त्यामुळे तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.

बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ

रत्नागिरी : कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेल्या वर्षभरात अनेक लोकांना रोजगार गमवावा लागला. रस्त्याच्या कडेला असणाऱ्यांचे व्यवसायही बंद पडले आहेत. त्यामुळे त्यांचा रोजगारच गेल्याने त्यांना दोनवेळचे जेवणही मिळणे दुरापास्त झाले आहे. त्याकडे शासनाने लक्ष देण्याची मागणी जोर धरत आहे