शहरं
Join us  
Trending Stories
1
Pooja Khedkar Mother: नवी मुंबईतून ट्रक चालकाचं अपहरण, पुण्यातील घरात ठेवले डांबून; पूजा खेडकरच्या आईचा प्रताप
2
यह नया भारत है..., टीम इंडियाने पाकिस्तानला नमवल्यानंतर भाजपाने विरोधकांना डिवचले  
3
रशिया युक्रेन युद्ध संपूर्ण युरोपात पसरणार, NATO देशांचं सैन्य सज्ज; झेलेन्स्कींचा जगाला मोठा इशारा
4
हृदयद्रावक! BMW ने घेतला भारत सरकारच्या मोठ्या अधिकाऱ्याचा जीव; नेमकं काय घडलं?
5
UPI Rule Change: आजपासून मोठा बदल, मोठा दिलासा; आता UPI मधून एका दिवसात करू शकता 'इतक्या' लाखांचं ट्रान्झॅक्शन
6
Navratri 2025: आई तुळजाभवानीची घोर मंचकी निद्रा प्रारंभ; आता दर्शन थेट घटस्थापनेला!
7
पुढील ३ तासांसाठी मुंबईला 'रेड अलर्ट'; विजांच्या कडकडाट अन् जोरदार वाऱ्यासह पावसाचा इशारा
8
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
9
Stock Markets Today: आठवड्याची सुस्त सुरुवात, ६० अंकांनी वधारला सेन्सेक्स; रियल्टी, मेटल शेअर्समध्ये खरेदी
10
पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात केलेली ती चूक भोवणार? टीम इंडियावर कारवाई होणार?
11
PPF Investment: पती पत्नीसाठी डबल नफ्याची ट्रिक! टॅक्सही शून्य, व्याजही जास्त; कसा घ्याल फायदा?
12
युद्ध स्फोटक वळणावर, रशियन ड्रोन्स रोमानियात; युक्रेनचा रशियातील सर्वात मोठ्या तेल प्रकल्पावर भीषण हल्ला
13
राहुल गांधींवर आरोप करण्याऐवजी त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी करा
14
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
15
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
16
ट्रम्प अन् निर्बंधांमुळे रशियन तेल मिळवण्यात भारताला अडचणी; जहाज कंपन्यांनी दिला नकार
17
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
18
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
19
‘एआय सायकोसिस’ ही स्थिती नेमकी काय आहे? Ai विचारांवर किंवा भावनांवर नियंत्रण ठेवत
20
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक

रत्नागिरीसह सात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीक विमा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

चिपळूण : भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, नांदेड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यात ...

चिपळूण : भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, नांदेड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१ साठी अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) हाती घेण्यात आली आहे. इफ्को - टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडतर्फे ही योजना राबवली जात आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांसारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा या योजनेचा उद्देश आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उत्पादन घेणारे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभाग घेऊ शकतात. योजनेत उडीद, कापूस, नाचणी, मूग, भात, तूर, ज्वारी, सोयाबीन पिकांचा समावेश आहे.

खरीप हंगामातील अधिसूचित पिकांसाठी जोखमीच्या बाबींमध्ये हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान याबाबत विमा संरक्षण मिळणार आहे. जनरल इन्शुरन्स कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८००-१०३-५४९० वर कळविणे आवश्यक आहे. अथवा पीक विमा ॲपवरही काढू शकतात. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये पीक बदलाबाबतची सूचना बँकेला विमा नोंदणीच्या अंतिम दिनांकापूर्वी दोन कार्यालयीन दिवस आधी देणे बंधनकारक राहणार आहे.

-----------------------------------

तीन जिल्ह्यात भात, नाचणीसाठीच याेजना

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यात भात आणि नाचणी या दोन पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे. भात पिकासाठी प्रति हेक्टरी ४५ हजार ५०० रुपयांचे विमा संरक्षण असून, प्रति हेक्टरी ९१० रुपयांचा विमा हप्ता आहे. तर नाचणी पिकासाठी प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचे विमा संरक्षण असून, प्रति हेक्टरी ४०० रुपयांचा विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा.