शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
2
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
3
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
4
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
5
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
6
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
7
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
8
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
9
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
10
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
11
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
12
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
13
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
14
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
15
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
16
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
17
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
18
"बिहारमध्ये बांगलादेशी-रोहिंग्या सापडले, पण पहलगामचे दहशतवादी..."; ओवैसींची सरकारवर टीका
19
भारतीय ग्रँडमास्टर्स समोर 'बुद्धी' चालेना! आर. प्रज्ञानंद याने वर्ल्ड नंबर वन कार्लसनला दिला शह
20
२ राजयोग करणार ९ राशींची भरघोस भरभराट, अडकलेली कामे होतील; हाती पैसा राहील, शुभ वरदान काळ!

रत्नागिरीसह सात जिल्ह्यात खरीप हंगामासाठी पीक विमा योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

चिपळूण : भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, नांदेड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यात ...

चिपळूण : भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनामार्फत राज्यातील यवतमाळ, गडचिरोली, अमरावती, नांदेड, ठाणे, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या सात जिल्ह्यात खरीप हंगाम २०२१ साठी अधिसूचित पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना (पीएमएफबीवाय) हाती घेण्यात आली आहे. इफ्को - टोकियो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेडतर्फे ही योजना राबवली जात आहे.

नैसर्गिक आपत्ती, कीड आणि रोगांसारख्या अकल्पित प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण देणे, पिकांच्या नुकसानाच्या अत्यंत कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य अबाधित राखणे हा या योजनेचा उद्देश आहे. अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचे उत्पादन घेणारे कर्जदार व बिगर कर्जदार शेतकरी, कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेत सहभाग घेऊ शकतात. योजनेत उडीद, कापूस, नाचणी, मूग, भात, तूर, ज्वारी, सोयाबीन पिकांचा समावेश आहे.

खरीप हंगामातील अधिसूचित पिकांसाठी जोखमीच्या बाबींमध्ये हवामान घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, पिकांच्या हंगामामध्ये हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीमध्ये नैसर्गिक आग, वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड, कीड व रोग इत्यादी बाबीमुळे उत्पन्नात येणारी घट, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे होणारे नुकसान, पिकांचे होणारे काढणी पश्चात नुकसान याबाबत विमा संरक्षण मिळणार आहे. जनरल इन्शुरन्स कंपनीच्या टोल फ्री क्रमांक १८००-१०३-५४९० वर कळविणे आवश्यक आहे. अथवा पीक विमा ॲपवरही काढू शकतात. कर्जदार शेतकऱ्यांनी विमा संरक्षित क्षेत्रामध्ये पीक बदलाबाबतची सूचना बँकेला विमा नोंदणीच्या अंतिम दिनांकापूर्वी दोन कार्यालयीन दिवस आधी देणे बंधनकारक राहणार आहे.

-----------------------------------

तीन जिल्ह्यात भात, नाचणीसाठीच याेजना

रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि ठाणे जिल्ह्यात भात आणि नाचणी या दोन पिकांसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजना राबवली जात आहे. भात पिकासाठी प्रति हेक्टरी ४५ हजार ५०० रुपयांचे विमा संरक्षण असून, प्रति हेक्टरी ९१० रुपयांचा विमा हप्ता आहे. तर नाचणी पिकासाठी प्रति हेक्टरी २० हजार रुपयांचे विमा संरक्षण असून, प्रति हेक्टरी ४०० रुपयांचा विमा हप्ता शेतकऱ्यांना भरावा लागणार आहे. अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी तालुका कृषी कार्यालयात संपर्क साधावा.