शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

रत्नागिरी जिल्ह्यावर अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

रत्नागिरी : बुधवारी दिवसभर कोसळलेल्या अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यावर अस्मानी संकट ओढवले असून, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर ही शहरे पुराच्या ...

रत्नागिरी : बुधवारी दिवसभर कोसळलेल्या अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यावर अस्मानी संकट ओढवले असून, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर ही शहरे पुराच्या विळख्यात अडकली आहेत. चिपळुणात कोळकेवाडी धरणाचा विसर्ग पहाटे केल्याने चिपळुणातील पूरस्थिती गंभीर झाली असून, बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी एनडीआरएफची टीम तातडीने दाखल झाली. स्थानिकांच्या मदतीने नागरिकांसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले.

बुधवारी सकाळपासून पावसाची जिल्ह्यात रिपरिप सुरू होती. मात्र, रात्रीपासून ढगफुटीसदृश पाऊस पडू लागल्याने चिपळूण येथील कोळकेवाडी धरणातील पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे पहाटे ३ वाजता या धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे ढगफुटीसदृश पाऊस आणि या विसर्गामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आला असून, त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे चिपळूण आणि खेड या शहर आणि परिसर जलमय झाले आहेत. एनडीआरएफची टीम आणि स्थानिकांच्या मदतीने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले.

संगमेश्वर तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने फुणगूस आणि माखजन येथील शास्त्री आणि गड नदीने नेहमीच्या पाण्याची पातळी ओलांडल्याने खाडीपट्ट्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. फुणगूस बाजारपेठेत सुमारे तीन ते चार फूट पाणी घुसले होते. दत्तमंदिर नदीलाही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येऊन तेथील घराजवळ व भातशेतीमध्येही पाणी घुसले. यामुळे खाडी भागातील संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. माखजन बाजारपेठेतही सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. भातशेती क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. सततच्या पावसामुळे गडगडी धरण येथील कालव्याची भिंत वाहून गेली आहे.

राजापूर तालुक्यातही सलग बाराव्या दिवशीही शहरात पूरसदृश स्थिती आहे. राजापूर तालुक्यात गेले दोन आठवडे सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहराला पुराचा वेढा कायम आहे. या दोन आठवड्यांत जवळपास चारवेळा पुराचे पाणी जवाहर चौकाच्यावर आले आहे. बारा दिवस चिंचबांधवरचा पेठ रस्ता तसेच जवाहर चौकातील नदी किनाऱ्यालगतच्या टपऱ्या पुराच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

रत्नागिरी तालुक्यात काजळी नदीच्या परिसरात असणाऱ्या गावांना देखील पुराचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. साखरपा भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने काजळी नदीचे पाणी वाढत चालले आहे. याचा फटका चांदेराईए तोणदे गावालादेखील बसला असून अनेक घरातून पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे आता गावाचा रस्ते मार्गाने होणारा संपर्क तुटला आहे. बुधवारी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने पंधरामाड-कांबळेवाडी समुद्र किनाऱ्याची पुरती वाताहत केली आहे. या भागातील जवळपास १५ फुटांपेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. टेंभ्ये बाैद्ववाडी येथील आशा प्रदीप पवार (वय ५५ वर्षे) ही महिला गुरुवारी सकाळी लसीकरणासाठी निघाली असता अडकरवाडी येथील पऱ्यात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला.

गुरुवारी सकाळपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली. मात्र, अधूनमधून रिपरिप सुरूच होती.