शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
3
"रुपाली चाकणकरांनी एका बाईला आमदाराविरोधात व्हिडीओ तयार लावलेला, ती बाई..."; रुपाली ठोंबरेंचा स्फोटक आरोप
4
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
7
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
8
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
9
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
10
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
11
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
12
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
13
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
14
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
15
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
16
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
17
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
18
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
19
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
20
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...

रत्नागिरी जिल्ह्यावर अस्मानी संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:20 IST

रत्नागिरी : बुधवारी दिवसभर कोसळलेल्या अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यावर अस्मानी संकट ओढवले असून, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर ही शहरे पुराच्या ...

रत्नागिरी : बुधवारी दिवसभर कोसळलेल्या अतिमुसळधार पावसामुळे जिल्ह्यावर अस्मानी संकट ओढवले असून, खेड, चिपळूण, संगमेश्वर, राजापूर ही शहरे पुराच्या विळख्यात अडकली आहेत. चिपळुणात कोळकेवाडी धरणाचा विसर्ग पहाटे केल्याने चिपळुणातील पूरस्थिती गंभीर झाली असून, बाधितांना सुरक्षितस्थळी हलविण्यासाठी एनडीआरएफची टीम तातडीने दाखल झाली. स्थानिकांच्या मदतीने नागरिकांसाठी युद्धपातळीवर मदतकार्य सुरू करण्यात आले.

बुधवारी सकाळपासून पावसाची जिल्ह्यात रिपरिप सुरू होती. मात्र, रात्रीपासून ढगफुटीसदृश पाऊस पडू लागल्याने चिपळूण येथील कोळकेवाडी धरणातील पाण्याची पातळी अचानक वाढली. त्यामुळे पहाटे ३ वाजता या धरणाचे तीन दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे ढगफुटीसदृश पाऊस आणि या विसर्गामुळे जिल्ह्यातील सर्व नद्यांना पूर आला असून, त्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे चिपळूण आणि खेड या शहर आणि परिसर जलमय झाले आहेत. एनडीआरएफची टीम आणि स्थानिकांच्या मदतीने युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू करण्यात आले.

संगमेश्वर तालुक्यात विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा जोर धरल्याने फुणगूस आणि माखजन येथील शास्त्री आणि गड नदीने नेहमीच्या पाण्याची पातळी ओलांडल्याने खाडीपट्ट्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. फुणगूस बाजारपेठेत सुमारे तीन ते चार फूट पाणी घुसले होते. दत्तमंदिर नदीलाही मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येऊन तेथील घराजवळ व भातशेतीमध्येही पाणी घुसले. यामुळे खाडी भागातील संपूर्ण जनजीवनच विस्कळीत झाले आहे. माखजन बाजारपेठेतही सखल भागात पुराचे पाणी घुसले आहे. संगमेश्वर तालुक्यातील नदीकाठच्या गावांमध्ये पुन्हा पूरस्थिती निर्माण झाली आहे. भातशेती क्षेत्र पाण्याखाली गेले आहे. सततच्या पावसामुळे गडगडी धरण येथील कालव्याची भिंत वाहून गेली आहे.

राजापूर तालुक्यातही सलग बाराव्या दिवशीही शहरात पूरसदृश स्थिती आहे. राजापूर तालुक्यात गेले दोन आठवडे सातत्याने मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे शहराला पुराचा वेढा कायम आहे. या दोन आठवड्यांत जवळपास चारवेळा पुराचे पाणी जवाहर चौकाच्यावर आले आहे. बारा दिवस चिंचबांधवरचा पेठ रस्ता तसेच जवाहर चौकातील नदी किनाऱ्यालगतच्या टपऱ्या पुराच्या पाण्याखाली आहेत. त्यामुळे या व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे.

रत्नागिरी तालुक्यात काजळी नदीच्या परिसरात असणाऱ्या गावांना देखील पुराचा फटका बसायला सुरुवात झाली आहे. साखरपा भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने काजळी नदीचे पाणी वाढत चालले आहे. याचा फटका चांदेराईए तोणदे गावालादेखील बसला असून अनेक घरातून पुराचे पाणी शिरले आहे. यामुळे आता गावाचा रस्ते मार्गाने होणारा संपर्क तुटला आहे. बुधवारी समुद्राला आलेल्या मोठ्या भरतीने पंधरामाड-कांबळेवाडी समुद्र किनाऱ्याची पुरती वाताहत केली आहे. या भागातील जवळपास १५ फुटांपेक्षा जास्त किनारा समुद्राने गिळंकृत केला आहे. टेंभ्ये बाैद्ववाडी येथील आशा प्रदीप पवार (वय ५५ वर्षे) ही महिला गुरुवारी सकाळी लसीकरणासाठी निघाली असता अडकरवाडी येथील पऱ्यात पाय घसरून पडल्याने बुडून मृत्यू झाला.

गुरुवारी सकाळपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली. मात्र, अधूनमधून रिपरिप सुरूच होती.