शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohit Arya : थरारक! ८ कमांडोंची बाथरूममधून एन्ट्री, ३५ मिनिटांत...; १७ मुलांच्या रेस्क्यूची इनसाईड स्टोरी
2
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - ३१ ऑक्टोबर २०२५; विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील, मित्रांकडून भेटवस्तू मिळतील
3
आमच्या जाहीरनाम्यातच घोषणा, ३० जून २०२६ पूर्वी शेतकऱ्यांची केली जाणार कर्जमाफी: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
मुंबईत ऑडिशनच्या नावे १७ मुलांसह २० जणांना ठेवले ओलिस; अपहरणकर्त्याचे एन्काऊंटर करत सर्वांची नाट्यमयरीत्या सुटका
5
दोन नोटिशींना प्रतिसाद नाही; उद्धव ठाकरे यांना आयोगाची कारणे दाखवा नोटीस
6
'गोंधळ कायम ठेवून निवडणुका म्हणजे मॅच फिक्सिंग'; राज ठाकरे यांचा आरोप, ईव्हीएम सेटिंगचे प्रात्यक्षिक
7
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
8
येस बँक घोटाळा : कपूर, अंबानी बैठका घेत; अधिकारी कार्यवाही करीत, सीबीआयकडून १३ जणांविरुद्ध गंभीर आरोप
9
चाकणकरांचे वक्तव्य हे आमच्या पक्षाचे म्हणणे नाही; अजित पवार यांची नाराजी
10
ऑडिशनमध्ये निवड झालेली मुले ग्रामीण भागातील; खिडकीतून आत जाऊन फिल्मी स्टाइलने सुटका
11
तिसरीपासून 'एआय' शिकणार मुलं; पुढील वर्षांपासून अंमलबजावणी, एक कोटी शिक्षकांना प्रशिक्षण
12
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर एकाचा हक्क नाही! मांजरेकरांच्या चित्रपटाला हायकोर्टाचा हिरवा कंदील
13
अमेरिकेत नोकरीस जाणे झाले आता अधिक कठीण; कर्मचाऱ्यांच्या स्वयंचलित मुदतवाढीची वर्क परमिट योजना बंद
14
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
15
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
16
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
17
क्रिकेटच्या देवाकडून जेमी-हरमनप्रीतला शाब्बासकी! ऐतिहासिक विजय युवी, एबी आणि गंभीरलाही भावला
18
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
19
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
20
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल

तापमान वाढीमुळे भात पिकांवर लष्करी अळींचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2021 04:35 IST

दापाेली : सद्य:स्थितीमध्ये कोकणातील बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिलेली आहे. त्यामुळे तापमानामुळे वाढ झाली आहे. या वातावरणातील बदलामुळे काही ...

दापाेली : सद्य:स्थितीमध्ये कोकणातील बहुतांश ठिकाणी पावसाने उघडीप दिलेली आहे. त्यामुळे तापमानामुळे वाढ झाली आहे. या वातावरणातील बदलामुळे काही ठिकाणी सुरळीतील अळी व निळे भुंगेरे यांचा प्रादुर्भाव हाेऊ लागला आहे. तसेच हे वातावरण पुढे काही दिवस कायम राहिल्यास लष्करी अळींचाही प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी जागृत राहून भात शेतीचे नियमित सर्वेक्षण करावे तसेच कीडनिहाय उपाययोजना कराव्यात, अशी सूचना काेकण कृषी विद्यापीठातर्फे करण्यात आली आहे.

सुरळीतील अळीमुळे नव्यानेच नुकसान झालेली पाने प्रति चूड आढळून आल्यास व्यवस्थापनासाठी शेतात पाणी बांधून ठेवावे आणि २० मिली रॉकेल पाण्यात सोडावे. त्यानंतर कीडग्रस्त पिकावरती एक दोर आडवा धरून ओढत न्यावा, त्यामुळे सुरळ्या पाण्यात पडतात आणि कीड गुदमरून मरते. शेतातील पाणी बाहेर काढत असताना एका बाजूला बांध पाडून त्या ठिकाणी मच्छरदाणीची जाळी लावून सुरळ्या एकत्र करून माराव्यात. याशिवाय गरज असल्यास व आर्थिक नुकसान पातळीच्या वर प्रादुर्भाव असल्यास फेनथोएट पाण्यात मिसळून फवारणी करावी.

निळे भुंगेऱ्याचा प्रादुर्भाव भात खाचरामधील सखल भागात ज्या ठिकाणी पाणी साचते अशा जागेवर होतो. त्यामुळे अशा सखल भागांची शेतकरी बांधवांनी वेळोवेळी पाहणी करावी पुनर्लागवडीच्या वेळेस १ निळा भुंगेरा किंवा प्रादुर्भित पान प्रति चूड व फुटव्याच्या अवस्थेत ९ भुंगेर किंवा ९ ते २ प्रादुर्भित पाने प्रति चूड आढळल्यास या किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडली आहे असे समजावे.

सद्य:स्थितीत अधून मधून पडणारा पाऊस आणि वाढते तापमान या बाबी लष्करी अळीच्या वाढीस अनुकूल असल्याने या अळींचा उद्रेक होण्याची शक्यता आहे. तरी प्रादुर्भाव सुरू झाल्यास ज्या भातशेतीमध्ये पाण्याची उपलब्धता असेल अशा ठिकाणी प्रादुर्भावित भात शेतामध्ये पाणी बांधून ठेवावे. जेणेकरून अळ्या जमिनीत किंवा चुडामध्ये न लपता रोपांवर आल्याने पक्ष्यांच्या भक्ष्यस्थानी पडतील तेव्हा त्याकरिता भात शोतीमध्ये पक्षी थांबे उभारावेत. किडींचा उद्रेक झाल्यास अशा ठिकाणी भातशेतीच्या भोवती चर खोदून पाणी भरून ठेवावे म्हणजे अळ्यांचे एका शेतातून दुसऱ्या शेतामध्ये स्थलांतर होणार नाही.