शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
2
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
3
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
4
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
5
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
6
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
7
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
8
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
9
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
10
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
11
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
12
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
13
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
14
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
15
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
16
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
17
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
18
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
19
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
20
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
Daily Top 2Weekly Top 5

राजापूर तालुक्यातील खाड्या गाळाने भरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:31 IST

राजापूर : तालुक्यातील नाणार-सागवे भागातील खाडीत मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन झाल्याने येथील मच्छिमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. ...

राजापूर : तालुक्यातील नाणार-सागवे भागातील खाडीत मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन झाल्याने येथील मच्छिमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. गाळामुळे खाडीत होड्या ढकलणे अथवा किनाऱ्यावर होड्या ओढताना मच्छिमारांना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे लवकरात लवकर खाडीतील गाळ उपसा करावा, अशी मागणी येथील मच्छिमारांतून करण्यात येत आहे.

राजापूर तालुक्याला मोठ्या प्रमाणात समुद्रकिनारपट्टी लाभली आहे. ब्रिटिश काळामध्ये याठिकाणी मोठ्या प्रमाणात जलवाहतुकीद्वारे व्यापारउदीम चालत होता. मोठमोठ्या गलबतांद्वारे याठिकाणी जलवाहतूक केली जात असे. मात्र, कालांतराने खाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन झाल्याने व दळणवळणाची अन्य साधने निर्माण झाल्याने जलवाहतूक बंद झाली. त्यामुळे खाडीपट्ट्यातून होणारी जहाजांची ये-जा ही सद्यस्थितीत बंद आहे. मात्र, पूर्वापार चालत आलेला मच्छिमार व्यवसाय अद्यापही याठिकाणी सुरू आहे. मात्र खाडीपट्ट्यात साचलेल्या गाळामुळे मच्छिमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले आहे.

हीच अवस्था विजयदुर्ग खाडीपट्ट्यामध्ये येणाऱ्या राजापूर तालुक्यातील नाणार-सागवे येथील खाडीची झाली आहे. या खाडीकिनारी तालुक्यातील सागवे, कातळी, नाणार आदी भाग आहे. या भागातील सुमारे साडेतीन-चार हजार लोकांचा उदरनिर्वाह मच्छिमारी व्यवसायावर आहे. याठिकाणी सुमारे तीनशे ते चारशे मच्छिमार होड्या आहेत. खारेपाटण भागातून वाहणाऱ्या नद्या सागवे येथे अरबी समुद्राला मिळतात. या नद्या प्रवाहाबरोबर मोठ्या प्रमाणात गाळ वाहून आणतात. गेली वर्षानुवर्षे अशाप्रकारे गाळ खाडीकिनारी येत असल्याने खाडीकिनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात गाळाचे संचयन झाले आहे.

किनारपट्टी भागात साचलेल्या गाळाचा फटका येथील मच्छिमारांना बसत आहे. मच्छिमारीकरिता होड्या खाडीत लोटताना, तसेच मच्छिमारी करून परतल्यानंतर किनाऱ्यावर होड्या ओढताना मच्छिमारांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खाडीपट्ट्यात साचलेला गाळ लवकरात लवकर उपसावा, अशी मागणी येथील मच्छिमारांतून केली जात आहे.