शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

कोरोनामुळे मुहूर्त हुकले; नोंदणी कार्यालयाने ४१ विवाह जुळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:30 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : गेल्या वर्षी वर्षभर कोरोनाचे संकट होते. त्यामुळे एप्रिलपासून अनेकांच्या विवाहाचे मुहूर्त हुकले. मात्र, लाॅकडाऊन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : गेल्या वर्षी वर्षभर कोरोनाचे संकट होते. त्यामुळे एप्रिलपासून अनेकांच्या विवाहाचे मुहूर्त हुकले. मात्र, लाॅकडाऊन शिथिल होताच अनेकांनी नोंदणी कार्यालयाचा आधार घेत विवाह उरकून घेतले. त्यामुळे जानेवारी ते डिसेंबर या वर्षात ४१ विवाह नोंदणी पद्धतीने झाले. डिसेंबरमध्ये लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल झाल्यानंतर या एका महिन्यात नोंदणी पद्धतीने तब्बल १६ जणांच्या विवाहाचे बार उडाले.

गेल्या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागताच २३ मार्चपासून देशभरातच कडक लाॅकडाऊन सुरू झाले. हे लाॅकडाऊन पुढे सुरूच राहिले. त्यामुळे एप्रिल महिन्यापासून ज्यांच्या लग्नाचे मुहूर्त ठरले होते, ते रद्द करावे लागले. अनेकांनी लाॅकडाऊन संपल्यानंतर लग्न करू, असा विचार करत प्रतीक्षा सुरू ठेवली. मात्र, लाॅकडाऊनचा कालावधी वाढत गेला. त्यामुळे मुहूर्तही लांबत गेले. काहींनी या वर्षभरात लग्नाचा विचारच केला नाही.

लाॅकडाऊनच्या काळात सार्वजनिक कार्यक्रमांबरोबरच लग्न तसेच अन्य धार्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे एप्रिल आणि मे या दोन महिन्यात विवाह झालेच नाहीत. या कालावधीत सर्वच कार्यालयांची कामे थांबली होती. त्यामुळे नोंदणी पद्धतीने विवाहालाही परवानगी नव्हती. मात्र, जून महिन्यात काही अंशी लग्न तसेच अन्य महत्त्वाच्या कार्यक्रमांना मर्यादित जणांच्या उपस्थितीत परवानगी देण्यात आली. त्यामुळे काहींनी नोंदणी पद्धतीने विवाह उरकून घेतले. तर काहींनी एवढ्या कमी संख्येत लग्न कसे करायचे, असे म्हणत लग्नाचा मुहूर्तच पुढे ढकलला. मात्र, मुहूर्त गेल्याने नोंदणी पद्धतीकडे विवाहेच्छुक वळल्याने एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत ४१ विवाह नोंदणी पद्धतीने झाले. यापैकी १६ विवाह डिसेंबर या एका महिन्यात झाले.

त्यानंतर कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतोय, असे वाटू लागल्याने मंगल कार्यालयात विवाह करणाऱ्यांची संख्या वाढली. त्यामुळे जानेवारी ते मार्च या तीन महिन्यात विवाह नाेंदणी करणाऱ्यांचे प्रमाण कमी आले तरीही या तीन महिन्यात नोंदणी पद्धतीने ११ विवाह झाले.

चौकट

प्रत्येक महिन्याला ४ ते ५ विवाह नोंदणी पद्धतीने होतात. वर्षाला सुमारे ५० विवाह होतात. यावर्षी एप्रिल आणि मे महिन्यात नोंदणी विवाहालाही परवानगी नव्हती. त्यामुळे या महिन्यात विवाह झाले नाहीत. मात्र, जून महिन्यापासून विवाहांना प्रारंभ झाला. डिसेंबर महिन्यात लाॅकडाऊन पूर्णपणे शिथिल झाल्यानंतर एकाच महिन्यात १६ विवाह झाले. ४१ विवाहांपैकी दोन विवाह नोंदणी कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष मंगल कार्यालयात जाऊन लावले.

२०२० साली असे झाले विवाह

कोट

२०२० हे वर्ष पूर्णपणे कोरोना वर्ष ठरले. त्यामुळे ज्यांची लग्नं ठरली होती, त्यांनी मुहुर्ताची वाट न बघता नोंदणी पद्धतीने विवाहाला प्राधान्य दिले.

- महेश जुवळे, विवाह नोंदणी अधिकारी, रत्नागिरी

महिना विवाह

जानेवारी ४

फेब्रुवारी ५

मार्च १

एप्रिल ०

मे ०

जून २

जुलै ४

ऑगस्ट ३

सप्टेंबर ०

ऑक्टोबर २

नोव्हेंबर १

डिसेंबर १६

जानेवारी ते मार्च २०२१ या कालावधीत झालेले विवाह : ११

जानेवारी : ६

फेब्रुवारी ४

मार्च : १