शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
2
पहलगामसारखा आणखी एक दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता; गुप्तचर विभागाची माहिती, यंत्रणा अलर्ट
3
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
4
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
5
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
6
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
7
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
8
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
9
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
10
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
11
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
12
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
13
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
14
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
15
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!
16
May Born Astro: राजसी, आकर्षक पण तापट स्वभाव, वाचा मे महिन्यात जन्मलेल्या लोकांचे गुण दोष!
17
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकवा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
18
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
19
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
20
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू

जिल्ह्यात कोरोनाने ८ रुग्णांचा बळी, नवे २०५ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:29 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने ८ रुग्णांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या १,९९६ झाली आहे, तर २०५ बाधित रुग्ण सापडले असून ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाने ८ रुग्णांचा बळी घेतल्याने मृतांची संख्या १,९९६ झाली आहे, तर २०५ बाधित रुग्ण सापडले असून एकूण ६९,८९९ रुग्ण झाले आहेत. १९० रुग्ण कोरोनामुक्त झाल्याने एकूण ६५,३१७ रुग्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोबाधित रुग्ण सापडण्याचे प्रमाण तसेच बरे होण्याचे प्रमाण कमी झालेले आहे. जिल्ह्यात ५,७९४ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत १४६ आणि ॲंटिजन चाचणीत ५९ बाधित रुग्ण सापडले. बाधित रुग्णांमध्ये मंडणगड, गुहागर आणि लांजा या तालुक्यांमध्ये एक अंकी रुग्ण सापडले असून रत्नागिरी तालुक्यात रुग्णसंख्या जास्त आहे. मंडणगडात ४ रुग्ण, दापोलीत १२, खेडमध्ये ३४, गुहागरात ७, चिपळुणात ४२, संगमेश्वरात २३, रत्नागिरीत ६०, लांजात ९ आणि राजापुरात १४ रुग्ण सापडले आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित मृतांमध्ये गुहागर, चिपळूण, लांजा या तालुक्यांमध्ये प्रत्येकी २ रुग्ण तसेच संगमेश्वर, राजापूर तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. मृतांमध्ये कोमार्बिडचे ८०३ रुग्ण असून, पन्नाशीतील रुग्ण जास्त प्रमाणात मृत्यू पावले आहेत. बाधित रुग्णांचा मृत्युदर २.८६ टक्के असून बरे होण्याचा दर ९३.४४ टक्के आहे. बाधितांमध्ये लक्षणे नसलेले रुग्ण १,८५७ तर लक्षणे असलेले रुग्ण ७२९ आहेत.